शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

‘माझी कन्या भाग्यश्री’, अनेक बदलानंतर लागू

By admin | Updated: February 28, 2017 00:19 IST

मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे. यामध्ये ‘माझी कन्या भाग्यश्री’ ही योजनादेखील आहे.

मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी योजना : गावासह बीपीएल कुटुंबांना लाभअमरावती : मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे. यामध्ये ‘माझी कन्या भाग्यश्री’ ही योजनादेखील आहे. आता योजनेच्या निकषामध्ये बदल करण्यात आला आहे. नव्या निकषासह राबविण्याचा निर्णय २२ फेब्रुवारीला आरोग्य विभागाने घेतला. मुलींचा जन्मदर अधिक असलेल्या ग्रामपंचायतींचा गौरव करण्यात येणार आहे. तसेच बीपीएल कुटुंबासह असा सर्वसामान्य कुटुंबातील या योजनेचा लाभ मिळणार आहे. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबात मुलगी जन्माला आली, तर तिच्या शिक्षणापासून ते आरोग्याची काळजी घेण्यासाठी शासन मदत करते, ही योजना ‘सुकन्या’ नावाने १ जानेवारी २०१४ पासून सुरू करण्यात आली. मात्र या योजनेत अनेक मर्यादा होत्या. त्यामुळे यात बदल व काही निकषामध्ये सुधारणा करून २०१६ पासून ‘माझी कन्या भाग्यश्री’ ही योजना अंमलात आणली. मात्र या योजनेची अंमलबजावणी करण्यापूर्वीच थांबविण्यात आली होती. आता मात्र योजनेच्या अनेक निकषात बदल करून ही योजना २२ फेब्रुवारीपासून राज्यात लागू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबासह सर्वसामान्य कुटुंबातील मुलींना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. राज्यात मुलींचे शिक्षण, आरोग्य यात सुधारणा करणे, बालिका भू्रणहत्या रोखणे, मुलींच्या जन्मदराबाबत, समाजात सकारात्मक विचार आणणे, बालविवाह रोखणे, मुलांइतकाच मुलींचा जन्मदर वाढविणे आदींसाठी सरकार प्रयत्नशील आहे. या प्रयत्नात सरकारला यशदेखील येत आहे. मात्र आता या योजनेची व्याप्ती वाढवून ‘माझी कन्या भाग्यश्री’ ही योजना नव्या रुपात अंमलात आणली जाणार आहे. आरोग्य विभागाच्या या निर्णयामुळे गावागावांमध्ये मुलांपेक्षा मुलींचा टक्का वाढविण्यास मदत होणार आहे व मुलींचे प्रमाण ज्या गावात अधिक राहणार आहे, त्या गावांचा आरोग्य विभागाद्वारा गौरव करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ आता पुढील आर्थिक वर्षापासून मिळणार आहे. (प्रतिनिधी)१८ वर्षांनंतर मुलींना मिळणार एक लाखया योजनेंतर्गत एक वर्षाच्या आत आरोग्य विभागाद्वारा २१ हजार २०० रुपये मुलीच्या नावे गुंतविणार आहे व मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतर तिला एक लाख रुपये मिळणार आहे. ही योजना प्रभावीपणे राबवावी, यासाठी संबंधित ग्रामपंचयतीला सरकार प्रोत्साहनपर बक्षीस देणार आहे. ज्या गावात मुलांपेक्षा मुलींचे प्रमाण असेल, त्या ग्रामपंचायतीला पाच लाखांचे बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे. मुलीस मिळणाऱ्या एक लाखापैकी १० हजार रुपये मुलीच्या शिक्षणावर खर्च करणे बंधनकारक आहे. एपीएल, बीपीएल कुटुंबात दोन मुलीपर्यंत लाभया योजनेचा एपीएल व बीपीएल कुटुंबामध्ये पहिल्या दोन मुलींपर्यंत लाभ देण्यात येणार आहे. तिसऱ्या अपत्यासाठी हा लाभ देय नाही. मुलीचे वडील महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे बंधनकारक आहे. अर्ज करताना बालिकेचे जन्म नोंदणी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. विम्याचा लाभ घेताना मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण होणे आवश्यक आहे. तसेच तिने इयत्ता दहावीची परीक्षा उत्तीर्ण करणे अनिवार्य आहे. दुसऱ्या मुलीच्या लाभासाठी कुटुंब नियोजनाचे प्रमाणपत्र आवश्यकपहिल्या मुलीसाठी लाभ घेताना कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया केल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक नाही. मात्र, दुसऱ्या मुलीच्या लाभासाठी पालकांना हे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. ही योजना आधारशी जोडण्यात येणार आहे. तसेच बालगृहातील अनाथ मुलींसाठीही लागू आहे. मुलीचा १८ वर्षांची होण्यापूर्वीच मृत्यू झाल्यास योजनेचा फायदा तिच्या पालकांना मिळणार नसून, बँक खात्यात जमा होणारी रक्कम शासनजमा करण्यात येणार आहे.