शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

बँकेत ‘मसल पाॅवर’ वाढले, संचालकांना ‘व्हाईस’ नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 05:00 IST

बॅंकेच्या अध्यक्षांनी गडबड, घोटाळा केला, ही बाब वैधानिक ऑडिटमध्ये आता स्पष्ट झाली आहे. जिल्हा बॅंकेचा कारभार एवढा रसातळाला गेला की, नाबार्डच्या मुद्द्यांवरूनच बॅंक बरखास्त होईल, अशी स्थिती आहे. बॅंकेत शेतकरी कर्ज वाटपाचा आलेख बघितल्यास खरेच कोण शेतकऱ्यांच्या हिताचे आहे, हे दिसून येते. बॅंकेवर प्रशासक नेमताच शेतकरी कर्ज वाटपाचा आलेख वाढला, असेही खोडके यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक ही शेतकऱ्यांची असताना गत ११ वर्षांपासून शेतकऱ्यांना कर्ज न देता दलालांमार्फत ही रक्कम कंपन्यांमध्ये गुंतविण्यात आली. बॅंकेत सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांना लुबाडण्याचे काम केले असून, त्यांची ‘मसल पाॅवर’ वाढल्याने संचालकांना ‘व्हाईस’ नाही, असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा ओबीसी प्रवर्गातून बॅंकेत संचालकपदाचे उमेदवार संजय खोडके यांनी शुक्रवारी येथे केला. ४ ऑक्टोबर रोजी होऊ घातलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक निवडणुकीच्या अनुषंगाने परिवर्तन पॅनेलचा जाहीरनामा जाहीर करताना ते बोलत होते. संजय खोडके यांच्या मते, बॅंकेची निवडणूक महत्त्वाची नाही, तर शेतकरी वाचला पाहिजे, तो जगला पाहजे, यासाठी ही लढाई आहे. पक्ष, विचार वेगवेगळे असताना जिल्ह्यातील विविध नेते शेतकऱ्यांची बॅंक वाचविण्यासाठी एकत्र आले आहेत. बॅंकेच्या अध्यक्षांनी गडबड, घोटाळा केला, ही बाब वैधानिक ऑडिटमध्ये आता स्पष्ट झाली आहे. जिल्हा बॅंकेचा कारभार एवढा रसातळाला गेला की, नाबार्डच्या मुद्द्यांवरूनच बॅंक बरखास्त होईल, अशी स्थिती आहे. बॅंकेत शेतकरी कर्ज वाटपाचा आलेख बघितल्यास खरेच कोण शेतकऱ्यांच्या हिताचे आहे, हे दिसून येते. बॅंकेवर प्रशासक नेमताच शेतकरी कर्ज वाटपाचा आलेख वाढला, असेही खोडके यांनी सांगितले. बॅंकेचे अध्यक्षांना ईडीची नोटीस आल्याच्या प्रश्नावर संजय खोडके यांनी ‘ईडीचा ऊहापोह नको’ असे म्हणत याविषयी बोलणे टाळले. मात्र, बॅंकेत अपहार, भ्रष्टाचार झाला, हे कुणीही लपवू शकत नाही, याला त्यांनी दुजोरा दिला. आता बॅंकेत गैरव्यवहारांच्या चौकशीचे सत्र सुरू झाले असून, दोषींना त्यांचे कर्म एक दिवस दिसून पडेल, असे संजय खोडके म्हणाले. बॅंकेच्या गैरव्यवहाराला संचालक नव्हे तर अध्यक्षच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी यावेळी  केला. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत संचालकांची सभा पाच मिनिटांत गुंडाळली जाते, यापेक्षा मोठे दुर्दैव काय असेल, असा सवालही खोडके यांनी उपस्थित केला. यावेळी राज्यमंत्री बच्चू कडू, भाजपचे नेते, माजी आमदार अरुण अडसड, श्री. शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, माजी मंत्री वसुधा देशमुख, आमदार सुलभा खोडके, आमदार प्रताप अडसड, आमदार राजकुमार पटेल, राजेश वानखडे यांनी मनोगत व्यक्त केले. राजेंद्र महल्ले, माया हिवसे, रवींद्र गायगोले, सुधीर सूर्यवंशी, जयश्री देशमुख उपस्थित होते.

दोषींची आता सुटका नाही : प्रताप अडसडजिल्हा बॅंकेत अपहार, घोटाळा झाला, हे आता कागदोपत्री स्पष्ट झाले आहे. ही निवडणूक संचालकपदासाठी नव्हे तर शेतकरी हितासाठी लढविली जात आहे. ३.४९ कोटी ही अपहाराची रक्कम लहान आहे. बॅंकेत मोठा अपहार झाला असून, आता दोषींची सुटका नाही, असा दावा आमदार प्रताप अडसड यांनी केला आहे. माझ्या पत्रानंतर बॅंकेत चौकशी, ईडी, ऑडिट सुरू झाले. ५ ते ७ कोटींचे सॉफ्टवेअरचे घबाड असल्याचा आरोप आमदार अडसड यांनी केला. 

बंटी, बबलीचे कारस्थान उघड करू: देशमुखजिल्हा बँकेची निवडणूक ही बंटी, बबलीचे कारस्थान थांबविण्यासाठी लढविली जात आहे. बॅंकेचा कारभार हा शेतकऱ्यांसाठी असावा, यासाठी ही लढाई आहे. भ्रष्टाचाराचा डंख शिट्टी वाजवून थांबविणार असल्याचे शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी सांगितले. ही लढाई भ्रष्टाचाराविरोधी असल्याचे ते म्हणाले.

 

टॅग्स :bankबँकBacchu Kaduबच्चू कडू