शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
3
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
4
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
5
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
6
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
7
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
8
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
9
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
10
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
11
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
12
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
13
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
14
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
15
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
16
Indian Railway: आता रेल्वेतही विमानासारखा नियम; ‘जादा' सामान बाळगल्यास दंड!
17
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
18
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
19
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
20
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...

माझ्या भेटीने 'त्यांना' का उठावे पोटशूळ ?

By admin | Updated: June 18, 2015 00:25 IST

जिल्ह्यातील रखडलेल्या विकास कामांसंदर्भात दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांची मी भेट घेतली.

रावसाहेब शेखावत : मिसाईल कारखान्यासाठी राजनाथसिंहांशी भेटअमरावती : जिल्ह्यातील रखडलेल्या विकास कामांसंदर्भात दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांची मी भेट घेतली. या भेटीचा अन्वयार्थ राजकीय बदलांशी लावला जात आहे. तथापि, काँग्रेसशी आमच्या घराण्याची कायम निष्ठा आहे. मी कुणाची भफट घेतली असेल तर काहींनी पोटशूळ का उठावे, असा सवाल आमदार रावसाहेब शेखावत यांनी उपस्थित केला. राजनाथसिंह यांच्याशी घेतलेल्या भेटीचा राजकीय अन्वयार्थ लावला जात असल्याच्या पार्श्वभूमीवर ते 'लोकमत'शी बोलत होते. देश व राज्यात भाजपचे शासन आहे. विकास कामांसाठी काँग्रेस नेत्यांनी भाजपकडे जाऊ नये, असा नियम नाही. मी आमदार नसलो तरी माझ्या कारकिर्दीत मुहूर्तमेढ रोवलेली कामे व्हावीत यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील असतो. त्यासाठी मंत्र्यांची भेट घेणे, रखडलेल्या कामांना गती देण्यासाठीचा आग्रह धरणे हा माझ्या कार्यशैलीचा भाग आहे. सत्तेत नसतानाही मी विकासकामांसाठी आग्रही असतो त्यामुळेच काहींची आता धडधड वाढली आहे. माझ्या पक्षांतराच्या वावड्या हा त्याच भितीपोटीचा परिणाम होय, अशा शब्दांत रावसाहेबांनी त्यांच्या पक्षांतराच्या बातम्या पसरविणाऱ्यांवर निशाना साधला. देशात काँग्रेसचे शासन असताना भाजपचे अनेक नेते काँग्रेसच्या नेत्यांकडे येवून विकास कामांसाठी आग्रह धरायचे. त्यामुळे भाजपचे नेते काँग्रेसवासी होताहेत, अशी चर्चा केली जात नव्हती. देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या पुढाकारामुळेच अमरावतीत विमानरोधक मिसाईल निर्मिती कारखान्याची पायाभरणी करण्यात आली. माझ्या मातोश्रींमुळे अमरावतीच्या वाट्याला आलेल्या या महत्त्वाकांक्षी उद्योगाला मूर्त रूप मिळावे यासाठी मी भाजप सरकारच्या प्रभावी मंत्र्याची भेट घेतली. बडनेऱ्याचा रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखाना आणि पंचतारांकित एमआयडीसीत नव्या उद्योगांना चालना या मुद्यांवरही चर्चा झाली. सत्ता बदलत असली तरी विकासकामांसाठी कार्यरत राहणे हे नेत्यांचे कर्तव्यच आहे. मी तेच पार पाडले. त्यासाठी इतका कांगावा कशाला, असा प्रतिप्रश्न त्यांनी विरोधकांना केला. (प्रतिनिधी)आमच्या मनातही नाही, त्यांना स्वप्ने का पडावीत?शेखावत कटुंबीयांनी कॉग्रेसची साथ कधीही सोडली नाही. काँग्रेसशी आम्ही जी निष्ठा बाळगली त्याची वेगळी पावती देण्याची गरज आहे काय? काँग्रेसमुळेच प्रतिभाताई पाटील देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती झाल्यात. त्यांच्या रुपाने अमरावतीलाही हा मान प्राप्त होऊ शकला. सत्तेसाठी पक्षांतर हा विचारही आम्हाला शिवत नसताना 'काही मोजक्या' मंडळींनाच त्याबाबत स्वप्ने का पडतात, हा संशोधनाचा खरा विषय असल्याची मल्लीनाथी रावसाहेबांनी केली.