शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

महापालिकेचा ‘गजराज’ चालला, पोटे मैदानात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2022 05:00 IST

ऐन पावसाळ्यात अतिक्रमण हटाव माेहीम राबविल्याने व्यापाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. मात्र, ही प्रशासकीय आणि निरंतर अशी कारवाई असल्याची कबुली महापालिका निर्मूलन पथकाचे प्रमुख अजय बंसेले यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. सार्वजनिक स्थळ, रस्ते, नाली, ठेले हे विनापरवानगीने वा कोणतीही पूर्व सूचना न देता लावण्यात येत असतील, तर ते काढण्यासाठी नोटीस देण्याची गरज नाही. महापालिका अधिनियम २३१ नुसार ते हटविता येते, असे ते म्हणाले.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महापालिका अतिक्रमण निर्मूलन पथकाने आरंभलेल्या अतिक्रमण हटाव माेहिमेमुळे अतिक्रमणधारी व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. गत काही महिन्यांपासून थंड पडलेली महापालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम अचानक ‘ॲक्शन मोड’मध्ये आली. दरम्यान, अतिक्रमण हटविण्यासाठी राजकीय दबाव असल्याचा आरोप काही व्यापाऱ्यांनी केला आहे. शुक्रवारी राजकमल चौक ते गांधी चौक या मार्गावरील अतिक्रमण काढण्यात आले. शनिवारी श्याम चौक परिसरातील दुकानांच्या काही भागावर पालिकेचा ‘गजराज’ चालला. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. बापट चौक मार्गावरील अतिक्रमण काढले जात असताना व्यापाऱ्यांनी  विरोध केला असता महापालिका अतिक्रमण निर्मूलन पथकाने उडवाउडवीची उत्तरे दिली. हे पथक काहीच ऐकत  नसल्याने काही व्यापाऱ्यांनी आमदार प्रवीण पोटे यांच्याकडे धाव घेतली. अतिक्रमण काढायचे असेल, तर त्यांना दोन दिवस अगोदर नोटिसीद्वारे कळवा आणि नंतरच बुलडोजर चालवा, अशी रोखठोक भूमिका घेत पोटे यांनी व्यापाऱ्यांना  दिलासा दिला. शिवाय ऐन पावसाळ्यात राबवित असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा व्यापाऱ्यांनी तीव्र निषेध नोंदविला.  कोणतीही पूर्वसूचना न देता अतिक्रमण कसे हटविले? अशी विचारणा आमदार पोटेंनी महापालिका पथकाला केली. दोन वर्षे कोरोना महामारीमध्ये व्यापाऱ्यांना फार मोठा फटका बसला. आता कुठं सर्व व्यवहार सुरळीत सुरू होत असताना महानगर पालिकेने अतिक्रमण हटवण्याच्या नावाखाली अतिरेकी कारवाई करू नये. व्यापारी वर्गाचे आर्थिक नुकसान होणार नाही, याची काळजी घेत मोहीम राबवावी. त्याचप्रमाणे नियमबाह्य बांधकाम असल्यास व्यापाऱ्यांना दोन दिवसाची नोटीस देऊन कार्यवाही केल्यास ते आपले साहित्य, अतिक्रमण काढून घेतील, असे आमदार प्रवीण पोटे म्हणाले. 

- तर नोटीस देण्याची गरज नाही : अजय बंसेले ऐन पावसाळ्यात अतिक्रमण हटाव माेहीम राबविल्याने व्यापाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. मात्र, ही प्रशासकीय आणि निरंतर अशी कारवाई असल्याची कबुली महापालिका निर्मूलन पथकाचे प्रमुख अजय बंसेले यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. सार्वजनिक स्थळ, रस्ते, नाली, ठेले हे विनापरवानगीने वा कोणतीही पूर्व सूचना न देता लावण्यात येत असतील, तर ते काढण्यासाठी नोटीस देण्याची गरज नाही. महापालिका अधिनियम २३१ नुसार ते हटविता येते, असे ते म्हणाले.

 

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण