शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

नांदगाव पेठचा टोल नाका वरुड-मोर्शीकरांसाठी डोकेदुखी

By admin | Updated: December 20, 2014 00:21 IST

राजकीय नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांनाही टोल फ्री पासेस दिल्या आहेत. चौपदरी राष्ट्रीय महामार्ग हा अमरावती ते नागपूरकडे जातो.

अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर नांदगाव (पेठ) येथील टोलनाक्याच्या बेंबदशाहीमुळे वरुड मोर्शी तालुक्यातील सर्वसामान्य जनतेची पिळवणूक होत आहे. सदर टोल टॅक्स हा किलोमीटरप्रमाणे घेण्यात यावा, अशी मागणी होत आहे. राजकारण्यांच्या कार्यकर्त्याना आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लोकप्रतिनीधींना सुध्दा टोल फ्री पासेस मिळाल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये रोष उफाळून येत आहे. राजकीय नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांनाही टोल फ्री पासेस दिल्या आहेत. चौपदरी राष्ट्रीय महामार्ग हा अमरावती ते नागपूरकडे जातो. परंतु वरुड, मोर्शी तालुक्यातील नागरिकांना सुध्दा विनाकारण भुर्दंड सोसावा लागतो. यामुळे खासगी वाहनधारकांनीसुध्दा आपले भाडे वाढवून ग्राहकांवरच बोझा लादला आहे. एसटीलासुध्दा टोल भरावा लागत असल्याने याचा भुर्दंड प्रवाशांवर पडतो. परंतु याकडे राजकारण्यांचे लक्ष नाही. एकीकडे वाहनचालकांना परिवहन विभागाचा वाहन कर, रस्ता कर (रोड टॅक्स) भरावा लागतो. यामध्ये सहा चाकी ट्रकला १३ हजार ३६४ रुपये वार्षिक, दहा चाकी टॅ्रक मालकाकडून २१ हजार ७८० रुपये वार्षिक, १२ चाकी ट्रकला २९ हजार १२० रुपये वार्षिक, असा अवाढव्य वार्षिक रोड टॅक्स परिवहन विभाग वसूल करतात. रस्त्यावरुन चालण्याचासुध्दा टॅक्स यात समाविष्ट असतो. तरीसुध्दा बीओटी तत्त्वावर रस्त्याची निर्मिती करुन ठेकेदारांना टोलटॅक्स वसुलीचा भुर्दंड देऊन वाहनचालकासह नागरिकांची आर्थिक लूट करण्याचे षड्यंत्र शासनाने चालविले आहे. टोलटॅक्स घेत असल्याने परिवहन विभागाचा रोडटॅक्स कशासाठी? असा प्रश्न आता नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे. अमरावती ते टोलनाका नांदगाव (पेठ ) हे केवळ ९ कि.मी.चे अंतर असताना वरुड मोर्शी तालुक्यातील नागरिकांना चारचाकी वाहनांकरिता जाणे-येणे १२० रुपये तर जाणे ८० रुपये, हलके भाडोत्री वाहने १८५ रुपये जाणे येणे तर जाण्यासाठी १२५ रुपये, दोन अ‍ॅक्सेल ट्रक, बसकरिता ३८० रुपये जाणे-येणे तर जाण्यासाठी २५५ रुपये, जड वाहने दोनपेक्षा अधिक अ‍ॅक्सेल, जेसीबीसह अन्य जड वाहनांसाठी जाणे-येणे ५८५ रुपये तर जाणे ३९० रुपये, सात किंवा त्यापेक्षा अधिक अ‍ॅक्सेलच्या जडवाहनांकरिता जाणे-येणे ७३५ रुपये आणि जाणे ४९० रुपये असा टोल द्यावा लागतो. तर ट्रककरिता वाहनांच्या क्षमतेनुसार टॅक्स आकारण्यात आला आहे. यामध्ये प्रशासनाची वाहने, रुग्णवाहिका, अग्निीशमन, मंत्री, राज्यपालासह आदी अधिकाऱ्यांच्या वाहनांना टोल नाही. टोल नाका ते नांदगाव (पेठ) पासून वळण घेऊन पुढे मोर्शी, वरुडकडे येणाऱ्यांना हा विनाकारणचा भुर्दंड सहन करावा लागतो. परंतु टोल टॅक्स घेत असल्याने नांग्दगाव ते वरुडपर्यंत असलेल्या राज्य महामार्गाचीसुध्दा तेवढ्याच गंभीरतेने सुधारणा करावी, म्हणजे टोल टॅक्स देताना वानहनचालकांची लूट होणार नाही. नांदगाव ते वरुड मार्गाची दुर्दशा झाली आहे.