शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
4
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
5
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
6
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
7
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
8
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
9
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
10
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
11
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
12
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
13
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
14
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
15
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
16
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
17
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
18
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
19
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
20
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 

आंब्यासोबत विष मोफत !

By admin | Updated: April 12, 2016 00:02 IST

फळांचा राजा आंबा. उन्हाळा आला की रसाळ आंब्याची सर्वांनाच ओढ लागते.

संदीप मानकर अमरावतीफळांचा राजा आंबा. उन्हाळा आला की रसाळ आंब्याची सर्वांनाच ओढ लागते. एव्हाना बाजारात विविध प्रजातींचे आंबे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. मात्र, वरकरणी पिवळेधम्म आणि रसाळ दिसणारे हे फळ यावरील रासायनिक द्रव्यांच्या अतीवापरामुळे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. कमी कालावधीत कच्च्या कैऱ्या पिकविण्यासाठी मानवी शरीरास हानीकारक असलेल्या कार्बाईड व इथेलिन गॅसचा वापर सर्रास होत असल्याने आंब्यासोबत लोकांना विषही मोफत मिळत आहे. कॅल्शियम कार्बाईडची पाण्यासोबत प्रक्रिया होऊन अ‍ॅसिटेलीन गॅस तयार होतो. त्यापासून कमी दिवसांत फळे पिकविली जातात. येथे हा आरसेनिक फॉस्फरस हायड्राईड तयार होते. हे विषारी पदार्थ असून आरोग्यास अत्यंत हानिकारक आहे, तर इथेलिन गॅसमुळेही अनेक आजार बळावतात. स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळे व भाजीपाला विक्रीच्या परिसरात आंब्याचे ५ मोठे तर २५ ते ३० घाऊक व्यापारी आहेत. येथून अंबानगरीत आंब्याची ठोक विक्री होते. वेयर हाऊसमध्ये खासगी गोदामात कैऱ्या ठेवल्या जातात. गंभीर आजाराला आमंत्रणअमरावती : येथेच कॅल्शियम कार्बाईड हा इथेलिन गॅस तयार करतो. यांचा वापर करून आंबे पिकविले जात असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. मोठ्या उत्साहाने आंब्यांची खरेदी करणाऱ्यांना विषारी घातक रासायनिक द्रव्ये या आंब्यांच्या माध्यमातून शरीरात जात असल्याने अनेक आजारांला निमंत्रण दिले जात आहे. तज्ज्ञांच्या मते अशा आंब्यांचे सेवन केल्याने किडनी, लिव्हर, कॅन्सरसाखे गंभीर आजार बळावतात. अमरावती बाजार समितीत प्रतिनिधींनी पाहणी केली असता एक व्यापारी कच्चे आंबे ट्रेमध्ये कैऱ्या भरताना आढळून आला. त्यावर विशिष्ट प्रकारच्या स्प्रेमधून कसल्याशा रसायनांची फवारणी केली जात होती. याबाबत त्यांना विचारणा केली असता त्यांनी ते द्रव्य म्हणजे पाणी असल्याचे सांगितले. परंतु दोन बॉटल्समधील पाणी ढीगभर आंब्यांना कसे पुरणार? हा प्रश्न लोकमत प्रतिनिधीला पडला. अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता येथील होलसेल फळेविक्रेत्यांनी अधिक माहिती देण्यास टाळाटाळ केली. बाजारपेठेत दशहरी, बैगनफल्ली-बदाम, लाल पट्टा, हापूस (बंगळुरू), हापूस (देवळगांव), आदी प्रजातींचे आंबे दाखल झाले आहेत. सर्वसाधारण प्रजातींचे आंबे ४० ते १०० रूपये प्रतीकिलो दराने तर देवळगांवच्या हापूस आंब्याला २२०० ते २८०० रुपए प्रती पेटी असा दर आकारला जातोे. एका घाऊक आंबे व्यापाराची दररोजची उलाढाल ५० हजारांच्या घरात आहे. कॅल्शियम कार्बाईडची प्रक्रिया होऊन इथेल अल्कोहोल किंवा इथेलिन गॅस (उ2ऌ4डऌ) तयार होतो. हा अतिशय घातक आहे. हे एकप्रकारचे केमिकल असून फळांवर जास्त डोज झाला तर ते हानीकारक आहे. -राहुल सावरकरप्राध्यापक, रसायनशास्त्रआंबे पिकविण्यासाठी कार्बाईड व इथेलिन गॅसचा सर्रास वापर अन्न, प्रशासन विभागाने करावी कारवाई फळे विकविण्यासाठी कॅल्शियम कार्बाईड व इथेलिन गॅसचा किंवा इतर रासायनिक पदार्थांचा वापर होत असेल तर अन्न व औषधी प्रशासन विभागाने धाडी टाकून अशा व्यवसायिकांविरुद्ध कारवाई करणे गरजेचे आहे. रासायनिक द्रव्ययुक्त फळांची बाजारपेठेत विक्री होत असेल तर त्यांचे सेवन केल्याने किडनी व लिव्हरला धोका संभवतोे. यामुळे भविष्यात कॅन्सर होण्याची शक्यताही नाकारात येत नाही. रोगप्रतिकारशक्ती कमी होते. मेंदूचे आजार होऊ शकतात. - राजेश मुंदे, हृदय व मधुमेहतज्ज्ञ, अमरावती डॉक्टरांच्या मते, असे होतात आजार आंब्यांवर कार्बाईडचा वापर होत असेल तर ते फळांसोबत पोटात गेल्याने रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. किडनी, लिव्हर निकामी होऊ शकते. ही प्रक्रिया सतत सुरू राहिल्यास कॅन्सर व मेंदूचे आजारही होतात. दूषित फळांचा लहान मुलांच्या शरीरावर घातक परिणाम होतो.काय आहे कॅलशियम कार्बाईड ?कॅलशियम कार्बाईड (उंउ2) चा हवेसोबत संयोग झाला प्रचंड उष्णता तयार होते. त्या उष्णतेनेच फळे पिकतात. त्यामुळे फळे पिकविण्यासाठी याचा सर्रास वापर केला जातो.