शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

महापालिकेचा जीव भांड्यात, प्रकल्प मजीप्राकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 22:16 IST

महानगरात होऊ घातलेल्या मलनि:सारण प्रकल्पाची कार्यान्वयन यंत्रणा म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण राहणार असल्याचे राज्य शासनाने स्पष्ट केले आहे.

ठळक मुद्दे८७ कोटींचा मलनि:सारण प्रकल्प : आर्थिक संकट टळले, भुयारी गटार योजनेची अंमलबजावणी होणार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महानगरात होऊ घातलेल्या मलनि:सारण प्रकल्पाची कार्यान्वयन यंत्रणा म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण राहणार असल्याचे राज्य शासनाने स्पष्ट केले आहे. २ एप्रिल रोजी नगरविकास विभागाने शुद्धीपत्रक काढून चुकीची कबुली दिली व या कबुलीने महापालिकेचा जीव भांड्यात पडला. अल्प मनुष्यबळ व आर्थिक हलाखीत असलेल्या महापालिकेसमोर या प्रकल्पाच्या कार्यान्वयनावरून पेच उभा ठाकला होता. सदर प्रकल्पासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यान्वयन यंत्रणा म्हणून काम करणार असल्याने प्रशासनाला हायसे वाटले आहे.मुळ ६५.०४६० कोटी रूपये किंमतीच्या शहराच्या मलनि:सारण प्रकल्पास २६ मार्च २०१८ रोजी सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. प्रकल्पाच्या घटकांमध्ये बदल झाल्याने किमतीत बदल झाला. त्याअनुषंगाने ८१.८७ या वाढीव किमतीला नव्याने मान्यता देण्यात आली. ८१.८७ कोटी रूपये किमतीच्या या प्रकल्पास ४०.९३५ कोटी रूपये केंद्र, २०.४६७५ कोटी राज्य शासन देईल, तर २०.४६ कोटी रूपये अमरावती महापालिकेचा स्वहिस्सा राहील, असे त्यात नमूद करण्यात आले. प्रकल्पाची रेंगाळलेली अवस्था पाहता राज्य सरकारने वाढीव किमतीला मान्यता दिल्याने समाधान व्यक्त करण्यात आले. मात्र, त्याचवेळी याच शासन निर्णयात मलनि:सारण प्रकल्पाची अंमलबजावणी यंत्रणा ‘मनपा’ राहील, असे नमूद असल्याने प्रशासनाची घाबरगुंडी उडाली. यापूर्वीच्या मूळ प्रशासकीय मान्यतेनुसार १६.२६ कोटींचा महापालिकेला टाकावा लागणारा स्वहिस्सा शासनाने १४ व्या वित्त आयोगातील निधीतून परस्पर वळते करून घेतला असताना आता महापालिकेत या योजनेची अंमलबजावणी कशी करावी, महापालिकेचा बांधकाम विभाग आधीच अभियंत्यांविना पांगळा झाला आहे. तांत्रिक मनुष्यबळही नाही. अशा परिस्थितीत मागील २० वर्षांपासून रेंगाळलेला हा प्रकल्प महापालिकेकडे साकारायचा तरी कसा, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. सुधारित प्रशासकीय मान्यतेच्या शासन निर्णयात अमरावती महापालिका असले तरी मूळ प्रशासकीय मान्यतेवेळी मजीप्रा, असा उल्लेख होता. मागील अनेक वर्षांपासून मजीप्राच प्रकल्प कार्यान्वित करत होता. त्यासाठी मजीप्राने महापालिकेत अनेकदा बैठकी सुद्धा घेतल्या. प्रकल्प पूर्तीसाठी महापालिकेने मजीप्राला खडसावले पण असे असताना २६ मार्चच्या शासन निर्णयात मलनि:सारण प्रकल्पाचे कार्यान्वयन यंत्रणा अमरावती महापालिका राहील, हे ४.१ या परिच्छेदातील वाक्य प्रशासनाला घाम फोडणारे होते. मात्र, त्यानंतर सरकारी सुटी आल्याने प्रशासन नगरविकास विभागाशी पत्रव्यवहार करू शकले नाही. तथापि २६ मार्चच्या जीआरमधील मजीप्राऐवजी मनपा ही ढोबळ चूक काही पदाधिकाऱ्यांनी नगरविकासच्या लक्षात आणून दिली व त्याचा परिपाक म्हणून नगरविकासने शुद्धीपत्रक काढून मजीप्रावर शिक्कामोर्तब केले.अमरावती शहराच्या मलनि:सारण प्रकल्पासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यान्वयन यंत्रणा राहील. तसे शुद्धीपत्रक २ एप्रिलला काढण्यात आले आहे.- पां.जो. जाधव,सहसचिव, महाराष्ट्र जीवनया प्रकल्पासाठी महापालिका कार्यान्वयन यंत्रणा राहील, हे वाचून आश्चर्याचा धक्काच बसला. मनुष्यबळ व तांत्रिक साधने पाहता मजीप्राच त्यासाठी योग्य आहे. शुद्धीपत्रक काढून नगरविकास ‘देर आए-दुरूस्त आए!’- चेतन पवार, गटनेता, बसपा