शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

नांदगाव पेठचा टोल नाका वरुड-मोर्शीकरांसाठी डोकेदुखी

By admin | Updated: December 20, 2014 00:21 IST

राजकीय नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांनाही टोल फ्री पासेस दिल्या आहेत. चौपदरी राष्ट्रीय महामार्ग हा अमरावती ते नागपूरकडे जातो.

अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर नांदगाव (पेठ) येथील टोलनाक्याच्या बेंबदशाहीमुळे वरुड मोर्शी तालुक्यातील सर्वसामान्य जनतेची पिळवणूक होत आहे. सदर टोल टॅक्स हा किलोमीटरप्रमाणे घेण्यात यावा, अशी मागणी होत आहे. राजकारण्यांच्या कार्यकर्त्याना आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लोकप्रतिनीधींना सुध्दा टोल फ्री पासेस मिळाल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये रोष उफाळून येत आहे. राजकीय नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांनाही टोल फ्री पासेस दिल्या आहेत. चौपदरी राष्ट्रीय महामार्ग हा अमरावती ते नागपूरकडे जातो. परंतु वरुड, मोर्शी तालुक्यातील नागरिकांना सुध्दा विनाकारण भुर्दंड सोसावा लागतो. यामुळे खासगी वाहनधारकांनीसुध्दा आपले भाडे वाढवून ग्राहकांवरच बोझा लादला आहे. एसटीलासुध्दा टोल भरावा लागत असल्याने याचा भुर्दंड प्रवाशांवर पडतो. परंतु याकडे राजकारण्यांचे लक्ष नाही. एकीकडे वाहनचालकांना परिवहन विभागाचा वाहन कर, रस्ता कर (रोड टॅक्स) भरावा लागतो. यामध्ये सहा चाकी ट्रकला १३ हजार ३६४ रुपये वार्षिक, दहा चाकी टॅ्रक मालकाकडून २१ हजार ७८० रुपये वार्षिक, १२ चाकी ट्रकला २९ हजार १२० रुपये वार्षिक, असा अवाढव्य वार्षिक रोड टॅक्स परिवहन विभाग वसूल करतात. रस्त्यावरुन चालण्याचासुध्दा टॅक्स यात समाविष्ट असतो. तरीसुध्दा बीओटी तत्त्वावर रस्त्याची निर्मिती करुन ठेकेदारांना टोलटॅक्स वसुलीचा भुर्दंड देऊन वाहनचालकासह नागरिकांची आर्थिक लूट करण्याचे षड्यंत्र शासनाने चालविले आहे. टोलटॅक्स घेत असल्याने परिवहन विभागाचा रोडटॅक्स कशासाठी? असा प्रश्न आता नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे. अमरावती ते टोलनाका नांदगाव (पेठ ) हे केवळ ९ कि.मी.चे अंतर असताना वरुड मोर्शी तालुक्यातील नागरिकांना चारचाकी वाहनांकरिता जाणे-येणे १२० रुपये तर जाणे ८० रुपये, हलके भाडोत्री वाहने १८५ रुपये जाणे येणे तर जाण्यासाठी १२५ रुपये, दोन अ‍ॅक्सेल ट्रक, बसकरिता ३८० रुपये जाणे-येणे तर जाण्यासाठी २५५ रुपये, जड वाहने दोनपेक्षा अधिक अ‍ॅक्सेल, जेसीबीसह अन्य जड वाहनांसाठी जाणे-येणे ५८५ रुपये तर जाणे ३९० रुपये, सात किंवा त्यापेक्षा अधिक अ‍ॅक्सेलच्या जडवाहनांकरिता जाणे-येणे ७३५ रुपये आणि जाणे ४९० रुपये असा टोल द्यावा लागतो. तर ट्रककरिता वाहनांच्या क्षमतेनुसार टॅक्स आकारण्यात आला आहे. यामध्ये प्रशासनाची वाहने, रुग्णवाहिका, अग्निीशमन, मंत्री, राज्यपालासह आदी अधिकाऱ्यांच्या वाहनांना टोल नाही. टोल नाका ते नांदगाव (पेठ) पासून वळण घेऊन पुढे मोर्शी, वरुडकडे येणाऱ्यांना हा विनाकारणचा भुर्दंड सहन करावा लागतो. परंतु टोल टॅक्स घेत असल्याने नांग्दगाव ते वरुडपर्यंत असलेल्या राज्य महामार्गाचीसुध्दा तेवढ्याच गंभीरतेने सुधारणा करावी, म्हणजे टोल टॅक्स देताना वानहनचालकांची लूट होणार नाही. नांदगाव ते वरुड मार्गाची दुर्दशा झाली आहे.