शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
4
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
5
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
6
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
7
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
8
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
9
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
10
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
11
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
12
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
13
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
14
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
15
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
16
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
17
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
18
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
19
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
20
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!

महापालिका रिकामी; अधिकारी गाव-मुक्कामी

By admin | Updated: December 10, 2014 22:49 IST

शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार जिल्ह्यातील दुष्काळ, टंचाई, नापिकी आदींबाबत उपाययोजना करण्याचा अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी राबविलेल्या ‘अधिकाऱ्यांचा गाव मुक्काम’ या सकारात्मक

अमरावती : शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार जिल्ह्यातील दुष्काळ, टंचाई, नापिकी आदींबाबत उपाययोजना करण्याचा अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी राबविलेल्या ‘अधिकाऱ्यांचा गाव मुक्काम’ या सकारात्मक उपक्रमाचे भरभरुन कौतुक करावे तेवढे कमी आहे. मात्र नऊ लाख लोकसंख्येच्या मूलभूत सोई सुविधांची जबाबदारी हाताळणाऱ्या महापालिकेतील सर्वच प्रमुख अधिकाऱ्यांची या उपक्रमासाठी निवड करण्यात आल्यामुळे कोणाकडे कैफियत मांडावी, हा प्रश्न नगरसेवकांपुढे उपस्थित झाला होता, हे विशेष.जिल्ह्यातील ८४३ ग्रामपंचायतींमध्ये मुक्काम करुन गावात निर्माण झालेल्या समस्यांवर आकलन करुन त्यावर उपाययोजना म्हणून हे अधिकारी गावात मुक्काम करणार आहेत. परंतु महापालिकेतील प्रमुख अधिकाऱ्यांची एकाच वेळी या कामी नियुक्ती करण्यामागील कारण काय? याबाबत चांगलीच चर्चा ऐकावयास मिळाली. प्रशासकीय कामांचे नियोजन करावयाचे झाल्यास वर्ग १ व वर्ग २ चे अधिकारी हे आवश्यक राहतात. मात्र महापालिकेत अतिमहत्त्वाच्या विभाग सेवेतील अधिकाऱ्यांचीदेखील गाव मुक्कामी नियुक्ती करण्यात आल्याने जिल्हा प्रशासनाच्या या कारभारावर आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे. महानगरात आग, आरोग्य किंवा अतिक्रमणासारखी एखादी गंभीर समस्या उदभ्वल्यास ती हाताळण्यासाठी सक्षम यंत्रणा कशी उभी करावी, हा सवाल महापालिका आयुक्तांसमोर काही काळ निर्माण झाला होता. अखेर शेतकऱ्यांचे प्रश्न शासनदरबारी मांडण्यासाठी हा अभिनव उपक्रम असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी महापालिका प्रशासनाने निवड करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांना गाव मुक्कामी पाठविले. तर दुसरीकडे प्रमुख अधिकारीच दालनात नसल्याने समस्या, प्रश्न घेऊन महापालिकेत आलेल्या लोकप्रतिनिधींना आल्या पावली परतण्याचा प्रसंग ओढवला. महापालिकेत बुधवारी जवळपास महत्त्वाचे कक्ष हे अधिकाऱ्यांविनाच सुरु होते. प्रमुख अधिकारी नसल्याने कर्मचारीही कार्यालयात दांडी मारताना दिसून आले. (प्रतिनिधी)