शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

व्हॉट्सॲपवरील सुटीचा अर्ज कबूल नव्हे नाकबूल, महापालिका आयुक्त

By प्रदीप भाकरे | Updated: November 7, 2022 20:57 IST

उपायुक्तांनी ४ नोव्हेंबर रोजी तसे कार्यालयीन परिपत्रक काढले आहे.

अमरावती: महानगरपालिकेत सर्व विभाग प्रमुख, खाते प्रमुख हे रजेचे अर्ज महानगरपालिका व्हॉट्सॲप ग्रुपवर सादर करून परस्पर रजा उपभोगतात. त्यामुळे कार्यालयीन कामकाजावर विपरित परिणाम होत असल्याचे गंभीर निरीक्षण आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी नोंदविले. परिणामी, यानंतर व्हॉट्सॲपवरील सुटीचा अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाही, असे आदेश आयुक्तांच्या वतीने देण्यात आले आहेत. उपायुक्तांनी ४ नोव्हेंबर रोजी तसे कार्यालयीन परिपत्रक काढले आहे.

परिपत्रकानुसार, कोणत्याही प्रकारची रजा उपभोगण्यापूर्वी, मुख्यालय सोडण्यापूर्वी रजेचा अर्ज विहीत प्रपत्रात आवश्यक त्या वैद्यकीय प्रमाणपत्रासह सादर करून रजा मंजूर करून घ्यावी. नंतरच रजा उपभोगण्यात यावी. (अपवादात्मक आणीबाणीची परिस्थिती वगळता) रजेचा अर्ज परस्पर सादर करून रजा उपभोगल्यास महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९८१ मधील तरतुदीनुसार शिस्तभंगविषयक कारवाई करण्यात येईल, अशी तंबी देण्यात आली आहे. महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम १९८१ मधील प्रकरण ३ नुसार ‘हक्क म्हणून रजा मागता येत नाही,’ अशी जाणीव करून देण्यात येत असल्याचे परिपत्रकात म्हटले आहे.

काय आहे आदेश ?काही विभाग प्रमुख/खाते प्रमुख हे सुटीच्या व रजेच्या कालावधीत परवानगी न घेता मुख्यालय सोडतात. हे कार्यालयीन शिस्तीचे उल्लंघन असून, यापुढे विभाग प्रमुख वा खाते प्रमुखांनी आयुक्तांची परवानगी न घेता परस्पर रजेवर जाऊ नये आणि मुख्यालय सोडू नये, असे परिपत्रक उपायुक्त प्रशासन भाग्यश्री बोरेकर यांनी काढले आहे. मागील आठवड्यात एक विभागप्रमुख दोन दिवसांच्या रजेवर गेला. त्याने सुटीचा अर्ज व्हॉट्सॲप ग्रुपवर टाकला. टाकताना आपल्या पदाचा तात्पुरता कार्यभार कुणाकडे राहील, याची ताजा कलमदेखील त्याने लिहिली. तीदेखील अतिशय गंभीरतेने घेण्यात आली आहे.

अनेकांनी सोडले होते मुख्यालयमागे आयुक्त आजारी रजेवर असताना अनेकांनी ‘ऑन ड्युटी’ रजा उपभोगली. दुपारी १२ ला यायचे, दीड-दोनला निघून जायचे. त्यानंतर कुटुंब, मित्रांसमवेत गेट टूगेदर करायचे. एक-दोनजणांनी तर कार्यालयीन वेळेत जीवाचा चिखलदरादेखील केला. काहींनी केवळ दोन ते तीन तास ड्युटी केली. आयुक्त कार्यालयात येणार नाहीतच, हे जाणून असल्याने काही सन्माननीय अपवाद वगळता, साहेब आताच होते, आताच गेले, अशी गत होती. ते सर्व प्रकार आयुक्तांच्या ध्यानी आले. त्या अनुषंगाने आयुक्तांच्या आदेशानुसार, उपायुक्तांनी मुख्यालयी राहण्याबाबतच्या सूचना दिल्या.

विभाग प्रमुख वा खाते प्रमुखांनी आयुक्तांची परवानगी न घेता परस्पर रजेवर जाऊ नये आणि मुख्यालय सोडू नये. रजेचा अर्ज विहीत नमुन्यात असावा. अर्ज मंजूर झाल्यानंतरच रजा उपभोगण्यात यावी. आयुक्तांच्या आदेशानुसार, तसे कार्यालयीन परिपत्रक काढले आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती