शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

सरकारी कार्यालयांत आचारसंहिता नावालाच; काम कमी अन् कर्मचाऱ्यांच्या कानाला मोबाइल जास्त !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:12 IST

अनेक शासकीय कार्यालयांत लँडलाइनचा वापर नावालाच अमरावती : राज्य शासनाने सरकारी कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेत मोबाइल वापरावर निर्बंध घातले आहेत; ...

अनेक शासकीय कार्यालयांत लँडलाइनचा वापर नावालाच

अमरावती : राज्य शासनाने सरकारी कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेत मोबाइल वापरावर निर्बंध घातले आहेत; परंतु जिल्हा परिषदेसह जिल्हाधिकारी कार्यालयात विविध कार्यालयांतील लँडलाइनचा वापर कमी होत असल्याचे निदर्शनास आले. बहुतेक सर्व कर्मचाऱ्यांनाच सरकारी कामासाठी स्वतःचा मोबाइल वापरावा लागत असल्याचे चित्र पाहावयास मिळाले आहे.

सरकारी कार्यालयामध्ये मोबाइल वापरण्यासंदर्भात काही नियम आहेत. कामावर असताना मोबाइलवर बोलण्यास किंवा चॅटिंग करण्यास मनाई आहे. बहुतांश सरकारी कार्यालयांमध्ये या नियमांची अंमलबजावणी होतेच असे नाही. अनेक कार्यालयांत कर्मचारी फोनवर वीस वीस मिनिटे, अर्धा अर्धा तास बोलत असल्याचे आढळून येतात. जिल्हा परिषद, महसूल किंवा अन्य कार्यालयांमध्ये कर्मचारी फोनवर बाेलत काम करतात. तर बोलता बोलताही काम करतात.

बॉक्स

अशी आहे आचारसंहिता

कार्यालयीन कामासाठी केवळ कार्यालयीन दूरध्वनीचा वापर करावा. कार्यालयीन वेळेत कार्यालयीन कामासाठी आवश्यक तेव्हाच मोबाइलचा वापर करावा.

मोबाइलवर सौम्य आवाजात बोलावे, वाद घालू नये, कार्यालयीन कामासाठी मोबाइलचा वापर करताना टेक्स्ट मेसेजचा वापर करावा. मोबाइलवर आलेल्या अत्यावश्यक वैयक्तिक कॉल बाहेर जाऊन घ्यावेत.

बॉक्स

जिल्हाधिकारी कार्यालय

विभागप्रमुख जेव्हा कार्यालयात हजर असतात तेव्हा फोनवर बोलण्याचे किंवा चॅटिंग करण्याचे प्रमाण खूप कमी असते. विभागप्रमुख जेव्हा कार्यालयातून निघून जातात किंवा दौऱ्यावर असतात त्यावेळी कर्मचारी त्याच्या जागेवर हजर असले तरी मोबाइलवर फोन आल्यास किंवा कामानिमित संवाद साधताना दिसतात.

बॉक्स जिल्हा परिषद

जिल्हा परिषदेत फेरफटका मारला असता अनेक विभागात कर्मचारी मोबाइलवर बोलताना बराच वेळ दिसून आले. काही कर्मचारी मोबाइलवर बोलत बाहेर फिरत होते. बरेच कर्मचारी मोबाइलवर सोशल मीडियावर माहिती चाळताना आढळले. तर यातील काही जण चॅटिंग करीत होते. कर्मचाऱ्यांच्या मोबाइल संभाषणाकडे लक्ष देण्याची गरज आहे.

बॉक्स

काम नावाला, मोबाइल कायम कानाला

जिल्हा परिषदेचे काही कर्मचारी चहा पिण्यासाठी कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर बराच वेळ फोनवर बोलण्यात व्यस्त असल्याचे निदर्शनास आले.

परंतु हे प्रमाण खूपच कमी असून बहुतेक कर्मचाऱ्यांना कार्यालयीन कामकाजासाठी मोबाइल फोनचा अधिक वापर करावा लागतो.

बॉक्स

सर्व विभागप्रमुखांना सूचना दिल्या आहेत

शासनाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व विभागप्रमुखांना त्यांच्या अधीनस्त असलेल्या कर्मचाऱ्यांना मोबाइल फोन वापरासंदर्भात सूचना दिल्या. शासनाच्या सूचनेप्रमाणे अंमलबजावणी करावी, असेही स्पष्ट केले आहे.

-पवनीत कौर,

जिल्हाधिकारी

बॉक्स

वैयक्तिक मोबाइल फोनचा वापर कमी

कोट

शासनाच्या आदेशानुसार सर्व कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेत मोबाइल वापरावर घालण्यात आलेल्या निर्बंधांसंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. याबाबत सूचना विभागप्रमुखांना दिलेल्या आहेत. जिल्हा परिषदेत शासनाच्या मार्गदर्शनानुसार अंमलबजावणी केली जाईल.

अविश्यांत पंडा,

मुख्य कार्यपालन अधिकारी, जिल्हा परिषद

बॉक्स

सरकारी कार्यालय नको रे बाबा !

जिल्हा परिषदेमधील कर्मचारी जागेवर नसतात. कामांनिमित्त गेल्यावर मोबाइलवर बोलत असल्यास थांबावे लागते. साहेब आमचे काम करा, असे विचारल्यावर कर्मचारी काम होईल, असे सांगून वेळ निभावून नेतात. त्यामुळे कामे वेळेवर होणे गरजेचे आहे.

-रामकृष्ण सहारे,

नागरिक

काेट

गावखेड्यातून पैसे खर्च करून शहराच्या ठिकाणी कामासाठी जावे लागते. यात पैसा अन् वेळही जातो. मात्र, बरेच वेळा काम होईल या अपेक्षेने जात असताना संबंधित बाबू सुटीवर असल्याचे सांगितले जाते किंवा बाहेर गेले आहेत. यातही ते केव्हा येणार, याचाही ठावठिकाणा राहत नाही.

-विलास रेहपांडे,

नागरिक