शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

पालिका स्वच्छताग्रही

By admin | Updated: June 25, 2017 00:08 IST

महापालिका प्रशासनाने शहर स्वच्छतेचा संकल्प सोडला असून त्यासाठी लोकसहभागाचे आवाहन केले आहे.

कॅरिबॅग वापरावरही बंदी : लोकसहभागाचे आवाहनलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महापालिका प्रशासनाने शहर स्वच्छतेचा संकल्प सोडला असून त्यासाठी लोकसहभागाचे आवाहन केले आहे. ओल्या आणि सुक्या कचऱ्याचे जागीच वर्गीकरण करण्यासाठी प्रत्येक आस्थापनाधारकाने दोन डस्टबिन ठेवाव्यात तथा ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या कॅरिबॅग न हाताळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या आवाहनाला न जुमानणाऱ्या ५० पेक्षा अधिक व्यावसायिकांकडून अतापर्यंत ५०० ते ५ हजारांप्रमाणे सहा दिवसांत १ लाख १२ हजार ६०० रुपये दंड वसूल करण्यात आला.राजकमल, जयस्तंभ, इतवारा, चित्रा, सरोज, गांधी चौक, नमुना, अंबापेठ, व्हीएमव्ही, गाडगेनगर, विलासनगर या व्यावसायिक क्षेत्रात ही कारवाई करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या स्वच्छ सर्वेक्षणामध्ये अमरावती शहर २३१ व्या क्रमांकावर राहिले. ते यंदा किमान पहिल्या १०० च्या यादीत यावे, यासाठी आयुक्त हेमंत पवार, आरोग्य विभाग व पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. महापालिकेकडे असलेले अल्प मनुष्यबळ, मशिनरीज आदींची कमतरता पाहता स्वच्छतेसाठी समाजातील प्रत्येक घटकाने समोर यावे, असे आवाहन प्रशासन तथा पदाधिकाऱ्यांनी केले आहे. काही दिवसांपूर्वी व्यावसायिक क्षेत्रातील आस्थापनांना डस्टबिन ठेवणे बंधनकारक करण्यात आले होते. शहरातील बहुतांश हॉटेल्स, खानावळी, मंगल कार्यालये खरकटे नालीत सोडून देतात. इतवारा बाजारात तर अस्वच्छतेचा कहर असतो. त्या अनुषंगाने डस्टबिन ठेवणे बंधनकारक करण्यात आले होते. त्या पार्श्वभूमिवर महापालिकेच्या आरोग्य विभागाद्वारे इतवारा बाजार व जवाहर रोडवर मोहीम राबविण्यात आली. इतवारा बाजारातील व्यावसायिक, भाजीविक्रेते, फळविक्रेते हे त्यांच्या व्यवसायातील कचरा, प्लास्टिक, भाजीपाला डस्टबिनमध्ये न टाकता नाल्यात, रस्त्यावर आणि दुकानाच्या बाहेर टाकत असल्याचे निरीक्षण आरोग्य विभागाच्या पथकाने नोंदविले. काही ठिकाणी ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या आढळून आल्यात. अशा दुकानदारांवर कारवाईचा दंडुका उगारण्यात आला. वैद्यकीय आरोग्य अधिकारी सीमा नैताम यांच्या नेतृत्वात ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक अरूण तिजारे, ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक धनंजय शिंदे, सिद्धार्थ गेडाम, प्रशांत गावनेर यांनी ही कारवाई केली. कारवाईत सातत्य १६ जूनला २८५०० रुपये,१७ ला १७ हजार रुपये,१९ ला २० हजार रुपये,२० ला १६,३०० रुपये,२१ ला १६,७०० आणि २२ जूनला १४,१०० असे एकूण १ लाख १२ हजार ६०० रुपये दंड वसूल करण्यात आला.ही कारवाई निरंतर सुरु राहणार असल्याची माहिती महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी सीमा नैताम यांनी दिली.आस्थापनेत डस्टबिन ठेवणे अनिवार्य करण्यात आले आहे. डस्टबिन न ठेवणाऱ्यांकडून प्रत्येकी ५ हजार रूपये दंड वसूल करण्याचे निर्देश दिले आहेत. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या कॅरिबॅग वापरणाऱ्यांवरही दंड आकारण्यात येत आहे.- हेमंत पवार, आयुक्त, मनपा.