शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

नरखेड रेल्वे क्रॉसिंग उड्डाणपूल दीड वर्षांपासून अंधारातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 23:48 IST

गेल्या महानगरपालिका निवडणुकांआधी घाईगडबडीत अमरावती ते बडनेरा मार्गावरील नरखेड रेल्वे क्रॉसिंग उड्डाणपूल राजकारण्यांनी सुरू केले. त्यानंतर तब्बल दीड वर्षे होऊनही हा उड्डाणपूल अंधारातच आहे. दोन महिन्यांपासून यावर लाईट्स बसविण्यात आले. मात्र, सुरू का होत नाही, हा प्रश्न वाहतूकदारांना सतावत आहे. ज्या तत्परतेने उड्डाणपूल सुरू केला त्याच तत्परतेने लाईटस् सुरू करावेत असे बोलल्या जात आहे.

ठळक मुद्देअपघातात वाढ : पथदिवे बसविले, सुरू केव्हा करणार? नागरिकांचा सवाल

श्यामकांत सहस्त्रभोजने।लोकमत न्यूज नेटवर्कबडनेरा : गेल्या महानगरपालिका निवडणुकांआधी घाईगडबडीत अमरावती ते बडनेरा मार्गावरील नरखेड रेल्वे क्रॉसिंग उड्डाणपूल राजकारण्यांनी सुरू केले. त्यानंतर तब्बल दीड वर्षे होऊनही हा उड्डाणपूल अंधारातच आहे. दोन महिन्यांपासून यावर लाईट्स बसविण्यात आले. मात्र, सुरू का होत नाही, हा प्रश्न वाहतूकदारांना सतावत आहे. ज्या तत्परतेने उड्डाणपूल सुरू केला त्याच तत्परतेने लाईटस् सुरू करावेत असे बोलल्या जात आहे.अमरावती ते बडनेरा मार्गावर मोठी वर्दळ आहे. दीड वर्षांपूर्वी हा उड्डाणपूल वाहतुकीस खुला करण्यात आला. दरम्यान महापालिकेची निवडणूक असल्याने राजकारण्यांनी श्रेय लाटण्याच्या लढाईत प्रकाश व्यवस्थेकडे दुर्लक्ष केले. १३ महिन्यांनंतर नरखेड रेल्वे क्रॉसिंगवर लाईट्स बसविण्यात आले आहे. मात्र दोन महिन्यांपासून हे पथदिवे सुरू झालेले नाही. आधीच हा उड्डाणपूल रुंदीने कमी आहे. त्यात रात्रीच्या वेळी प्रकाश व्यवस्था नसल्याने वाहन चालकांना येथून जात असताना जीव मुठीत ठेवूनच चालावे लागत आहे. बरेच अपघातदेखील घडत आहेत. ते पथदिवे तातडीने सुरू करावेत, अशी वाहनधारकांची मागणी आहे.अर्धा किलोमीटरचा डेंजर रस्ताअमरावती ते बडनेरा मार्गावरील साहिल लॉनसमोरून जाणारा अर्धा किलोमीटर अंतराचा खराब रस्ता वाहतुकदारांना प्रचंड धोक्याचा ठरत आहे. सहा महिन्यांपूर्वी हा रस्ता दुरूस्त करण्यात आला. मात्र, याचा अर्धा भाग तसाच सोडल्यामुळे वाहनाचे संतुलन बिघडत आहे. रात्री याठिकाणी पुरेसा प्रकाश नसतो. बारीक गिट्टी एका बाजूने आहे. श्वान रस्त्याहून आडवे पळतात. पुढे पावसाळा असल्याने धोका लक्षात घेऊन प्रशासनाने हा रस्ता त्वरित दुरूस्त करावा, असे बोलले जात आहे.