शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
2
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
3
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
4
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
5
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
6
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
7
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
8
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
9
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
10
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
11
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
12
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
13
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
15
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
16
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
17
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
18
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
19
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
20
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...

महापालिका रिकामी; अधिकारी गाव-मुक्कामी

By admin | Updated: December 10, 2014 22:49 IST

शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार जिल्ह्यातील दुष्काळ, टंचाई, नापिकी आदींबाबत उपाययोजना करण्याचा अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी राबविलेल्या ‘अधिकाऱ्यांचा गाव मुक्काम’ या सकारात्मक

अमरावती : शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार जिल्ह्यातील दुष्काळ, टंचाई, नापिकी आदींबाबत उपाययोजना करण्याचा अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी राबविलेल्या ‘अधिकाऱ्यांचा गाव मुक्काम’ या सकारात्मक उपक्रमाचे भरभरुन कौतुक करावे तेवढे कमी आहे. मात्र नऊ लाख लोकसंख्येच्या मूलभूत सोई सुविधांची जबाबदारी हाताळणाऱ्या महापालिकेतील सर्वच प्रमुख अधिकाऱ्यांची या उपक्रमासाठी निवड करण्यात आल्यामुळे कोणाकडे कैफियत मांडावी, हा प्रश्न नगरसेवकांपुढे उपस्थित झाला होता, हे विशेष.जिल्ह्यातील ८४३ ग्रामपंचायतींमध्ये मुक्काम करुन गावात निर्माण झालेल्या समस्यांवर आकलन करुन त्यावर उपाययोजना म्हणून हे अधिकारी गावात मुक्काम करणार आहेत. परंतु महापालिकेतील प्रमुख अधिकाऱ्यांची एकाच वेळी या कामी नियुक्ती करण्यामागील कारण काय? याबाबत चांगलीच चर्चा ऐकावयास मिळाली. प्रशासकीय कामांचे नियोजन करावयाचे झाल्यास वर्ग १ व वर्ग २ चे अधिकारी हे आवश्यक राहतात. मात्र महापालिकेत अतिमहत्त्वाच्या विभाग सेवेतील अधिकाऱ्यांचीदेखील गाव मुक्कामी नियुक्ती करण्यात आल्याने जिल्हा प्रशासनाच्या या कारभारावर आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे. महानगरात आग, आरोग्य किंवा अतिक्रमणासारखी एखादी गंभीर समस्या उदभ्वल्यास ती हाताळण्यासाठी सक्षम यंत्रणा कशी उभी करावी, हा सवाल महापालिका आयुक्तांसमोर काही काळ निर्माण झाला होता. अखेर शेतकऱ्यांचे प्रश्न शासनदरबारी मांडण्यासाठी हा अभिनव उपक्रम असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी महापालिका प्रशासनाने निवड करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांना गाव मुक्कामी पाठविले. तर दुसरीकडे प्रमुख अधिकारीच दालनात नसल्याने समस्या, प्रश्न घेऊन महापालिकेत आलेल्या लोकप्रतिनिधींना आल्या पावली परतण्याचा प्रसंग ओढवला. महापालिकेत बुधवारी जवळपास महत्त्वाचे कक्ष हे अधिकाऱ्यांविनाच सुरु होते. प्रमुख अधिकारी नसल्याने कर्मचारीही कार्यालयात दांडी मारताना दिसून आले. (प्रतिनिधी)