शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मुलीच्या वाढदिवसाआधीच आईचा शॉक लागून मृत्यू

By admin | Updated: April 9, 2017 00:02 IST

दोन दिवसांपूर्वी नवीन घरात गृहप्रवेशाचा कार्यक्रम आटोपला.

विद्युत प्रवाहाचा झटका : दहिसाथ परिसरातील घटनाअमरावती : दोन दिवसांपूर्वी नवीन घरात गृहप्रवेशाचा कार्यक्रम आटोपला. रविवारी मुलीच्या पहिल्या वाढदिवसाची तयारीला लागलेल्या आईचा विद्युत प्रवाहाच्या झटक्याने मृत्यू झाला. ही घटना शनिवारी ११.३० वाजतादरम्यान दहिसाथ परिसरात घडली. यामुळे परिसरातील नागरिकांत हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस सूत्रानुसार, आरती सागर गौड (२८,रा. दहीसाथ) असे मृताचे नाव आहे. आरती गौड या शहरातील खामगाव बँकेच्या एका शाखेत कार्यरत होत्या. त्यांचे पती सागर गौड हे गडचिरोली जिल्ह्यातील इटापल्ली येथे पोलीस विभागात कार्यरत आहेत. गौड यांनी दहिसाथ परिसरात नवीन घर बांधले. दोन दिवसांपूर्वी गृहप्रवेशाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यासाठी सागर हे रजा घेऊन आले होते. पती-पत्नीने विधिवत पूजा करून गृहप्रवेशाचा कार्यक्रम पार पाडला. यासाठी त्यांचे बहुतांश नातेवाईक हजर होते. त्यामुळे त्यांचे घर गजबजले होते. हा कार्यक्रम आटोपल्यानंतर गौड कुटुंबियातील सदस्य देवांशीचा वाढदिवस साजरा करणार होते. गौड दाम्पत्याची एकुलती एक मुलगी देवांशी ही रविवारी ९ एप्रिल रोजी एक वर्षाची होणार होती. देवांशीचा वाढदिवस थाटात साजरा करण्याचे स्वप्न पती-पत्नीसह कुटुंबियांनी रंगविले होते. तिच्या वाढदिवसाची जय्यत तयारी सुरू असताना आरती व त्यांच्या नणंदेने घराची स्वच्छता करण्याचे ठरविले. त्यासाठी आरती घरातील झाडू शोधू लागल्या. दरम्यान त्यांना घरातील कुलरमागे झाडू असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी झाडू उचलण्याचा जसा प्रयत्न केला, तसाच त्यांच्या हाताचा कुलरला स्पर्श झाला आणि अचानक विद्युत प्रवाहाचा झटका आरती यांना बसला. आरती या कुलरला चिपकल्याचे निदर्शनास येताच कुटुंबीयांतील काही सदस्यांनी कुलरजवळील लाकडी सोफ्याद्वारे आरती यांना कुलरपासून दूर केले. मात्र, आरती या बेशुद्ध झाल्या होत्या. या घटनेची माहिती होताच माजी खासदार अनंत गुढे यांच्यासह गौड कुटुंबियांनी आरती यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले. मात्र, आरती यांची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. आरती यांच्या मृतदेहाचे इर्विन रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणात पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. कौटुंबिक कार्यक्रमाच्या आनंदात ही दु:खद घटना घडल्यामुळे दहिसाथ परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)