शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

बँकेत ‘मसल पाॅवर’ वाढले, संचालकांना ‘व्हाईस’ नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 05:00 IST

बॅंकेच्या अध्यक्षांनी गडबड, घोटाळा केला, ही बाब वैधानिक ऑडिटमध्ये आता स्पष्ट झाली आहे. जिल्हा बॅंकेचा कारभार एवढा रसातळाला गेला की, नाबार्डच्या मुद्द्यांवरूनच बॅंक बरखास्त होईल, अशी स्थिती आहे. बॅंकेत शेतकरी कर्ज वाटपाचा आलेख बघितल्यास खरेच कोण शेतकऱ्यांच्या हिताचे आहे, हे दिसून येते. बॅंकेवर प्रशासक नेमताच शेतकरी कर्ज वाटपाचा आलेख वाढला, असेही खोडके यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक ही शेतकऱ्यांची असताना गत ११ वर्षांपासून शेतकऱ्यांना कर्ज न देता दलालांमार्फत ही रक्कम कंपन्यांमध्ये गुंतविण्यात आली. बॅंकेत सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांना लुबाडण्याचे काम केले असून, त्यांची ‘मसल पाॅवर’ वाढल्याने संचालकांना ‘व्हाईस’ नाही, असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा ओबीसी प्रवर्गातून बॅंकेत संचालकपदाचे उमेदवार संजय खोडके यांनी शुक्रवारी येथे केला. ४ ऑक्टोबर रोजी होऊ घातलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक निवडणुकीच्या अनुषंगाने परिवर्तन पॅनेलचा जाहीरनामा जाहीर करताना ते बोलत होते. संजय खोडके यांच्या मते, बॅंकेची निवडणूक महत्त्वाची नाही, तर शेतकरी वाचला पाहिजे, तो जगला पाहजे, यासाठी ही लढाई आहे. पक्ष, विचार वेगवेगळे असताना जिल्ह्यातील विविध नेते शेतकऱ्यांची बॅंक वाचविण्यासाठी एकत्र आले आहेत. बॅंकेच्या अध्यक्षांनी गडबड, घोटाळा केला, ही बाब वैधानिक ऑडिटमध्ये आता स्पष्ट झाली आहे. जिल्हा बॅंकेचा कारभार एवढा रसातळाला गेला की, नाबार्डच्या मुद्द्यांवरूनच बॅंक बरखास्त होईल, अशी स्थिती आहे. बॅंकेत शेतकरी कर्ज वाटपाचा आलेख बघितल्यास खरेच कोण शेतकऱ्यांच्या हिताचे आहे, हे दिसून येते. बॅंकेवर प्रशासक नेमताच शेतकरी कर्ज वाटपाचा आलेख वाढला, असेही खोडके यांनी सांगितले. बॅंकेचे अध्यक्षांना ईडीची नोटीस आल्याच्या प्रश्नावर संजय खोडके यांनी ‘ईडीचा ऊहापोह नको’ असे म्हणत याविषयी बोलणे टाळले. मात्र, बॅंकेत अपहार, भ्रष्टाचार झाला, हे कुणीही लपवू शकत नाही, याला त्यांनी दुजोरा दिला. आता बॅंकेत गैरव्यवहारांच्या चौकशीचे सत्र सुरू झाले असून, दोषींना त्यांचे कर्म एक दिवस दिसून पडेल, असे संजय खोडके म्हणाले. बॅंकेच्या गैरव्यवहाराला संचालक नव्हे तर अध्यक्षच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी यावेळी  केला. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत संचालकांची सभा पाच मिनिटांत गुंडाळली जाते, यापेक्षा मोठे दुर्दैव काय असेल, असा सवालही खोडके यांनी उपस्थित केला. यावेळी राज्यमंत्री बच्चू कडू, भाजपचे नेते, माजी आमदार अरुण अडसड, श्री. शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, माजी मंत्री वसुधा देशमुख, आमदार सुलभा खोडके, आमदार प्रताप अडसड, आमदार राजकुमार पटेल, राजेश वानखडे यांनी मनोगत व्यक्त केले. राजेंद्र महल्ले, माया हिवसे, रवींद्र गायगोले, सुधीर सूर्यवंशी, जयश्री देशमुख उपस्थित होते.

दोषींची आता सुटका नाही : प्रताप अडसडजिल्हा बॅंकेत अपहार, घोटाळा झाला, हे आता कागदोपत्री स्पष्ट झाले आहे. ही निवडणूक संचालकपदासाठी नव्हे तर शेतकरी हितासाठी लढविली जात आहे. ३.४९ कोटी ही अपहाराची रक्कम लहान आहे. बॅंकेत मोठा अपहार झाला असून, आता दोषींची सुटका नाही, असा दावा आमदार प्रताप अडसड यांनी केला आहे. माझ्या पत्रानंतर बॅंकेत चौकशी, ईडी, ऑडिट सुरू झाले. ५ ते ७ कोटींचे सॉफ्टवेअरचे घबाड असल्याचा आरोप आमदार अडसड यांनी केला. 

बंटी, बबलीचे कारस्थान उघड करू: देशमुखजिल्हा बँकेची निवडणूक ही बंटी, बबलीचे कारस्थान थांबविण्यासाठी लढविली जात आहे. बॅंकेचा कारभार हा शेतकऱ्यांसाठी असावा, यासाठी ही लढाई आहे. भ्रष्टाचाराचा डंख शिट्टी वाजवून थांबविणार असल्याचे शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी सांगितले. ही लढाई भ्रष्टाचाराविरोधी असल्याचे ते म्हणाले.

 

टॅग्स :bankबँकBacchu Kaduबच्चू कडू