शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणच्या उघड्या डीबी धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 05:01 IST

महावितरणने शहरात काही भागांमध्ये वीजप्रवाहासाठी भुयारी केबल टाकले आहेत, तर बऱ्याच ठिकाणी विद्युत प्रवाहासाठी ट्रान्सफार्मरखाली डीबी उभारण्यात आल्या आहेत. या डीबीतून उच्च दाबाच्या वीजप्रवाहाचा संचार होत असताना त्याला समोरील भागात झाकण नाही, असे चित्र सर्वदूर आहे. हल्ली पावसाळा सुरू झाला असताना डीबीला झाकण नसल्याने पावसाचे पाणी आतमध्ये शिरण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देउच्च दाब वीज प्रवाह : लोकवस्ती भागात अप्रिय घटनेला जबाबदार कोण?

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी अर्थात महावितरणने उभारलेले विद्युत वितरण बॉक्स (डीबी) बहुतांश ठिकाणी सताड उघडे असल्याने ते धोकादायक ठरणारे आहे. काही डीबी या नाल्याच्या काठावर, मैदाने, क्रीडागंणालगत असल्याने त्यातून होणाऱ्या उच्च दाब वीज प्रवाहामुळे जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे. या गंभीर बाबीकडे महावितरणने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.महावितरणने शहरात काही भागांमध्ये वीजप्रवाहासाठी भुयारी केबल टाकले आहेत, तर बऱ्याच ठिकाणी विद्युत प्रवाहासाठी ट्रान्सफार्मरखाली डीबी उभारण्यात आल्या आहेत. या डीबीतून उच्च दाबाच्या वीजप्रवाहाचा संचार होत असताना त्याला समोरील भागात झाकण नाही, असे चित्र सर्वदूर आहे. हल्ली पावसाळा सुरू झाला असताना डीबीला झाकण नसल्याने पावसाचे पाणी आतमध्ये शिरण्याची शक्यता आहे. डीबीचे झाकण चोरीस जाते की ते तोडले जाते, याबाबत महावितरण शोध घेण्यास अपयशी ठरली आहे. डीबी उभारल्यानंतर कर्मचारी त्याकडे लक्ष देत नाहीत. विद्युत प्रवाहासाठी असलेल्या डीबीची डागडुजी, दुरुस्तीकरिता पुढाकार घेण्यात येत नाही, हे वास्तव आहे.झाकण दुरूस्तीसाठी टाळाटाळडीबीचे झाकण तुटले अथवा नादुरुस्त असल्यास ते पुन्हा योग्य करण्याची जाबाबदारी महावितरणची आहे. असे असताना शहर वा ग्रामीण भागात ट्रॉन्सफार्मरच्या खाली उभारण्यात आलेल्या डीबी कधी सुरळीत होणार, असा सवाल उपस्थित होत आहे. जीवितहानी झाल्यानंतर महावितरण कंपनीला जाग येईल का, असा जाब नागरिकांकडून विचारला जात आहे. झाक ण दुरुस्तीसाठी होत असलेली टाळाटाळ थांबावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.तीन महिन्यांच्या वीज देयकांनी ग्राहक त्रस्तमहावितरणने लॉकडाऊनच्या काळातील तब्बल तीन महिन्यांची वीज देयके ग्राहकांना पाठविली. रक्कम पाहून अनेकांचे डोळे विस्फारले आहेत. गरीब, कष्टकरी, शेतमजूर, कामगार मार्च ते मे असे तीन महिने घरीच लॉकडाऊन होते. आता कोरोनासह या नव्या वीज देयकांचा सामना करावा लागत आहे. तीन महिन्यांचे वीज देयके माफ करावेत, अशी मागणी सर्वसामान्य नागरिक, कष्टकऱ्यांमधून होत आहे.

टॅग्स :electricityवीज