शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
4
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
5
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
6
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
7
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
8
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
9
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
10
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
11
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
12
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
13
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
14
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
15
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
16
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
17
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
18
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
19
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
20
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल

आमदाराच्या कृत्याने नाव कलंकित

By admin | Updated: June 29, 2015 00:38 IST

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळात ३८५ कोटी रुपयांचा घोटाळा हा राष्ट्रवादीचे विद्यमान आ. रमेश कदम यांनी केला आहे.

साठे महामंडळातील घोटाळा : लक्ष्मणराव ढोबळे यांचा पत्रपरिषदेत आरोपअमरावती : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळात ३८५ कोटी रुपयांचा घोटाळा हा राष्ट्रवादीचे विद्यमान आ. रमेश कदम यांनी केला आहे. परंतु या महामंडळात घोटाळा झाल्याप्रकरणी अनेक योजना, प्रकल्पांना निधी देण्याचे शासनाने थांबविले आहे. घोटाळ्यामुळे अण्णाभाऊंचे नाव कलंकित झाले आहे. ही बाब संपूर्ण समाजासाठी अन्यायकारक आहे. त्यामुळे आमदाराच्या पापाचे खापर समाजावर न फोडता १ आॅगस्टपासून योजनांना निधी उपलब्ध करुन दिला नाही तर राज्यभर आंदोलन केले जाईल, असा गर्भीत इशारा राज्याचे माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी रविवारी येथे दिला.ढोबळे हे विदर्भाच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी येथील शासकीय विश्रामभवनात पत्रपरिषद घेऊन अण्णाभाऊ साठे महामंडळात झालेल्या घोटाळ्याची मालिकाच वाचली. साठे महामंडळाचे ३० वर्षे उत्तम कामकाज सुरु असताना सन- २०१४ या एकाच वर्षात आ. रमेश कदम यांनी ३८५ कोटी रुपयांचा घोटाळा केल्यानंतरही अटक केली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले. आ. कदम हे आघाडी शासनाच्या काळात या महामंडळाचे अध्यक्ष होते. कदम अध्यक्ष असलेल्या तीन संस्थांना त्यांनी महामंडळाच्या तिजोरीतून १४२ कोटी रुपयांचे नियमबाह्य वाटप केले, असा आरोप ढोबळे यांनी केला. महामंडळातील घोटाळ्याची चौकशी सीआयडीमार्फत सुरु असली तरी या चौकशीला फारसा वेग आलेला नाही. आ. कदम यांनी कोट्यवधींचा घोटाळा केल्याचे चौकशीत समोर आले असताना घोटाळेबाज अद्यापही मोकळेच आहेत. सीआयडीने अमरावती, नाशिक, पश्चिम महाराष्ट्र व औरंगाबाद विभागात चौकशीसाठी चार चमुंची नियुक्ती केली आहे. ही चौकशी होऊन दोषींवर कारवाई झालीच पाहिजे. परंतु ज्या समाजाला या महामंडळाकडून उत्थानाच्या अपेक्षा आहेत त्या अण्णाभाऊ साठे महामंडळात पूर्ववतपणे योजना, प्रशिक्षण, शिष्यवृत्ती, रोजगाराचे दालन, कर्जवाटप, मातंग महिला समृद्धी योजना सुरु करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीदिनी १ आॅगस्टपासून महामंडळात योजना सुरु करण्यात आल्या नाही तर समाज रस्त्यावर उतरेल, असे लक्ष्मणराव ढोबळे म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसपासून फारकत घेतलेले ढोबळे हे भाजपच्या वाटेवर असल्याचा प्रश्न विचारताच जो पक्ष समाजाच्या हिताचे काम करेल त्याची साथ घेऊ. कोणताही राजकीय पक्ष वर्ज्य नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.पत्रपरिषदेला उत्तमराव भैसने, बबनराव शिर्के, गणेशदास गायकवाड, सुरेश स्वर्गे, एस. एम.गवई, अजय डोंगरे, दिलीप जोगदंड आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)