शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

मुहूर्त निघाला : ९ फेब्रुवारीला वाजणार सनई चौघडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 23:00 IST

अनाथांचे नाथ शंकरबाबा पापळकर यांचे मानसपुत्री वैशाली व अनिल यांचा विवाहाचा मुहूर्त निघाला असून, येत्या ९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातील स्मृतिस्थळाच्या खुल्या स्टेडीयममध्ये सनई चौघडे वाजणार आहे.

ठळक मुद्देपत्रपरिषद : शंकरबाबा यांच्या मानसपुत्री वैशाली संग अनिल यांचा विवाह

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अनाथांचे नाथ शंकरबाबा पापळकर यांचे मानसपुत्री वैशाली व अनिल यांचा विवाहाचा मुहूर्त निघाला असून, येत्या ९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातील स्मृतिस्थळाच्या खुल्या स्टेडीयममध्ये सनई चौघडे वाजणार आहे. राष्ट्रीय विवाह सोहळ्याच्या निमित्ताने बेवारस दिव्यांगांना आजीवन रिमांड तसेच त्यांना बालगृहात राहू द्यावे, असा कायदा सरकारने करावा, अशी मागणी शनिवारी पत्रपरिषदेतून शंकरबाबा पापळकर यांच्यासह खासदार आनंदराव अडसूळ यांनी केली.वझ्झर येथील स्व. अंबादासपंत वैद्य मतिमंद, बेवारस बालगृह १९९० पासून कार्यरत आहे. पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांच्या पुढाकारातून तेथे अपंग व बेवारसांचे पुनर्वसनाचे कार्य अविरत सुरू आहे. या बालगृहातील शंकरबाबा यांची मानसपुत्री वैशाली व पुत्र अनिल यांचा विवाह आयोजित केला आहे. या विवाहात खासदार आनंदराव अडसूळ व त्यांची पत्नी मंगला आनंदराव अडसूळ वैशालीचे कन्यादान करणार असून, वर अनिल यांच्या पित्याचे दायित्व अमरावती शहर पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर व त्यांच्या पत्नी रंजना बाविस्कर यांनी स्वीकारले आहे. प्रभाकरराव वैद्य यांनी या विवाह समारंभासाठी हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे स्मृतिस्थळ मैदानावर व्यवस्थापनाची जवाबदारी स्वीकारली असून, ज्येष्ठ नेत्या कमलताई दादासाहेब गवई वर-वधुस आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. मुलाच्या मामाची भूमिका विभागीय महसूल आयुक्त पीयूष सिंह व मुलीची मावशी म्हणून आमदार यशोमती ठाकूर, मुलाचे मोठे भाऊ जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख, मुलीचे मोठे भाऊ शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे, मुलीचे काका पुरुषोत्तम हरवाणी आणि मुलीच्या मामाची जबाबदारी शिवप्रभू प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनील भालेराव यांनी स्वीकारली आहे.अनाथ मंतिमंद मुला-मुलींना आजीवन राहू द्यावज्झर येथे अपंग मुलांचे पुनर्वसन होत आहे. या बालगृहात एकूण १२३ मुलांचे आजीवन पुनर्वसन केल्या जात आहे. हे सर्व मुले महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यात बेवारस स्थितीत वयाच्या १ ते २ वषार्चे असतांना सापडले. त्यांना पूनर्वसनासाठी या बालगृहात दाखल केले गेले. मात्र, १८ वर्षे झाल्यानंतर या सर्व मुलांना बालगृहाच्या बाहेर काढा, असा शासकीय नियम आहे. परंतु समाजाचा, सरकारी अधिकाऱ्यांचे व राजकीय नेत्यांचे सहकार्यांनी या मुलांना आजिवन येथे ठेवल्या जात आहे. भारतात दरवर्षी १ लाख विकलांग मुले-मुली वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यावर रिमांड होम (बालगृहाच्या) बाहेर काढले जातात. त्यांचे पुढे काय होते, याची शासनाजवळही नोंद नाही. त्यामुळे अशा मुला-मुलींना आजीवन बालगृहात राहू देण्यासाठी कायद्यात आवश्यक बदल करावे, अशी मागणी शनिवारी पत्रपरिषदेत करण्यात आली.दिग्गज मंत्र्यांची मांदियाळीया विवाह समारंभासाठी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, समाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री प्रवीण पोटे, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील, आमदार सुनील देशमुख, श्रीकांत देशपांडे, सिद्धीविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर, खासदार गजानन कीर्तीकर, खासदार भावना गवळी, ज्येष्ठ विचारवंत मा.गो. वैद्य, महापौर संजय नरवणे, आ. अरुण अडसड, बच्चू कडू, विरेंद्रजी जगताप, प्रभुदास भिलावेकर, रमेश बुंदेले अनिल बोंडे, हर्षवर्धन सपकाळ, सुनीता फिसके, शिवाजी शिक्षण संस्था अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, राधेश्यामजी चांडक, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडकेंसह शेकडो नेत्यांची मांदियाळी राहणार आहे.शिवप्रभू प्रतिष्ठानातर्फे मराठी गझल गीतपुणे येथील शिवप्रभू प्रतिष्ठानच्यावतीने अनाथ मूकबधिरांच्या विवाहाप्रसंगी सोबतीचा करार मराठी गझल गीत व कवितांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. कवी वैभव जोशी, गायक दत्तप्रसाद रानडे व संगीतकार आशिष मुजुमदार हे सादर करणार आहेत.शेगाव संस्थानकडून महाप्रसादश्री संत गजानन महाराज संस्थान शेगाव यांच्या सहयोगाने या विवाह समारंभासाठी विश्वस्त आदरनीय शिवशंकर पाटील यांच्यावतीने महाप्रसाद वितरण करण्यात येणार आहे.