शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

आमदाराच्या कृत्याने नाव कलंकित

By admin | Updated: June 29, 2015 00:38 IST

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळात ३८५ कोटी रुपयांचा घोटाळा हा राष्ट्रवादीचे विद्यमान आ. रमेश कदम यांनी केला आहे.

साठे महामंडळातील घोटाळा : लक्ष्मणराव ढोबळे यांचा पत्रपरिषदेत आरोपअमरावती : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळात ३८५ कोटी रुपयांचा घोटाळा हा राष्ट्रवादीचे विद्यमान आ. रमेश कदम यांनी केला आहे. परंतु या महामंडळात घोटाळा झाल्याप्रकरणी अनेक योजना, प्रकल्पांना निधी देण्याचे शासनाने थांबविले आहे. घोटाळ्यामुळे अण्णाभाऊंचे नाव कलंकित झाले आहे. ही बाब संपूर्ण समाजासाठी अन्यायकारक आहे. त्यामुळे आमदाराच्या पापाचे खापर समाजावर न फोडता १ आॅगस्टपासून योजनांना निधी उपलब्ध करुन दिला नाही तर राज्यभर आंदोलन केले जाईल, असा गर्भीत इशारा राज्याचे माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी रविवारी येथे दिला.ढोबळे हे विदर्भाच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी येथील शासकीय विश्रामभवनात पत्रपरिषद घेऊन अण्णाभाऊ साठे महामंडळात झालेल्या घोटाळ्याची मालिकाच वाचली. साठे महामंडळाचे ३० वर्षे उत्तम कामकाज सुरु असताना सन- २०१४ या एकाच वर्षात आ. रमेश कदम यांनी ३८५ कोटी रुपयांचा घोटाळा केल्यानंतरही अटक केली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले. आ. कदम हे आघाडी शासनाच्या काळात या महामंडळाचे अध्यक्ष होते. कदम अध्यक्ष असलेल्या तीन संस्थांना त्यांनी महामंडळाच्या तिजोरीतून १४२ कोटी रुपयांचे नियमबाह्य वाटप केले, असा आरोप ढोबळे यांनी केला. महामंडळातील घोटाळ्याची चौकशी सीआयडीमार्फत सुरु असली तरी या चौकशीला फारसा वेग आलेला नाही. आ. कदम यांनी कोट्यवधींचा घोटाळा केल्याचे चौकशीत समोर आले असताना घोटाळेबाज अद्यापही मोकळेच आहेत. सीआयडीने अमरावती, नाशिक, पश्चिम महाराष्ट्र व औरंगाबाद विभागात चौकशीसाठी चार चमुंची नियुक्ती केली आहे. ही चौकशी होऊन दोषींवर कारवाई झालीच पाहिजे. परंतु ज्या समाजाला या महामंडळाकडून उत्थानाच्या अपेक्षा आहेत त्या अण्णाभाऊ साठे महामंडळात पूर्ववतपणे योजना, प्रशिक्षण, शिष्यवृत्ती, रोजगाराचे दालन, कर्जवाटप, मातंग महिला समृद्धी योजना सुरु करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीदिनी १ आॅगस्टपासून महामंडळात योजना सुरु करण्यात आल्या नाही तर समाज रस्त्यावर उतरेल, असे लक्ष्मणराव ढोबळे म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसपासून फारकत घेतलेले ढोबळे हे भाजपच्या वाटेवर असल्याचा प्रश्न विचारताच जो पक्ष समाजाच्या हिताचे काम करेल त्याची साथ घेऊ. कोणताही राजकीय पक्ष वर्ज्य नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.पत्रपरिषदेला उत्तमराव भैसने, बबनराव शिर्के, गणेशदास गायकवाड, सुरेश स्वर्गे, एस. एम.गवई, अजय डोंगरे, दिलीप जोगदंड आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)