लक्षवेधी : मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदनअमरावती : अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या केंद्र व राज्य शासनाच्या पातळीवर मान्य केलेल्या प्रलंबित न्याय्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी आयटकतर्फे जिल्हा परिषदेत मंगळवारी धरणे आंदोलन करून मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.महाराष्ट्र अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी युनियन आयटकतर्फे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या केंद्र व राज्य शासनाच्या पातळीवरील प्रलंबित मान्य केलेल्या न्याय्य मागण्यांची त्वरित अंमलबजावणी करावी, याकरिता आयटक संघटनेनेदेश पातळीवर व राज्य पातळीवर आंदोलने सुरू आहेत. एप्रिल २०१४ पासून सेविकांना ९५० रुपये, मदतनिसांना ५०० रुपये तर मिनि अंगणवाडी सेविकांना ५५० रुपयांची वाढ जाहीर केली व वाढीचा जीआर काढण्यात आला. मात्र त्याची अंलबजावणी नाही. दिवाळी-भाऊबीजेची भेट अदा करावी, ६ जावेवारी ते ५ फेब्रुवारी २०१४ या ३१ दिवसांचे कपात केलेले मानधन त्वरित अदा करावे, आजाराची पगारी रजा व आजाराचा खर्च देण्यात यावा, उन्हाळी सुटी १५ दिवसांऐवजी १ महिन्याची दरवर्षी पगारी देण्यात यावी. लाभार्थी सेवन करीत नाही ते बंद करावी, अंगणवाडी केंद्राचे खासगीकरण करू नये, कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन त्वरित अदा करावे, वेतन दरमहिन्याच्या ५ तारखेला द्यावे, पीएफ, पेमेंट आॅफ ग्रॅच्युईटी अॅक्ट, महागाई भत्ता लागू करावा आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. यावेळी आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी यांना निवेदन देऊन जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांचे प्रश्न निकाली काढण्याची मागणी केली. निवेदन देताना राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष बी.के. जाधव, उपाध्यक्ष प्रमिला राव, रत्नमाला ब्राम्हणे, सचिव अरुण देशमुख, मीरा कैथवास, सुमित्रा हिवराळे, वृशाली तापस, प्रमिला भाबुरकर, रेखा ठाकूर, शालु उकरडे, रंजना धोटे, कीर्ती ओगलेकर, रंजना कडू आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे जिल्हा परिषदेसमोर आंदोलन
By admin | Updated: May 27, 2015 00:17 IST