शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर-मुंबई दु्रतगती महामार्ग शेतकऱ्यांना देशोधडीला लावणार

By admin | Updated: September 13, 2016 00:17 IST

राज्य शासनाने सरकारचा सन २०१३ चा भूसंपादन कायदा बाजूला ठेवत नव्याने मंजूर केलेला नागपूर- मुंबई दु्रतगती शिघ्रसंचार महामार्ग ...

पत्रपरिषद : वीरेंद्र जगताप यांचा आरोप, १४ ला धरणे आंदोलनअमरावती : राज्य शासनाने सरकारचा सन २०१३ चा भूसंपादन कायदा बाजूला ठेवत नव्याने मंजूर केलेला नागपूर- मुंबई दु्रतगती शिघ्रसंचार महामार्ग हा अमरावतीसह विभागातील तमाम शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्यासाठीचे षड्यंत्र असल्याचा आरोप आ.वीरेंद्र जगताप यांनी केला आहे. सोमवारी ते जिल्हा परिषदेत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.नागपूर - मुंबई हा दोन महानगरांना तासी १५० किमी वेगाने जोडणाऱ्या महामार्गाकरिता जमीन भूसंचयन अधिग्रहणाच्या कार्यवाहीला सुरूवात झाली आहे. अमरावती विभागातील वाशिम, बुलडाणा, अमरावती जिल्ह्यांतून २ हजार ३५१ शेतकऱ्यांची पाच हजार हेक्टर जमीन २५७ किमीच्या रस्त्याकरिता घेतली जाणार आहे. शेतकऱ्यांना सहभागी करून दहा जिल्ह्यांतील ३० तालुक्यांतून जाणारा रस्ता २०१९ पर्यंत पूर्ण करण्याचे शासनाने जाहीर केले. मात्र शेतकऱ्यांना दाखविलेले स्वप्न शेतकरी शेतमजुरांचे विघ्न ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. शासनाने या महामार्गासाठी शेतजमीन अधिग्रहण कायदा २०१३ नुसार भागीदार पद्धतीच्या प्रकल्पाकरिता बाधित शेतकऱ्यांच्या ७० टक्के सहमतीची गरज असताना शासनाकडून लाभाच्या-लोभाच्या योजनांचे गाजर दाखविले जात असल्याचा आरोप तुकाराम भस्मे यांनी केला आहे. या नव्या महार्गाला समांतर पूर्वीच दोन महामार्ग उपलब्ध असताना याच दोन शहरांना जोडणाऱ्या नव्या महामार्गाची गरज काय, असे एक ना अनेक प्रश्न यावेळी त्यांनी उपस्थित केले. या रस्त्याच्या शेतजमिनी अधिग्रहण करण्याला शेतकऱ्यांचा विरोध असतानाही शासन अधिग्रहण, भूसंचयन करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिढ्यान् पिढ्या बरबाद करणाऱ्या शासनाच्या या धोरणाला विरोध करण्यासाठी व शेतकऱ्यांनच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून न्याय हक्कासाठी हा लढा असल्याचे जपताप म्हणाले. यासाठी विभागातील बाधित शेतकरी व शेतमजुरांच्यावतीने विभागीय आयुक्त कार्यालयासमोर विशेष धरणे आंदोलन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आ.जगताप, आ.अमित झनक, रणजित कांबळे, अमर काळे, राहुल बोंद्रे, हर्षवर्धन सपकाळ, जि.प.अध्यक्ष सतीश उईके, तुकाराम भस्मे, व अन्य नेते उपस्थित राहतील. पत्रकार परिषदेला जि.प. अध्यक्ष सतीश उईके, तुकाराम भस्मे, प्रमोद तऱ्हेकर, मोहन पाटील आदी उपस्थित होते.