शहरं
Join us  
Trending Stories
1
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
2
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
3
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
4
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
5
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
6
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
7
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
8
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा वापर ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
9
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
10
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
11
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
12
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
13
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
14
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
15
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
16
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
17
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
18
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
19
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
20
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  

अनुदानाचा शासननिर्णय निघेपर्यंत आंदोलन मागे नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 23:20 IST

उच्च माध्यमिक शाळांच्या मूल्यांकन पात्र याद्या घोषित कराव्यात, १०० टक्के आर्थिक तरतूद करावी,

ठळक मुद्देशेखर भोयर यांचा निर्धार : विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांचे आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : उच्च माध्यमिक शाळांच्या मूल्यांकन पात्र याद्या घोषित कराव्यात, १०० टक्के आर्थिक तरतूद करावी, यासाठी शासनाकडे पाठपुरावा करीत असून आपणास न्याय मिळेपर्यंत व अनुदानाचा शासन निर्णय निघेपर्यंत प्रमाणिकपणे सोबत असल्याचे मत शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी व्यक्त केले.महाराष्ट्र राज्य (कायम) विना अनुदानित उच्च माध्यमिक शाळांच्या मुंबई येथील धरणे आंदोलनाच्या तिसºया दिवशी शिक्षकांशी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य (कायम) विना अनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समितीचे राज्याध्यक्ष तानाजी नाईक, सचिव सी.एम.बागवे, अमरावती विभागीय अध्यक्ष संतोष वाघ, पुंडलीकराव रहाटे, पराग पाटील यासह बहुसंख्य इतर जिल्ह्यातून आलेले पदाधिकारी व प्राध्यापक वृंद उपस्थित होते. यावेळी शेखर भोयर म्हणाले, यासंदर्भात विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व आमदार विक्रम काळे यांना निवेदन देऊन चर्चा केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.२०१४ मध्ये उच्च माध्यमिक शाळांचा कायम शब्द वगळला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या शाळांचा ‘कायम’ शब्द निघाल्याबरोबर प्रचलित नियमानुसार शाळांना २०, ४०. ६० व ८० टक्के अनुदान अनुदेय राहील. याबाबतचा शासननिर्णयसुद्धा निघाला असून या शासनाकडून निर्णयाची अंमलबजावणी केलेली नाही. अंमलबजावणी होण्याकारिता सभागृहात हा प्रश्न उचलून धरावा व विनाअनुदानित उच्च माध्यमिक शिक्षकांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी ना. धनंजय मुंडे यांच्याकडे केली. त्यांनीसुद्धा हा मुद्दा सभागृहात उचलून धरण्याचे व शिक्षकांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले.महाराष्ट्र राज्य (कायम) विना अनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समितीच्या पाठीशी शिक्षक महासंघ खंभीरपने उभा असून या लढाईत मी सदैव आपल्या सोबत राहील. आपणास न्याय मिळवून देण्याचा पूर्णपणे प्रामाणिक प्रयत्न करेल. ही लढाई आपल्या सर्वांची असून जे जे शक्य होईल ते सर्व करण्याचे अभिवचन त्यांनी उपस्थित शिक्षक बांधवांना दिले. आता या आंदोलनात कॉलेजचे विद्यार्थीही रस्त्यावर उतरले असून अनुदानाचा शासननिर्णय निघल्याशिवाय आंदोलन मागे घेतला जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.