शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

मुलांच्या विरहात मातेचा आत्मघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 00:21 IST

मुलांना भेटण्याची अतीव इच्छा होती. पती मात्र मुलांना भेटू देत नव्हता, या उद्वेगातून मुलांच्या विरहात व्याकूळ झालेल्या मातेने स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले.

ठळक मुद्देमहिलेचा मृत्यू : चिंचोली रहिमापुरातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मुलांना भेटण्याची अतीव इच्छा होती. पती मात्र मुलांना भेटू देत नव्हता, या उद्वेगातून मुलांच्या विरहात व्याकूळ झालेल्या मातेने स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. ही हृदयद्रावक घटना रहिमापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुंभारगाव येथे घडली. या दुर्दैवी मातेचा २८ एप्रिल रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.सुवर्णा अमोल अडेकर (३२) असे मृताचे नाव आहे. तिने मृत्यूपूर्वी दिलेल्या बयानानुसार, सदर महिलेचा विवाह २००७ मध्ये अमोल अडेकार यांच्याशी झाला. त्यांचा सुखी संसार सुरू होता. त्यांना दोन मुले झाली. त्यानंतर त्यांच्याकडेच राहत असलेली नणंद अंजली उमेकर हिने अमोलकडे सुवर्णाच्या कागाळ्या केल्या. त्यामुळे पती मारहाण करून शिवीगाळ करू लागला. चार वर्षांपूर्वी एके दिवशी पतीने सुवर्णाला आई-वडिलांकडे माहेरी आणून सोडले. तेव्हापासून पतीने तिला घरी नेले नाही, तर दोन मुलांनासुद्धा भेटू दिले नाही. २८ एप्रिल रोजी दुपारी ३.३० वाजता सुवर्णाच्या माहेरी तिचे बाबा व भाऊ दोघेही झोपले होते, तर आई घराबाहेर गेली होती. घरात विचारमग्न अवस्थेत असलेल्या सुवर्णाला मुलांची आठवण येताच आपसूक डोळ्यातून अश्रू बाहेर पडले. मुलांना बघण्याची, त्यांना माया देण्याची अतृप्तता मनात होती. मुलांपासून वंचित राहून आणखी किती दिवस जगायचे, काय करावे-काय नाही, या दुविधेत असलेल्या सुवर्णाने अखेर टोकाचा निर्णय घेत घरात ठेवलेली रॉकेलची डबकी स्वत:च्या अंगावर ओतली आणि माचीसने पेटवून घेतले. साडीने पेट घेतल्याने आगीचा विळखा घट्ट झाला. त्याची जाणीव होताच तिने आरडाओरड केली. वडील, भाऊ व शेजारी धावून आले आणि त्यांनी आग विझविली. भाजलेल्या सुवर्णाला आॅटोत टाकून जिल्हा सामान्य रुग्णलायात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी सुवर्णा ८८ टक्के भाजल्याचे स्पष्ट केले. तिच्यावर तत्काळ वार्ड क्रमांक ४ मध्ये उपचार सुरू करण्यात आला. मात्र, काही तासानंतरच तिची प्राणज्योत मालवली. तिने शहर कोतवाली पोलिसांना मृत्यूपूर्वी दिलेल्या बयाणात तिच्या जीवनातील हृदयद्रावक प्रसंग विशद केला.कुणावर करणार पोलीस कारवाई?सुवर्णाच्या पतीने तिला माहेरी आणून टाकले. मुलांना भेटण्यापासून वंचित ठेवले. त्यामुळे तिने मुलांच्या विरहात आत्महत्या केली. आता रहिमापूर पोलीस कुणावर कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.अमरावती येथील शहर कोतवाली ठाण्याकडून अद्याप डायरी प्राप्त झालेली नाही. संबंधित महिलेने दिलेल्या बयानाचे दस्तऐवज प्राप्त झाल्यावर पुढील कारवाईची दिशा ठरविण्यात येईल.- सचिन सिरसाट,ठाणेदार, रहिमापूर ठाणे.