शेतकऱ्यांचे हाल : ऊर्ध्व वर्धा धरण विभागाचे दुर्लक्षरोशन कडू तिवसादुष्काळग्रस्त भागातील सिंचनाच्या सुविधांमध्ये वाढ करून शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी पंतप्रधानांद्वारे देण्यात आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या पॅकेजचे मातेरे ऊर्ध्व वर्धा धरण विभागाच्या तिवसा येथील कालवे उपविभाग क्र. २ या कार्यालयाने केले आहे. या कार्यालयाच्या अधिनस्थ लघुपाट गाळाने व झाडाझुडुपांनी व्यापला आहे. सेवापथावरील मुरूम गायब असल्याने काळी माती वर येऊन रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. लघुपाटाच्या पाण्यामुळे भर उन्हाळ्यात सुध्दा शेतकऱ्यांना आगमनासाठी रस्ते उपलब्ध नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. दुष्काळग्रस्त भागातील कर्जबाजारी शेतकऱ्यांना आर्थिक स्तर उंचावण्यासाठी या भागातील सिंचन सुविधेचा अधिक विकास करण्यासाठी पंतप्रधानांच्या पॅकेजपैकी १५ कोटींचा निधी तिवसा येथील कालवे उपविभाग क्रमांक २ या कार्यालयाला देण्यात आला होता. शेतकऱ्यांसमोर सिंचनाच्या समस्या उद्भवत असल्याने कोट्यावधींच्या पॅकेजची वाट लावल्याचा आरोप तिवसा तालुक्यातील शेतकऱ्यांनी केला आहे. तिवसानजीकच्या सूर्यगंगा हा लघुपाट गाळात व झाडाझुडपात आहे. मोझरी लघुपाटाचे पाणी रस्त्यावर येऊन पांदण रस्ता गाळवटून गेला आहे. या रस्त्यावरचा मुरुम गायब झाला.रस्त्याची दुरवस्था खेदजनकपंतप्रधान पॅकेजमधून १५ लाखाचा निधी मिळाल्यानंतरही या कालवे उपविभाग क्र. २ ची दुरवस्था खेदजनक म्हणावी अशीच आहे. या कालव्याचा गाळ रस्त्यावर साचल्याने भर उन्हाळ्यातही शेतकऱ्यांच्या वहिवाटीच्या रस्त्यावर चिखल साचला आहे. त्यामुळे या रस्त्यावरून चालताना कसरत करावी लागते. परंतु याकडे संबंधित विभाग लक्ष देण्यास तयार नाही. परिणाम शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. हा प्रकार कुठवर चालणार हा सवाल उपस्थित होत आहे.
लघुपाटाच्या गाळामुळे रस्ते गेले चिखलात
By admin | Updated: February 8, 2016 00:20 IST