शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

तिशीतील युवा शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या

By admin | Updated: January 1, 2017 00:47 IST

सततचा दुष्काळ, नापिकीचे सत्र यामुळे वाढणारे कर्ज आदींमुळे नैराश्य येऊन दीड दशकात अमरावती विभागासह

धक्कादायक वास्तव : विमुक्त जाती-जमातीमधील शेतकऱ्यांचे प्रमाण अधिक, सातबारा कोरा करणे हा पर्याय गजानन मोहोड अमरावती सततचा दुष्काळ, नापिकीचे सत्र यामुळे वाढणारे कर्ज आदींमुळे नैराश्य येऊन दीड दशकात अमरावती विभागासह वर्धा जिल्ह्यातील १३ हजार ४५६ शेतकऱ्यांनी मृत्यूचा फास जवळ केला. यामध्ये सर्वाधिक एक हजार ५३२ आत्महत्या ह्या ३० ते ४५ वयोटातील आहे व यामध्ये विमुक्त जाती-जमातीमधील शेतकऱ्यांचे प्रमाण २८ टक्के असल्याची धक्कादायक माहिती आहे. १ जानेवारी २००१ ते २५ डिसेंबर २०१६ या कालावधीत सर्वाधिक शेतकरी आत्महत्या यवतमाळ जिल्ह्यात झाल्या. या जिल्ह्यात ३ हजार ७०४ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. २०१५ पर्यंत सर्वाधिक शेतकरी आत्महत्या असणारा जिल्हा, अशी यवतमाळची ओळख होती. परंतु यंदा २०१६ मध्ये राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या या अमरावती जिल्ह्यात झाल्यात. यंदा २५ डिसेंबरपर्यंत ३४० शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. यापूर्वी राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या असणाऱ्या यवतमाळ व उस्मानाबाद जिल्ह्यात २४ जुलै २०१५ च्या शासन निर्णयानुसार विशेष मदतीचा कार्यक्रम घेण्यात आला. त्याचे सकारात्मक परिणाम यंदा दिसून आले. विदर्भ व मराठवाड्यातील १४ जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक शेतकरी होत असल्याने शेतकरी आत्महत्येचा शोध घेण्यासाठी व तातडीची उपाययोजना करण्यासाठी तसेच सामाजिक, आर्थिक व मनोवैज्ञानिक अभ्यासासाठी शासनाने ‘इंदिरा गांधी आॅफ डेव्हलपमेंट रिसर्च’ या संस्थेची नियुक्ती करण्यात आली होती. यामध्ये शेतकरी आत्महत्यामागे कर्जबाजारीपणा, नापिकी किंवा कमी उत्पन्न, आजारीपणा, मुलीच्या लग्नासाठी कर्जबाजारी, शेतीशिवाय उत्पन्नाचे साधन नाही व शेती उत्पन्नातून अधिक नफ्यासाठी मूल्य वृद्धी नाही आदी अनेक कारणे समोर आली. यावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करून शेतकरी आत्महत्याप्रवण जिल्ह्यासाठी विशेष योजना राबविण्यात आल्या. मात्र खऱ्या शेतकरी लाभार्थ्यांपर्यंत या योजना पोहोचत नाहीत. कायमस्वरुपी व दीर्घकालीन उपाययोजनापेक्षा वरवरची मलमपट्टी करण्यावर आजवर शासनाने भर दिल्याने शेतकरी आत्महत्येचे प्रमाण काही जिल्ह्यात वाढत आहे.