शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

तिशीतील युवा शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या

By admin | Updated: January 1, 2017 00:47 IST

सततचा दुष्काळ, नापिकीचे सत्र यामुळे वाढणारे कर्ज आदींमुळे नैराश्य येऊन दीड दशकात अमरावती विभागासह

धक्कादायक वास्तव : विमुक्त जाती-जमातीमधील शेतकऱ्यांचे प्रमाण अधिक, सातबारा कोरा करणे हा पर्याय गजानन मोहोड अमरावती सततचा दुष्काळ, नापिकीचे सत्र यामुळे वाढणारे कर्ज आदींमुळे नैराश्य येऊन दीड दशकात अमरावती विभागासह वर्धा जिल्ह्यातील १३ हजार ४५६ शेतकऱ्यांनी मृत्यूचा फास जवळ केला. यामध्ये सर्वाधिक एक हजार ५३२ आत्महत्या ह्या ३० ते ४५ वयोटातील आहे व यामध्ये विमुक्त जाती-जमातीमधील शेतकऱ्यांचे प्रमाण २८ टक्के असल्याची धक्कादायक माहिती आहे. १ जानेवारी २००१ ते २५ डिसेंबर २०१६ या कालावधीत सर्वाधिक शेतकरी आत्महत्या यवतमाळ जिल्ह्यात झाल्या. या जिल्ह्यात ३ हजार ७०४ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. २०१५ पर्यंत सर्वाधिक शेतकरी आत्महत्या असणारा जिल्हा, अशी यवतमाळची ओळख होती. परंतु यंदा २०१६ मध्ये राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या या अमरावती जिल्ह्यात झाल्यात. यंदा २५ डिसेंबरपर्यंत ३४० शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. यापूर्वी राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या असणाऱ्या यवतमाळ व उस्मानाबाद जिल्ह्यात २४ जुलै २०१५ च्या शासन निर्णयानुसार विशेष मदतीचा कार्यक्रम घेण्यात आला. त्याचे सकारात्मक परिणाम यंदा दिसून आले. विदर्भ व मराठवाड्यातील १४ जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक शेतकरी होत असल्याने शेतकरी आत्महत्येचा शोध घेण्यासाठी व तातडीची उपाययोजना करण्यासाठी तसेच सामाजिक, आर्थिक व मनोवैज्ञानिक अभ्यासासाठी शासनाने ‘इंदिरा गांधी आॅफ डेव्हलपमेंट रिसर्च’ या संस्थेची नियुक्ती करण्यात आली होती. यामध्ये शेतकरी आत्महत्यामागे कर्जबाजारीपणा, नापिकी किंवा कमी उत्पन्न, आजारीपणा, मुलीच्या लग्नासाठी कर्जबाजारी, शेतीशिवाय उत्पन्नाचे साधन नाही व शेती उत्पन्नातून अधिक नफ्यासाठी मूल्य वृद्धी नाही आदी अनेक कारणे समोर आली. यावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करून शेतकरी आत्महत्याप्रवण जिल्ह्यासाठी विशेष योजना राबविण्यात आल्या. मात्र खऱ्या शेतकरी लाभार्थ्यांपर्यंत या योजना पोहोचत नाहीत. कायमस्वरुपी व दीर्घकालीन उपाययोजनापेक्षा वरवरची मलमपट्टी करण्यावर आजवर शासनाने भर दिल्याने शेतकरी आत्महत्येचे प्रमाण काही जिल्ह्यात वाढत आहे.