शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

महापालिकेचा ‘गजराज’ चालला, पोटे मैदानात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2022 05:00 IST

ऐन पावसाळ्यात अतिक्रमण हटाव माेहीम राबविल्याने व्यापाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. मात्र, ही प्रशासकीय आणि निरंतर अशी कारवाई असल्याची कबुली महापालिका निर्मूलन पथकाचे प्रमुख अजय बंसेले यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. सार्वजनिक स्थळ, रस्ते, नाली, ठेले हे विनापरवानगीने वा कोणतीही पूर्व सूचना न देता लावण्यात येत असतील, तर ते काढण्यासाठी नोटीस देण्याची गरज नाही. महापालिका अधिनियम २३१ नुसार ते हटविता येते, असे ते म्हणाले.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महापालिका अतिक्रमण निर्मूलन पथकाने आरंभलेल्या अतिक्रमण हटाव माेहिमेमुळे अतिक्रमणधारी व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. गत काही महिन्यांपासून थंड पडलेली महापालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम अचानक ‘ॲक्शन मोड’मध्ये आली. दरम्यान, अतिक्रमण हटविण्यासाठी राजकीय दबाव असल्याचा आरोप काही व्यापाऱ्यांनी केला आहे. शुक्रवारी राजकमल चौक ते गांधी चौक या मार्गावरील अतिक्रमण काढण्यात आले. शनिवारी श्याम चौक परिसरातील दुकानांच्या काही भागावर पालिकेचा ‘गजराज’ चालला. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. बापट चौक मार्गावरील अतिक्रमण काढले जात असताना व्यापाऱ्यांनी  विरोध केला असता महापालिका अतिक्रमण निर्मूलन पथकाने उडवाउडवीची उत्तरे दिली. हे पथक काहीच ऐकत  नसल्याने काही व्यापाऱ्यांनी आमदार प्रवीण पोटे यांच्याकडे धाव घेतली. अतिक्रमण काढायचे असेल, तर त्यांना दोन दिवस अगोदर नोटिसीद्वारे कळवा आणि नंतरच बुलडोजर चालवा, अशी रोखठोक भूमिका घेत पोटे यांनी व्यापाऱ्यांना  दिलासा दिला. शिवाय ऐन पावसाळ्यात राबवित असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा व्यापाऱ्यांनी तीव्र निषेध नोंदविला.  कोणतीही पूर्वसूचना न देता अतिक्रमण कसे हटविले? अशी विचारणा आमदार पोटेंनी महापालिका पथकाला केली. दोन वर्षे कोरोना महामारीमध्ये व्यापाऱ्यांना फार मोठा फटका बसला. आता कुठं सर्व व्यवहार सुरळीत सुरू होत असताना महानगर पालिकेने अतिक्रमण हटवण्याच्या नावाखाली अतिरेकी कारवाई करू नये. व्यापारी वर्गाचे आर्थिक नुकसान होणार नाही, याची काळजी घेत मोहीम राबवावी. त्याचप्रमाणे नियमबाह्य बांधकाम असल्यास व्यापाऱ्यांना दोन दिवसाची नोटीस देऊन कार्यवाही केल्यास ते आपले साहित्य, अतिक्रमण काढून घेतील, असे आमदार प्रवीण पोटे म्हणाले. 

- तर नोटीस देण्याची गरज नाही : अजय बंसेले ऐन पावसाळ्यात अतिक्रमण हटाव माेहीम राबविल्याने व्यापाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. मात्र, ही प्रशासकीय आणि निरंतर अशी कारवाई असल्याची कबुली महापालिका निर्मूलन पथकाचे प्रमुख अजय बंसेले यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. सार्वजनिक स्थळ, रस्ते, नाली, ठेले हे विनापरवानगीने वा कोणतीही पूर्व सूचना न देता लावण्यात येत असतील, तर ते काढण्यासाठी नोटीस देण्याची गरज नाही. महापालिका अधिनियम २३१ नुसार ते हटविता येते, असे ते म्हणाले.

 

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण