शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
4
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
5
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
6
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
7
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
8
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
9
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
10
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
11
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
12
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
14
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
15
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
16
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
17
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
18
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
19
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
20
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला

मिस्टर कलेक्टर, ही तफावत का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 23:42 IST

जगातील सर्वाधिक मोठी लोकशाही असे अभिमानास्पद बिरूद मिरवणाऱ्या आपल्या भारत देशातील निवडणूक हा लोकशाहीतील पवित्र यज्ञ. या यज्ञात आदर्श आचारसंहितेचा समान, पारदर्शक अंमल अपेक्षित आहे.

ठळक मुद्देनिवडणूकनामा

गणेश देशमुखजगातील सर्वाधिक मोठी लोकशाही असे अभिमानास्पद बिरूद मिरवणाऱ्या आपल्या भारत देशातील निवडणूक हा लोकशाहीतील पवित्र यज्ञ. या यज्ञात आदर्श आचारसंहितेचा समान, पारदर्शक अंमल अपेक्षित आहे. अमरावतीत मात्र वेगवेगळ्या दिवशी आणि वेगवेगळ्या कारणासाठी आचारसंहितेचे वेगवेगळे स्वरूप पुढे आले. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी असलेले जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना त्याचमुळे प्रश्न विचारावासा वाटतो - 'मिस्टर कलेक्टर, ही तफावत का?'सोमवार आणि मंगळवार या दोन दिवशी उमेदवारी अर्ज भरणाऱ्यांची गर्दी अधिक होती. सोमवारी जिल्हाधिकारी मार्गावर असलेले बॅरिकेड्स, रोकटोक मंगळवारच्या तुलनेत शिथिल होती. जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आणि आतदेखील सोमवारी वाहने नेली गेली. मंगळवारी मात्र नियम कडक करून जागोजागी अडथळे उभारले गेले. वाहनांना आणि लोकांना जिल्हाधिकारी कार्यालयापासून बरेच दूर अडविण्यात आले.सर्वांना समान वागणूक, समान नियमावली आणि समान न्याय असावा हा उद्देश आदर्श आचारसंहितेचा आहे. त्याचे पालन करवून घेणे हे प्रमुख अधिकाऱ्यांचे कर्तव्य आहे; तथापि दोन दिवसांच्या नियमांमध्ये तफावत लक्षात आल्यामुळे, त्याची चर्चा झाली. सर्वच पक्षांसाठी, सर्वच उमेदवारांसाठी समान नियम का नसावे, असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर आणि परिसरातच आचारसंहितेदरम्यान मापदंड बदलत असतील, तर अंमलबजावणीवर सिंहावलोकन व्हायला नको का?प्रसिद्धी माध्यमांनाही तफावतीचा अनुभवआचारसंहिता अंमलबजावणी तफावतीचा अनुभव प्रसिद्धी माध्यमांनाही आला. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या दालनात गेलेल्या उमेदवारांची छायाचित्रे टिपण्यासाठी प्रसिद्धी माध्यमांना मनाई करण्यात आली. नोडल अधिकारी पदाची जबाबदारी असलेले जिल्हा माहिती अधिकारी यांच्यामार्फत ती छायाचित्रे प्रसिद्धी माध्यमांना उपलब्ध करून दिली जातील, असे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी पत्रकारांना पत्रपरिषदेत सांगितले होते. कुठलेही संभ्रम राहू नये, यासाठीच जिल्हाधिकाऱ्यांनी दोनवेळा पत्रपरिषद आयोजित केली होती. मात्र, आजपर्यंत उमेदवारी अर्ज भरतानाचे एकाही उमेदवाराचे छायाचित्र जिल्हा माहिती कार्यालयाकडून प्रसिद्धी माध्यमांना देण्यात आले नाही.सोमवारी १४ आणि मंगळवारी १८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यात चर्चेतील उमेदवारही होते. ना प्रसिद्धी माध्यमांना अनुमती दिली गेली, ना जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी माध्यमांना छायाचित्रे उपलब्ध करून दिली. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची अनुमती नसल्यामुळे आम्ही छायाचित्रे देऊ शकत नाही, अशी सबब जिल्हा माहिती कार्यालयाकडून देण्यात आली. केवळ उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेदरम्यान विस्कटलेल्या प्रशासकीय व्यवस्थेचा अनुभव येत असताना, मतदान व मतमोजणीचे व्यापक कार्य नीटपणे पार पाडले जाईल, असा विश्वास जनतेत निर्माण करणे हेदेखील निवडणूक अधिकाऱ्यांचे कर्तव्य ठरते.