शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
5
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
6
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
7
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
8
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
9
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?
10
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून प्रसिद्ध खलनायकाचं कमबॅक, लूक पाहून खूश झाले चाहते
11
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
12
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
13
१० हजार रुपयांत भारतीय जपानमध्ये काय काय करू शकतात? रुपयाची जपानी किंमत किती?
14
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
15
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
16
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
17
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
18
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
19
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
20
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर

चांदूरबाजारात तुंबलेल्या नाल्या धोकादायक

By admin | Updated: June 14, 2014 01:19 IST

चांदूरबाजार नगरपरिषद हद्दीतील बहुतेक सर्व प्रभागांत मोठ्या प्रमाणावर लाखो रुपये खर्चून काँक्रीट रस्ते व नाल्याचे बांधकाम करण्यात आले;

सुरेश सवळे चांदूरबाजार

चांदूरबाजार नगरपरिषद हद्दीतील बहुतेक सर्व प्रभागांत मोठ्या प्रमाणावर लाखो रुपये खर्चून काँक्रीट रस्ते व नाल्याचे बांधकाम करण्यात आले; मात्र त्यात सध्याच्या स्थितीत पाणी वाहून जाण्याच्या ऐवजी कचऱ्याचे ढिगच दिसतात. परिणामी येत्या पावसाच्या दिवसात पाणी वाहून जाण्याला मार्गच उरला नाही. तर वस्तीतील नाल्या नियमित साफ केल्या जात नसल्यामुळे त्यात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. या सर्व बाबी टाळण्यासाठी नियोजन करणे आवश्यक आहे. मात्र अद्याप कुठेही बाजार ओळीत नियोजन झालेले दिसत नाही. या नाल्या पावसाच्या पाण्यामुळे धोकादायक झाल्या असून पावसाळ्यापूर्वीचे नियोजन थंडबस्त्यात पडलेले दिसत आहे. तसेही सफाई कामगारांच्या मनुष्यबळाअभावी नियमित स्वच्छता मोहिमेचे तीनतेरा झाले आहे. प्रशासनाच्यावतीने पावसाळा सुरू होण्यापूर्वी नियोजनपूर्व कामे करण्याच्या सूचना दिल्या जातात. मात्र या सूचनांचे पालन कितपत केले जाते याचे ताजे उदाहरण म्हणजे चांदूरबाजार नगरपरिषद आहे. पावसाळा सुरू झाला असतानाही शहरातील नाल्या, गटाराची साफसफाई व पावसाळ्यापूर्वी नियोजनात्मक राबविण्यात येणारी कामे अद्यापही पूर्ण करण्यात आली नाहीत. त्यामुळे शहरवासीयांना भविष्यात मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. बाहेरील मनुष्यबळ लावून काही नाल्यांची साफसफाई सुरू असली तरी ती योग्य प्रकारे केली जाते काय, यावर पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे दिसते. चांदूरबाजार शहर आणि ठिकठिकाणी साठविला जाणारा कचरा यांचा शहरातील नागरिकांसोबत जवळचा संबंध आहे. केरकचऱ्याची नियमित विल्हेवाट न लावणे, नाल्या नियमित उपसा न करणे, साफ केलेल्या नाल्यांमधील कचरा दोन-दोन दिवस तसाच ठेवणे या सर्व बाबी शहरवासीयांना नित्याच्याच झाल्या आहेत. खरे तर या सर्व बाबींची जबाबदारी नगर परिषदेची असताना याकडे दुर्लक्ष झाल्याने शहरातील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. स्टेट बँकेसमोर २७ लाख रुपये खर्च करुन काँक्रीट रस्ता व नालीचे बांधकाम करण्यात आले. तसेच पालिकेच्या जुन्या इमारत परिसरात १२ लाख रुपये खर्च करुन मुख्य नालीचे बांधकाम करण्यात आले. मात्र त्यातून आतापर्यंतही पाणी वाहून गेले नाही. उलट या सर्व मोठ्या नाल्या कचऱ्याने भरलेल्या आहेत. नेताजी चौक ते किसन पुतळ्यापर्यंत असलेली बंद नाली बांधकाम झाले तेव्हापासून साफ केल्या नाही. त्यामुळे पावसाचे पाणी दुकानात शिरते. याचाही विचार येथील बांधकामाच्या वेळी करण्यात आला नाही. शहरातील काही नाल्या जुन्या असून काहींवर अतिक्रमण झाल्याने त्या स्वच्छ करणे शक्य होत नाही. त्यामुळे या नाल्या पाणी वाहून नेण्याच्या कामी न येता डोकेदुखी ठरत आहेत. या समस्येकडे न.प. प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.