शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

नरखेड रेल्वे क्रॉसिंग उड्डाणपूल दीड वर्षांपासून अंधारातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 23:48 IST

गेल्या महानगरपालिका निवडणुकांआधी घाईगडबडीत अमरावती ते बडनेरा मार्गावरील नरखेड रेल्वे क्रॉसिंग उड्डाणपूल राजकारण्यांनी सुरू केले. त्यानंतर तब्बल दीड वर्षे होऊनही हा उड्डाणपूल अंधारातच आहे. दोन महिन्यांपासून यावर लाईट्स बसविण्यात आले. मात्र, सुरू का होत नाही, हा प्रश्न वाहतूकदारांना सतावत आहे. ज्या तत्परतेने उड्डाणपूल सुरू केला त्याच तत्परतेने लाईटस् सुरू करावेत असे बोलल्या जात आहे.

ठळक मुद्देअपघातात वाढ : पथदिवे बसविले, सुरू केव्हा करणार? नागरिकांचा सवाल

श्यामकांत सहस्त्रभोजने।लोकमत न्यूज नेटवर्कबडनेरा : गेल्या महानगरपालिका निवडणुकांआधी घाईगडबडीत अमरावती ते बडनेरा मार्गावरील नरखेड रेल्वे क्रॉसिंग उड्डाणपूल राजकारण्यांनी सुरू केले. त्यानंतर तब्बल दीड वर्षे होऊनही हा उड्डाणपूल अंधारातच आहे. दोन महिन्यांपासून यावर लाईट्स बसविण्यात आले. मात्र, सुरू का होत नाही, हा प्रश्न वाहतूकदारांना सतावत आहे. ज्या तत्परतेने उड्डाणपूल सुरू केला त्याच तत्परतेने लाईटस् सुरू करावेत असे बोलल्या जात आहे.अमरावती ते बडनेरा मार्गावर मोठी वर्दळ आहे. दीड वर्षांपूर्वी हा उड्डाणपूल वाहतुकीस खुला करण्यात आला. दरम्यान महापालिकेची निवडणूक असल्याने राजकारण्यांनी श्रेय लाटण्याच्या लढाईत प्रकाश व्यवस्थेकडे दुर्लक्ष केले. १३ महिन्यांनंतर नरखेड रेल्वे क्रॉसिंगवर लाईट्स बसविण्यात आले आहे. मात्र दोन महिन्यांपासून हे पथदिवे सुरू झालेले नाही. आधीच हा उड्डाणपूल रुंदीने कमी आहे. त्यात रात्रीच्या वेळी प्रकाश व्यवस्था नसल्याने वाहन चालकांना येथून जात असताना जीव मुठीत ठेवूनच चालावे लागत आहे. बरेच अपघातदेखील घडत आहेत. ते पथदिवे तातडीने सुरू करावेत, अशी वाहनधारकांची मागणी आहे.अर्धा किलोमीटरचा डेंजर रस्ताअमरावती ते बडनेरा मार्गावरील साहिल लॉनसमोरून जाणारा अर्धा किलोमीटर अंतराचा खराब रस्ता वाहतुकदारांना प्रचंड धोक्याचा ठरत आहे. सहा महिन्यांपूर्वी हा रस्ता दुरूस्त करण्यात आला. मात्र, याचा अर्धा भाग तसाच सोडल्यामुळे वाहनाचे संतुलन बिघडत आहे. रात्री याठिकाणी पुरेसा प्रकाश नसतो. बारीक गिट्टी एका बाजूने आहे. श्वान रस्त्याहून आडवे पळतात. पुढे पावसाळा असल्याने धोका लक्षात घेऊन प्रशासनाने हा रस्ता त्वरित दुरूस्त करावा, असे बोलले जात आहे.