शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
3
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
4
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
5
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
6
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
7
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
8
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
9
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
10
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
11
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
12
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
13
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
14
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
15
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
16
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
17
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
18
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
19
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
20
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?

‘टोलमुक्त महाराष्ट्र’साठी आंदोलन

By admin | Updated: March 23, 2015 00:33 IST

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक काळात जनतेला ‘टोलमुक्त महाराष्ट्र’ करण्याचे आश्वासन दिले होते.

अमरावती : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक काळात जनतेला ‘टोलमुक्त महाराष्ट्र’ करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र या आश्वासनाची पूर्तता अद्यापपर्यंत करण्यात आली नाही. परिणामी शासनकर्त्याना त्यांनी दिलेल्या आश्वासनाची आठवण राहावी, यासाठी मंगळवारी २४ मार्च रोजी टोल वसुली बंद आंदोलन केले जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हृषीकेश वैद्य यांनी रविवारी पत्रपरिषदेत दिली.महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे २४ मार्च रोजी राज्यव्यापी आंदोलन केले जात आहे. याच श्रृखंलेत शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने नागपूर महामार्गावरील नांदगाव पेठ स्थित टोल नाक्यावर मंगळवारी टोल वसुली न करता वाहने पाठविली जातील. या आंदोलनाची माहिती पोलीस प्रशासन, टोल वसुली कंत्राटदारांना देण्यात आली आहे. कायदा सुव्यवस्था अबाधित राहावा, यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी प्रशासनाला सहकार्य करणार आहेत. सकाळी ११ ते ५ वाजतादरम्यान टोल नाक्यावर कोणत्याही वाहन चालकांकडून टोल वसूल करु देणार नाही. हे आंदोलन राज्यभर असून शासनकर्त्यांना केवळ त्यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करुन जनतेला दिलासा द्यावा. अन्यथा टोल बंद करता येत नसेल तर जनतेची जाहीर माफी मागावी, असे वैद्य म्हणाले. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री फडणविस यांनी राज्यातील टोल नाके काही तांत्रिक, आर्थिक व न्यायालयीन अडचणींमुळे बंद करता येणार नाही, असे विधान केले आहे. मात्र निवडणूक काळात दिलेल्या आश्वासनांमुळेच जनतेनी भरभरुन मते दिलीत. आता शासनकर्ते दिलेल्या आश्वासनापासून दूर जात आहेत. ही जनतेची दिशाभूल आहे. दिलेल्या शब्दाला जागा, महाराष्ट्र टोलमुक्त करा, असा इशारा ऋषिकेश वैद्य यांनी दिला आहे. हे आंदोलन महाराष्ट्राच्या घोषणेची आठवण करुन देते तथा महाराष्ट्रातून टोल हद्दपार करणे तसेच यासंदर्भातील निर्णय चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेतला जावा, अशी मागणी करीत राष्ट्रवादी युवक काँग्रेस २४ मार्च रोजी आंदोलन करुन शासनकर्त्यांचे लक्ष वेधतील, असे ऋषिकेश वैद्य यांनी सांगितले. यावेळी रायुकाँचे शहराध्यक्ष गजानन रेवाळकर, प्रदेश सचिव विनय कडू यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)