शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

मुहूर्त निघाला : ९ फेब्रुवारीला वाजणार सनई चौघडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 23:00 IST

अनाथांचे नाथ शंकरबाबा पापळकर यांचे मानसपुत्री वैशाली व अनिल यांचा विवाहाचा मुहूर्त निघाला असून, येत्या ९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातील स्मृतिस्थळाच्या खुल्या स्टेडीयममध्ये सनई चौघडे वाजणार आहे.

ठळक मुद्देपत्रपरिषद : शंकरबाबा यांच्या मानसपुत्री वैशाली संग अनिल यांचा विवाह

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अनाथांचे नाथ शंकरबाबा पापळकर यांचे मानसपुत्री वैशाली व अनिल यांचा विवाहाचा मुहूर्त निघाला असून, येत्या ९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातील स्मृतिस्थळाच्या खुल्या स्टेडीयममध्ये सनई चौघडे वाजणार आहे. राष्ट्रीय विवाह सोहळ्याच्या निमित्ताने बेवारस दिव्यांगांना आजीवन रिमांड तसेच त्यांना बालगृहात राहू द्यावे, असा कायदा सरकारने करावा, अशी मागणी शनिवारी पत्रपरिषदेतून शंकरबाबा पापळकर यांच्यासह खासदार आनंदराव अडसूळ यांनी केली.वझ्झर येथील स्व. अंबादासपंत वैद्य मतिमंद, बेवारस बालगृह १९९० पासून कार्यरत आहे. पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांच्या पुढाकारातून तेथे अपंग व बेवारसांचे पुनर्वसनाचे कार्य अविरत सुरू आहे. या बालगृहातील शंकरबाबा यांची मानसपुत्री वैशाली व पुत्र अनिल यांचा विवाह आयोजित केला आहे. या विवाहात खासदार आनंदराव अडसूळ व त्यांची पत्नी मंगला आनंदराव अडसूळ वैशालीचे कन्यादान करणार असून, वर अनिल यांच्या पित्याचे दायित्व अमरावती शहर पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर व त्यांच्या पत्नी रंजना बाविस्कर यांनी स्वीकारले आहे. प्रभाकरराव वैद्य यांनी या विवाह समारंभासाठी हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे स्मृतिस्थळ मैदानावर व्यवस्थापनाची जवाबदारी स्वीकारली असून, ज्येष्ठ नेत्या कमलताई दादासाहेब गवई वर-वधुस आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. मुलाच्या मामाची भूमिका विभागीय महसूल आयुक्त पीयूष सिंह व मुलीची मावशी म्हणून आमदार यशोमती ठाकूर, मुलाचे मोठे भाऊ जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख, मुलीचे मोठे भाऊ शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे, मुलीचे काका पुरुषोत्तम हरवाणी आणि मुलीच्या मामाची जबाबदारी शिवप्रभू प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनील भालेराव यांनी स्वीकारली आहे.अनाथ मंतिमंद मुला-मुलींना आजीवन राहू द्यावज्झर येथे अपंग मुलांचे पुनर्वसन होत आहे. या बालगृहात एकूण १२३ मुलांचे आजीवन पुनर्वसन केल्या जात आहे. हे सर्व मुले महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यात बेवारस स्थितीत वयाच्या १ ते २ वषार्चे असतांना सापडले. त्यांना पूनर्वसनासाठी या बालगृहात दाखल केले गेले. मात्र, १८ वर्षे झाल्यानंतर या सर्व मुलांना बालगृहाच्या बाहेर काढा, असा शासकीय नियम आहे. परंतु समाजाचा, सरकारी अधिकाऱ्यांचे व राजकीय नेत्यांचे सहकार्यांनी या मुलांना आजिवन येथे ठेवल्या जात आहे. भारतात दरवर्षी १ लाख विकलांग मुले-मुली वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यावर रिमांड होम (बालगृहाच्या) बाहेर काढले जातात. त्यांचे पुढे काय होते, याची शासनाजवळही नोंद नाही. त्यामुळे अशा मुला-मुलींना आजीवन बालगृहात राहू देण्यासाठी कायद्यात आवश्यक बदल करावे, अशी मागणी शनिवारी पत्रपरिषदेत करण्यात आली.दिग्गज मंत्र्यांची मांदियाळीया विवाह समारंभासाठी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, समाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री प्रवीण पोटे, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील, आमदार सुनील देशमुख, श्रीकांत देशपांडे, सिद्धीविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर, खासदार गजानन कीर्तीकर, खासदार भावना गवळी, ज्येष्ठ विचारवंत मा.गो. वैद्य, महापौर संजय नरवणे, आ. अरुण अडसड, बच्चू कडू, विरेंद्रजी जगताप, प्रभुदास भिलावेकर, रमेश बुंदेले अनिल बोंडे, हर्षवर्धन सपकाळ, सुनीता फिसके, शिवाजी शिक्षण संस्था अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, राधेश्यामजी चांडक, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडकेंसह शेकडो नेत्यांची मांदियाळी राहणार आहे.शिवप्रभू प्रतिष्ठानातर्फे मराठी गझल गीतपुणे येथील शिवप्रभू प्रतिष्ठानच्यावतीने अनाथ मूकबधिरांच्या विवाहाप्रसंगी सोबतीचा करार मराठी गझल गीत व कवितांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. कवी वैभव जोशी, गायक दत्तप्रसाद रानडे व संगीतकार आशिष मुजुमदार हे सादर करणार आहेत.शेगाव संस्थानकडून महाप्रसादश्री संत गजानन महाराज संस्थान शेगाव यांच्या सहयोगाने या विवाह समारंभासाठी विश्वस्त आदरनीय शिवशंकर पाटील यांच्यावतीने महाप्रसाद वितरण करण्यात येणार आहे.