शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

महापालिका रिकामी; अधिकारी गाव-मुक्कामी

By admin | Updated: December 10, 2014 22:49 IST

शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार जिल्ह्यातील दुष्काळ, टंचाई, नापिकी आदींबाबत उपाययोजना करण्याचा अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी राबविलेल्या ‘अधिकाऱ्यांचा गाव मुक्काम’ या सकारात्मक

अमरावती : शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार जिल्ह्यातील दुष्काळ, टंचाई, नापिकी आदींबाबत उपाययोजना करण्याचा अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी राबविलेल्या ‘अधिकाऱ्यांचा गाव मुक्काम’ या सकारात्मक उपक्रमाचे भरभरुन कौतुक करावे तेवढे कमी आहे. मात्र नऊ लाख लोकसंख्येच्या मूलभूत सोई सुविधांची जबाबदारी हाताळणाऱ्या महापालिकेतील सर्वच प्रमुख अधिकाऱ्यांची या उपक्रमासाठी निवड करण्यात आल्यामुळे कोणाकडे कैफियत मांडावी, हा प्रश्न नगरसेवकांपुढे उपस्थित झाला होता, हे विशेष.जिल्ह्यातील ८४३ ग्रामपंचायतींमध्ये मुक्काम करुन गावात निर्माण झालेल्या समस्यांवर आकलन करुन त्यावर उपाययोजना म्हणून हे अधिकारी गावात मुक्काम करणार आहेत. परंतु महापालिकेतील प्रमुख अधिकाऱ्यांची एकाच वेळी या कामी नियुक्ती करण्यामागील कारण काय? याबाबत चांगलीच चर्चा ऐकावयास मिळाली. प्रशासकीय कामांचे नियोजन करावयाचे झाल्यास वर्ग १ व वर्ग २ चे अधिकारी हे आवश्यक राहतात. मात्र महापालिकेत अतिमहत्त्वाच्या विभाग सेवेतील अधिकाऱ्यांचीदेखील गाव मुक्कामी नियुक्ती करण्यात आल्याने जिल्हा प्रशासनाच्या या कारभारावर आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे. महानगरात आग, आरोग्य किंवा अतिक्रमणासारखी एखादी गंभीर समस्या उदभ्वल्यास ती हाताळण्यासाठी सक्षम यंत्रणा कशी उभी करावी, हा सवाल महापालिका आयुक्तांसमोर काही काळ निर्माण झाला होता. अखेर शेतकऱ्यांचे प्रश्न शासनदरबारी मांडण्यासाठी हा अभिनव उपक्रम असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी महापालिका प्रशासनाने निवड करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांना गाव मुक्कामी पाठविले. तर दुसरीकडे प्रमुख अधिकारीच दालनात नसल्याने समस्या, प्रश्न घेऊन महापालिकेत आलेल्या लोकप्रतिनिधींना आल्या पावली परतण्याचा प्रसंग ओढवला. महापालिकेत बुधवारी जवळपास महत्त्वाचे कक्ष हे अधिकाऱ्यांविनाच सुरु होते. प्रमुख अधिकारी नसल्याने कर्मचारीही कार्यालयात दांडी मारताना दिसून आले. (प्रतिनिधी)