शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

नगरपंचायत निवडणूक पराभूत उमेदवारांची मतदारांकडून वसुली

By admin | Updated: November 5, 2015 00:16 IST

नगरपंचायत निवडणुकीसाठी मतांचा जोगवा मागताना शेवटच्या दोन दिवसांत काही उमेदवारांनी मतदारांना भेटवस्तू दिल्यात.

मत दिले नाही, भेट वस्तू परत करा !अमरावती : नगरपंचायत निवडणुकीसाठी मतांचा जोगवा मागताना शेवटच्या दोन दिवसांत काही उमेदवारांनी मतदारांना भेटवस्तू दिल्यात. मात्र , मतदान दुसऱ्याच उमेदवाराला केले. मतदारांनी दिलेल्या या चकम्यामुळे पराभूत उमेदवार या भेटवस्तू परत मागत आहेत. ज्या कार्यकर्त्यांनी या भेटवस्तू मतदारांना दिल्यात तेच कार्यकर्ते तुम्ही ‘त्या’ उमेदवाराला मत दिले नाही ना? आता भेटवस्तू परत करा, असे सुनावताना दिसत आहेत. यामध्ये त्या मतदारांची मात्र अडचण झाली आहे. जिल्ह्यातील तिवसा, भातकुली, धारणी व नांदगाव खंडेश्वर या चार नगरपंचायतींचे निकाल सोमवारी जाहीर झालेत. मतदारांनी उमेदवारांच्या आमिषाला बळी न पडता मतदान केले. मात्र, काही मतदार उमेदवारांनी दिलेल्या आमिषाला बळी पडले. त्यांनी भेटवस्तू स्वीकारल्या. प्रत्यक्षात निकालानंतर उमेदवाराला मिळालेल्या मतांची संख्या पाहता भेटवस्तू व मतांच्या संख्येचा ताळमेळच जुळत नाही. चर्चेवर झाले शिक्कामोर्तबअमरावती : अवाढव्य खर्च करुनही पदरी आलेला पराभव जिव्हारी लागल्याने या उमेदवारांनी निकाल जाहीर झाल्यानंतर लगेच त्याच सायंकाळपासून भेटवस्तू परत मागण्याचा सपाटा लावला आहे. तालुका मुख्यालयी ग्रामपंचायतऐवजी नगरपंचायत स्थापित झाल्यानंतर काही उमेदवार बाशिंग बांधून तयार झाले होते. निवडणूक प्रक्रिया जाहीर होताच त्यांनी घरोघरी भेटी देण्याचा सपाटा लावला होता. प्रचाराच्या अखेरच्या दिवसांत काही मतदारांना भेटवस्तू दिल्याची चर्चा होती. मात्र, आता भेटवस्तू परत मागण्याचा प्रकार समोर आल्याने मतदारांना आमिष व भेटवस्तू दिल्याच्या चर्चेवर शिक्कामोर्तब झाले आहे.