शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

व्हॉट्सॲपवरील सुटीचा अर्ज कबूल नव्हे नाकबूल, महापालिका आयुक्त

By प्रदीप भाकरे | Updated: November 7, 2022 20:57 IST

उपायुक्तांनी ४ नोव्हेंबर रोजी तसे कार्यालयीन परिपत्रक काढले आहे.

अमरावती: महानगरपालिकेत सर्व विभाग प्रमुख, खाते प्रमुख हे रजेचे अर्ज महानगरपालिका व्हॉट्सॲप ग्रुपवर सादर करून परस्पर रजा उपभोगतात. त्यामुळे कार्यालयीन कामकाजावर विपरित परिणाम होत असल्याचे गंभीर निरीक्षण आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी नोंदविले. परिणामी, यानंतर व्हॉट्सॲपवरील सुटीचा अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाही, असे आदेश आयुक्तांच्या वतीने देण्यात आले आहेत. उपायुक्तांनी ४ नोव्हेंबर रोजी तसे कार्यालयीन परिपत्रक काढले आहे.

परिपत्रकानुसार, कोणत्याही प्रकारची रजा उपभोगण्यापूर्वी, मुख्यालय सोडण्यापूर्वी रजेचा अर्ज विहीत प्रपत्रात आवश्यक त्या वैद्यकीय प्रमाणपत्रासह सादर करून रजा मंजूर करून घ्यावी. नंतरच रजा उपभोगण्यात यावी. (अपवादात्मक आणीबाणीची परिस्थिती वगळता) रजेचा अर्ज परस्पर सादर करून रजा उपभोगल्यास महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९८१ मधील तरतुदीनुसार शिस्तभंगविषयक कारवाई करण्यात येईल, अशी तंबी देण्यात आली आहे. महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम १९८१ मधील प्रकरण ३ नुसार ‘हक्क म्हणून रजा मागता येत नाही,’ अशी जाणीव करून देण्यात येत असल्याचे परिपत्रकात म्हटले आहे.

काय आहे आदेश ?काही विभाग प्रमुख/खाते प्रमुख हे सुटीच्या व रजेच्या कालावधीत परवानगी न घेता मुख्यालय सोडतात. हे कार्यालयीन शिस्तीचे उल्लंघन असून, यापुढे विभाग प्रमुख वा खाते प्रमुखांनी आयुक्तांची परवानगी न घेता परस्पर रजेवर जाऊ नये आणि मुख्यालय सोडू नये, असे परिपत्रक उपायुक्त प्रशासन भाग्यश्री बोरेकर यांनी काढले आहे. मागील आठवड्यात एक विभागप्रमुख दोन दिवसांच्या रजेवर गेला. त्याने सुटीचा अर्ज व्हॉट्सॲप ग्रुपवर टाकला. टाकताना आपल्या पदाचा तात्पुरता कार्यभार कुणाकडे राहील, याची ताजा कलमदेखील त्याने लिहिली. तीदेखील अतिशय गंभीरतेने घेण्यात आली आहे.

अनेकांनी सोडले होते मुख्यालयमागे आयुक्त आजारी रजेवर असताना अनेकांनी ‘ऑन ड्युटी’ रजा उपभोगली. दुपारी १२ ला यायचे, दीड-दोनला निघून जायचे. त्यानंतर कुटुंब, मित्रांसमवेत गेट टूगेदर करायचे. एक-दोनजणांनी तर कार्यालयीन वेळेत जीवाचा चिखलदरादेखील केला. काहींनी केवळ दोन ते तीन तास ड्युटी केली. आयुक्त कार्यालयात येणार नाहीतच, हे जाणून असल्याने काही सन्माननीय अपवाद वगळता, साहेब आताच होते, आताच गेले, अशी गत होती. ते सर्व प्रकार आयुक्तांच्या ध्यानी आले. त्या अनुषंगाने आयुक्तांच्या आदेशानुसार, उपायुक्तांनी मुख्यालयी राहण्याबाबतच्या सूचना दिल्या.

विभाग प्रमुख वा खाते प्रमुखांनी आयुक्तांची परवानगी न घेता परस्पर रजेवर जाऊ नये आणि मुख्यालय सोडू नये. रजेचा अर्ज विहीत नमुन्यात असावा. अर्ज मंजूर झाल्यानंतरच रजा उपभोगण्यात यावी. आयुक्तांच्या आदेशानुसार, तसे कार्यालयीन परिपत्रक काढले आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती