शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

वादळाच्या तडाख्यात महावितरणचे एक कोटी ६६ लाखांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 05:01 IST

कोव्हीड-१९ चा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी जिल्ह्यातही २२ मार्चपासून संपूर्ण 'लॉकडाऊन' आहे. अनेक कर्मचारी घरूनच काम करीत आहेत. विजेशिवाय हे शक्यच नाही. संपूर्ण बंदच्या काळात अखंडित वीज सेवा देणे ही तारेवरची कसरत करताना जिल्हाभरातील हजारो प्रकाशदुतांचे हात कोरोनाच्या प्रादुभार्वातही दिवस-रात्र राबताना दिसत आहेत. वादळ वाऱ्यामुळे बसलेल्या फटक्यामुळे महावितरणचे सुमारे १ कोटी ६६ लाखांचे नुकसान झाले.

ठळक मुद्दे७८३ विजेचे खांब कोसळले : १०५ किमी वीजवाहिन्या तुटल्या

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात रविवार, १० मे रोजी सायंकाळी अवकाळी पावसासह झालेल्या वादळाचा फार मोठा तडाखा महावितरणला बसला. यात ठिकठिकाणी झाडे, वीज वाहिन्या व ७८३ विजेचे खांब उन्मळून पडले. महावितरणचे वीज खांब वाकले आहे, तर जवळपास १०५ किमीपेक्षा जास्त वीज वाहिन्यांचे नुकसान झाले आहे. महावितरणच्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी युद्धस्तरावरील प्रयत्नाने जिल्ह्यातील वीज व्यवस्था पूर्ववत करण्यास यश आले.कोव्हीड-१९ चा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी जिल्ह्यातही २२ मार्चपासून संपूर्ण 'लॉकडाऊन' आहे. अनेक कर्मचारी घरूनच काम करीत आहेत. विजेशिवाय हे शक्यच नाही. संपूर्ण बंदच्या काळात अखंडित वीज सेवा देणे ही तारेवरची कसरत करताना जिल्हाभरातील हजारो प्रकाशदुतांचे हात कोरोनाच्या प्रादुभार्वातही दिवस-रात्र राबताना दिसत आहेत. वादळ वाऱ्यामुळे बसलेल्या फटक्यामुळे महावितरणचे सुमारे १ कोटी ६६ लाखांचे नुकसान झाले. अमरावती शहर विभागातील उच्चदाबाचे एक आणि लघुदाबाचे ९४ विजेचे खांब वादळामुळे जमीनदोस्त झाले आहेत. मोर्शी विभागातील उच्चदाबाचे ३०, तर लघुदाबाचे ७४ वीज खांब कोसळले आहेत. अमरावती ग्रामीण विभागात उच्चदाबाचे ८१ आणि लघुदाबाचे २१९ वीज खांब वादळामुळे कोसळले आहे. अचलपूर विभागातील १३५ लघुदाबाचे आणि १५० उच्चदाबाचे वीज खांब जमिनीवर पडले आहेत.उच्चदाब वाहिन्याही तुटल्याअनेक ठिकाणी वीज वाहिन्यांवर झाड पडल्याने शहरातील ०.८३ किमी उच्चदाब वीज वाहिनी, तर १३.२ किमी लघुदाब वाहिनी तुटली. ग्रामीण विभागात १० किमी उच्चदाब आणि ३० किमी लघुदाब वाहिनी खराब झाली. मोर्शी विभागात १२ किमी उच्चदाब आणि १२ किमी लघुदाब वाहिनी तुटली आहे. अचलपूर विभागातील ९.३६ किमी उच्चदाब १९ किमी लघुदाब वाहिनी तुटली आहे. एवढेच नाही तर अमरावती शहरातील ७, अचलपूर १ आणि मोर्शी विभागातील ५ रोहित्रे निकामी झाले. लघुदाबाचे १०९ आणि उच्चदाबाचे ११९ वीज खांब झुकल्याने अनेक भागांचा वीजपुरवठा प्रभावित झाला. जिल्ह्यतील वीजपुरवठा पूर्ववत केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :mahavitaranमहावितरण