शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

खासदारांची डेडलाईन फसवी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2015 02:19 IST

बडनेरा-अमरावती राज्य मार्गावरील नरखेड रेल्वे मार्गावर मागिल काही वर्षांपासून रेल्वे पूल व जोडरस्ता निर्मितीचे

रेल्वे प्रकल्पाचे काम लांबणार : बडनेरा मार्गावरील पूल, जोडरस्ता एप्रिलपासून सुरु होणे अशक्यअमरावती : बडनेरा-अमरावती राज्य मार्गावरील नरखेड रेल्वे मार्गावर मागिल काही वर्षांपासून रेल्वे पूल व जोडरस्ता निर्मितीचे काम संथगतीने सुरु आहे. परिणामी हा चौपदरीकरण मार्ग नव्या वर्षात १ एप्रिलपासून सुरु करण्याची खासदार आनंदराव अडसूळ यांनी दिलेली डेडलाईन सद्यस्थितीत पूर्ण होणार नाही, हे स्पष्ट आहे.अमरावती-बडनेरा मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम युद्धस्तरावर सुरु असले तरी नरखेड रेल्वे मार्गावर पुलाचे काम तसेच या पुलाला जोडणाऱ्या रस्त्याचे काम काही वर्षांपासून कासवगतीने सुरु आहे. पूल व रस्ता निर्मितीचे काम ‘ठक्कर अ‍ॅन्ड संचेती कन्स्ट्रक्शन’ कंपनीने घेतले आहे. परंतु हे काम अतीशय संथगतीने सुरु असल्यामुळे बडनेरा मार्गावरील रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. दरम्यान नरखेड मार्गावरील रेल्वेपूल, रस्ता निर्मितीचे काम ३१ मार्च २०१६ पर्यंत पूर्ण करु न हा मार्ग १ एप्रिलपासून नागरिकांच्या सेवेत दाखल व्हावा, यासाठी खासदार अडसूळ यांनी मुंबई मध्ये रेल्वे विभागाच्या महाप्रबंधकांना पत्रवजा डेडलाईन दिली होती. खासदारांनी दिलेल्या डेडलाईनुसार मध्यंतरी विकासकामांना गती मिळाली होती. मात्र, काही दिवसांपासून पुन्हा या कामाची गती मंदावली आहे. त्यामुळे १ एप्रिलपासून हा चौपदीकरण मार्ग नागरिकांच्या सेवेत दाखल होईल काय? याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. नरखेड मार्गावर रेल्वे प्रशासनाकडून निर्माणाधीन पुलाचे काम पूर्ण झाले असले तरी या पुलाला जोडणाऱ्या अप्रोच मार्ग अद्यापही पूर्ण व्हायचा आहे. तसेच जोडरस्ता निर्मितीचे काम रखडले असल्याचे दिसून येते. खासदार अडसूळ यांच्या डेडलाईनुसार या मार्गाचे काम पूर्ण करुन तो नागरिकांच्या सेवेत दाखल करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. बडनेरा मार्गावरील रेल्वे पूल, रस्तानिर्मिती स्थळाची पाहणी केली जाईल. १ एप्रिल २०१६ रोजी हा मार्ग सुरु व्हावा यासाठी रेल्वे अधिकाऱ्यांना अवगत करु. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न सुरुच आहेत.- आनंदराव अडसूळ, खासदार, अमरावती.रेल्वे प्रकल्पाचे काम मार्च २०१६ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. मात्र, प्राधिकरणच्या जलवाहिनीचा अडथळा येत आहे. टार्गेटनुसार कामे होतील. जलवाहिनीहटविताच कामाला गती येईल.- यू.डी. उदापुरे, सहायक अभियंता, रेल्वे नागपूर