शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

पालिका स्वच्छताग्रही

By admin | Updated: June 25, 2017 00:08 IST

महापालिका प्रशासनाने शहर स्वच्छतेचा संकल्प सोडला असून त्यासाठी लोकसहभागाचे आवाहन केले आहे.

कॅरिबॅग वापरावरही बंदी : लोकसहभागाचे आवाहनलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महापालिका प्रशासनाने शहर स्वच्छतेचा संकल्प सोडला असून त्यासाठी लोकसहभागाचे आवाहन केले आहे. ओल्या आणि सुक्या कचऱ्याचे जागीच वर्गीकरण करण्यासाठी प्रत्येक आस्थापनाधारकाने दोन डस्टबिन ठेवाव्यात तथा ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या कॅरिबॅग न हाताळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या आवाहनाला न जुमानणाऱ्या ५० पेक्षा अधिक व्यावसायिकांकडून अतापर्यंत ५०० ते ५ हजारांप्रमाणे सहा दिवसांत १ लाख १२ हजार ६०० रुपये दंड वसूल करण्यात आला.राजकमल, जयस्तंभ, इतवारा, चित्रा, सरोज, गांधी चौक, नमुना, अंबापेठ, व्हीएमव्ही, गाडगेनगर, विलासनगर या व्यावसायिक क्षेत्रात ही कारवाई करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या स्वच्छ सर्वेक्षणामध्ये अमरावती शहर २३१ व्या क्रमांकावर राहिले. ते यंदा किमान पहिल्या १०० च्या यादीत यावे, यासाठी आयुक्त हेमंत पवार, आरोग्य विभाग व पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. महापालिकेकडे असलेले अल्प मनुष्यबळ, मशिनरीज आदींची कमतरता पाहता स्वच्छतेसाठी समाजातील प्रत्येक घटकाने समोर यावे, असे आवाहन प्रशासन तथा पदाधिकाऱ्यांनी केले आहे. काही दिवसांपूर्वी व्यावसायिक क्षेत्रातील आस्थापनांना डस्टबिन ठेवणे बंधनकारक करण्यात आले होते. शहरातील बहुतांश हॉटेल्स, खानावळी, मंगल कार्यालये खरकटे नालीत सोडून देतात. इतवारा बाजारात तर अस्वच्छतेचा कहर असतो. त्या अनुषंगाने डस्टबिन ठेवणे बंधनकारक करण्यात आले होते. त्या पार्श्वभूमिवर महापालिकेच्या आरोग्य विभागाद्वारे इतवारा बाजार व जवाहर रोडवर मोहीम राबविण्यात आली. इतवारा बाजारातील व्यावसायिक, भाजीविक्रेते, फळविक्रेते हे त्यांच्या व्यवसायातील कचरा, प्लास्टिक, भाजीपाला डस्टबिनमध्ये न टाकता नाल्यात, रस्त्यावर आणि दुकानाच्या बाहेर टाकत असल्याचे निरीक्षण आरोग्य विभागाच्या पथकाने नोंदविले. काही ठिकाणी ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या आढळून आल्यात. अशा दुकानदारांवर कारवाईचा दंडुका उगारण्यात आला. वैद्यकीय आरोग्य अधिकारी सीमा नैताम यांच्या नेतृत्वात ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक अरूण तिजारे, ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक धनंजय शिंदे, सिद्धार्थ गेडाम, प्रशांत गावनेर यांनी ही कारवाई केली. कारवाईत सातत्य १६ जूनला २८५०० रुपये,१७ ला १७ हजार रुपये,१९ ला २० हजार रुपये,२० ला १६,३०० रुपये,२१ ला १६,७०० आणि २२ जूनला १४,१०० असे एकूण १ लाख १२ हजार ६०० रुपये दंड वसूल करण्यात आला.ही कारवाई निरंतर सुरु राहणार असल्याची माहिती महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी सीमा नैताम यांनी दिली.आस्थापनेत डस्टबिन ठेवणे अनिवार्य करण्यात आले आहे. डस्टबिन न ठेवणाऱ्यांकडून प्रत्येकी ५ हजार रूपये दंड वसूल करण्याचे निर्देश दिले आहेत. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या कॅरिबॅग वापरणाऱ्यांवरही दंड आकारण्यात येत आहे.- हेमंत पवार, आयुक्त, मनपा.