शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

‘माझी कन्या भाग्यश्री’, अनेक बदलानंतर लागू

By admin | Updated: February 28, 2017 00:19 IST

मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे. यामध्ये ‘माझी कन्या भाग्यश्री’ ही योजनादेखील आहे.

मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी योजना : गावासह बीपीएल कुटुंबांना लाभअमरावती : मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे. यामध्ये ‘माझी कन्या भाग्यश्री’ ही योजनादेखील आहे. आता योजनेच्या निकषामध्ये बदल करण्यात आला आहे. नव्या निकषासह राबविण्याचा निर्णय २२ फेब्रुवारीला आरोग्य विभागाने घेतला. मुलींचा जन्मदर अधिक असलेल्या ग्रामपंचायतींचा गौरव करण्यात येणार आहे. तसेच बीपीएल कुटुंबासह असा सर्वसामान्य कुटुंबातील या योजनेचा लाभ मिळणार आहे. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबात मुलगी जन्माला आली, तर तिच्या शिक्षणापासून ते आरोग्याची काळजी घेण्यासाठी शासन मदत करते, ही योजना ‘सुकन्या’ नावाने १ जानेवारी २०१४ पासून सुरू करण्यात आली. मात्र या योजनेत अनेक मर्यादा होत्या. त्यामुळे यात बदल व काही निकषामध्ये सुधारणा करून २०१६ पासून ‘माझी कन्या भाग्यश्री’ ही योजना अंमलात आणली. मात्र या योजनेची अंमलबजावणी करण्यापूर्वीच थांबविण्यात आली होती. आता मात्र योजनेच्या अनेक निकषात बदल करून ही योजना २२ फेब्रुवारीपासून राज्यात लागू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबासह सर्वसामान्य कुटुंबातील मुलींना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. राज्यात मुलींचे शिक्षण, आरोग्य यात सुधारणा करणे, बालिका भू्रणहत्या रोखणे, मुलींच्या जन्मदराबाबत, समाजात सकारात्मक विचार आणणे, बालविवाह रोखणे, मुलांइतकाच मुलींचा जन्मदर वाढविणे आदींसाठी सरकार प्रयत्नशील आहे. या प्रयत्नात सरकारला यशदेखील येत आहे. मात्र आता या योजनेची व्याप्ती वाढवून ‘माझी कन्या भाग्यश्री’ ही योजना नव्या रुपात अंमलात आणली जाणार आहे. आरोग्य विभागाच्या या निर्णयामुळे गावागावांमध्ये मुलांपेक्षा मुलींचा टक्का वाढविण्यास मदत होणार आहे व मुलींचे प्रमाण ज्या गावात अधिक राहणार आहे, त्या गावांचा आरोग्य विभागाद्वारा गौरव करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ आता पुढील आर्थिक वर्षापासून मिळणार आहे. (प्रतिनिधी)१८ वर्षांनंतर मुलींना मिळणार एक लाखया योजनेंतर्गत एक वर्षाच्या आत आरोग्य विभागाद्वारा २१ हजार २०० रुपये मुलीच्या नावे गुंतविणार आहे व मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतर तिला एक लाख रुपये मिळणार आहे. ही योजना प्रभावीपणे राबवावी, यासाठी संबंधित ग्रामपंचयतीला सरकार प्रोत्साहनपर बक्षीस देणार आहे. ज्या गावात मुलांपेक्षा मुलींचे प्रमाण असेल, त्या ग्रामपंचायतीला पाच लाखांचे बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे. मुलीस मिळणाऱ्या एक लाखापैकी १० हजार रुपये मुलीच्या शिक्षणावर खर्च करणे बंधनकारक आहे. एपीएल, बीपीएल कुटुंबात दोन मुलीपर्यंत लाभया योजनेचा एपीएल व बीपीएल कुटुंबामध्ये पहिल्या दोन मुलींपर्यंत लाभ देण्यात येणार आहे. तिसऱ्या अपत्यासाठी हा लाभ देय नाही. मुलीचे वडील महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे बंधनकारक आहे. अर्ज करताना बालिकेचे जन्म नोंदणी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. विम्याचा लाभ घेताना मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण होणे आवश्यक आहे. तसेच तिने इयत्ता दहावीची परीक्षा उत्तीर्ण करणे अनिवार्य आहे. दुसऱ्या मुलीच्या लाभासाठी कुटुंब नियोजनाचे प्रमाणपत्र आवश्यकपहिल्या मुलीसाठी लाभ घेताना कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया केल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक नाही. मात्र, दुसऱ्या मुलीच्या लाभासाठी पालकांना हे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. ही योजना आधारशी जोडण्यात येणार आहे. तसेच बालगृहातील अनाथ मुलींसाठीही लागू आहे. मुलीचा १८ वर्षांची होण्यापूर्वीच मृत्यू झाल्यास योजनेचा फायदा तिच्या पालकांना मिळणार नसून, बँक खात्यात जमा होणारी रक्कम शासनजमा करण्यात येणार आहे.