शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

नगरोत्थान महाअभियान : तब्बल २१९ कोटींतून अमरावती शहरातील रस्ते होणार चकाचक! १२ रस्त्यांचे होणार काँक्रीटीकरण

By प्रदीप भाकरे | Updated: March 14, 2024 13:04 IST

तत्पूर्वीच्या २० फेब्रुवारी रोजीच्या शासन निर्णयानुसार ७३.२० कोटी रुपयांच्या रस्ते विकास प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे. त्यातून बडनेरा हद्दीतील चार रस्त्यांची निर्मिती केली जाणार आहे.

अमरावती : नगरोत्थान महाभियानांतर्गत अमरावती शहरातील तब्बल २१९ कोटी रुपयांच्या रस्ते विकास प्रकल्पाला नगरविकास विभागाने मान्यता दिली आहे. ११ मार्च रोजीच्या मान्यतेनुसार, आठ रस्त्यांवर १४७ कोटी ७५ लाख रुपये खर्च होणार आहेत. तर तत्पूर्वीच्या २० फेब्रुवारी रोजीच्या शासन निर्णयानुसार ७३.२० कोटी रुपयांच्या रस्ते विकास प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे. त्यातून बडनेरा हद्दीतील चार रस्त्यांची निर्मिती केली जाणार आहे.

             नगरविकास विभागाने ११ मार्च रोजी ज्या १४७.७५ कोटींच्या रस्ते विकास प्रकल्पाला मान्यता दिली, त्यात रस्ते निर्मितीवर ११८ कोटी रुपये खर्च होणार आहेत. त्यातील ६ कोटी ३३ लाख रुपये नवसारी ते पाठ्यपुस्तक मंडळ ते राममोहननगर, २४.७५ कोटी रुपये नवसारीतील डॉ. पंजाबराव देशमुख को-ऑप. बॅंक ते वली चौक, १८.१० कोटींमधून अमन बोअरवेल ते कठोरा रोड असा काॅंक्रीट रस्ता, पेव्हिंग ब्लॉक, साइड ड्रेन होणार आहे. याशिवाय, ६.२५ कोटींमधून शेगाव नाका रहाटगाव, एसएसडी बंगलो ते यशस्वी अपार्टमेंट, अर्जुननगर रस्ता, १०.६४ कोटींमधून तपोवन सात बंगला ते पुलापर्यंत, १३.५७ कोटींमधून तपोवनमधील सात बंगला ते मालू ले-आऊटपर्यंतचे काॅंक्रीटीकरण केले जाणार आहे. २३.२५ कोटींमधून तपोवनमधील राजमाता कॉलनी ते आयटीआय कॉलेज रोडपर्यंतचे काॅंक्रीटीकरण केले जाईल. तर १६ कोटी ६ लाख रुपयांमधून जावरकर लॉन ते रिंगरोडपर्यंतचा काॅंक्रीट रोड पेव्हिंग ब्लॉकसह बनवला जाणार आहे. वर्कऑर्डरच्या १८ महिन्यांत हे काम पूर्ण करायचे आहे.

//////

४४.३३ कोटी रुपये महापालिकेचा सहभाग१४७.७५ कोटी रुपयांच्या रस्ते विकास प्रकल्पासाठी १०३.४२ कोटी रुपये राज्य शासन अनुदान म्हणून देईल. तर ४४.३३ कोटी रुपये अमरावती महापालिकेचा सहभाग राहील. अर्थात एएमसीला ४४.३३ कोटी रुपये स्वहिस्सा म्हणून द्यावा लागेल. तर दुसरीकडे ७३.२० कोटींच्या मंजूर रस्ते विकास प्रकल्पासाठी ५१.२४ कोटी रुपये राज्य शासन देईल. तर २१.९६ कोटी रुपये महापालिकेला स्वउत्पन्नातून खर्च करावे लागणार आहेत.कार्यान्वयन अमरावती महापालिकेकडेया दोन्ही प्रकल्पांची कार्यान्वयन यंत्रणा अमरावती महानगरपालिका असेल. संगणकीय प्रणालीचे एकात्मिकीकरण करून त्यांच्या कामकाजाचे पूर्ण संगणकीकरण करणे अनिवार्य राहील. यात प्रामुख्याने ई-गव्हर्नन्स, लेखा, जन्म-मृत्यू नोंद सुधारण्याची संपूर्ण अंमलबजावणी करणे आदी बाबी बंधनकारक राहतील. उचित वापरकर्ता शुल्क लागू करून किमान एकूण मागणीच्या ८० टक्के वसुली करणे. नागरी क्षेत्रातील गरिबांसाठी अर्थसंकल्पात विवक्षित निधीची तरतूद करणे. महानगरपालिकेने त्यांच्या कार्यक्षेत्रातील घन व ओल्या कचऱ्याचे व्यवस्थापन उचितरीत्या करणे बंधनकारक राहील. सर्व इमारतींसाठी पर्जन्य जल पुनर्भरण करावे.

टॅग्स :Amravatiअमरावती