शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे गैरसमज दूर व्हावे

By admin | Updated: June 29, 2014 23:42 IST

अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची पदवी घेतल्यानंतर रोजगाराची संधी नाही, महागडे शिक्षण, स्पर्धा परीक्षांना वेळ मिळत नाही, सर्वसामान्यांना न झेपणारा हा अभ्याक्रम अशा अनेक प्रकारचे गैरसमज समाजात

पत्रपरिषद : अभियांत्रिकी प्राचार्य फोरमचे आवाहनअमरावती : अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची पदवी घेतल्यानंतर रोजगाराची संधी नाही, महागडे शिक्षण, स्पर्धा परीक्षांना वेळ मिळत नाही, सर्वसामान्यांना न झेपणारा हा अभ्याक्रम अशा अनेक प्रकारचे गैरसमज समाजात चुकीच्या पद्धतीन पसरविले जात आहे. मात्र अभियांत्रिकी क्षेत्रात रोजगाराची मोठी संधी असून याबाबतचे गैरसमज दूर करावे, असे आवाहन प्राचार्य फोरमच्यावतीने शनिवारी येथे करण्यात आले आहे.येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात पार पडलेल्या पत्रपरिषदेत अभियांत्रिकी क्षेत्रात रोजगाराच्या उपलब्ध संधीचा पाढा वाचला गेला. २०२० सालापर्यंत २५ लाख अभियंत्याची देशाला गरज असल्याचे पंतप्रधान कार्यालयाने कळविले आहे. ३७ लाख अभियंत्याना आयटी क्षेत्रात रोजगार मिळणार आहे. पाच कोटी क्षमता असलेले मनुष्यबळ येत्या काही वर्षात लागणार असल्याने या मनुष्यबळासाठी अभियंत्यांची गरज भासणार आहे. दीड लाख पात्र अभियांत्रिकी प्राध्यापकांची आवश्यकता असल्याचे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने म्हटले आहे. त्यामुळे अभियांत्रिकी क्षेत्रात रोजगाराच्या संधी नाहीत, हा गैरसमज दूर होणे गरजेचे आहे, असे हव्याप्र महाविद्यालयाचे संचालक श्रीकांत चेंडके यांनी सांगितले.सुरेश पाटील यांनी अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना शासनाकडून मिळणाऱ्या शिष्यवृत्तीची माहिती दिली. डी.टी इंगोले यांनी अमरावती व नागपूर परिसरातील अभियांत्रिकी महाविद्यालये आणि विद्यार्थ्याबाबत गैरसमज पसरविण्याचा डाव असल्याचा आरोप केला. ए.बी. मराठे यांनी अभियांत्रिकी अभ्यासक्रमातून विद्यार्थी कमी झाल्याचे तोटे विशद केले. जी.आर. बमनोटे यांनी अभियांत्रिकी प्रवेशाबाबतची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. या क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. रोजगार नाही हे गैरसमज पसरविण्यामागे राजकारण असल्याचेही ते म्हणाले.