शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

तिशीतील युवा शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या

By admin | Updated: January 1, 2017 00:47 IST

सततचा दुष्काळ, नापिकीचे सत्र यामुळे वाढणारे कर्ज आदींमुळे नैराश्य येऊन दीड दशकात अमरावती विभागासह

धक्कादायक वास्तव : विमुक्त जाती-जमातीमधील शेतकऱ्यांचे प्रमाण अधिक, सातबारा कोरा करणे हा पर्याय गजानन मोहोड अमरावती सततचा दुष्काळ, नापिकीचे सत्र यामुळे वाढणारे कर्ज आदींमुळे नैराश्य येऊन दीड दशकात अमरावती विभागासह वर्धा जिल्ह्यातील १३ हजार ४५६ शेतकऱ्यांनी मृत्यूचा फास जवळ केला. यामध्ये सर्वाधिक एक हजार ५३२ आत्महत्या ह्या ३० ते ४५ वयोटातील आहे व यामध्ये विमुक्त जाती-जमातीमधील शेतकऱ्यांचे प्रमाण २८ टक्के असल्याची धक्कादायक माहिती आहे. १ जानेवारी २००१ ते २५ डिसेंबर २०१६ या कालावधीत सर्वाधिक शेतकरी आत्महत्या यवतमाळ जिल्ह्यात झाल्या. या जिल्ह्यात ३ हजार ७०४ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. २०१५ पर्यंत सर्वाधिक शेतकरी आत्महत्या असणारा जिल्हा, अशी यवतमाळची ओळख होती. परंतु यंदा २०१६ मध्ये राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या या अमरावती जिल्ह्यात झाल्यात. यंदा २५ डिसेंबरपर्यंत ३४० शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. यापूर्वी राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या असणाऱ्या यवतमाळ व उस्मानाबाद जिल्ह्यात २४ जुलै २०१५ च्या शासन निर्णयानुसार विशेष मदतीचा कार्यक्रम घेण्यात आला. त्याचे सकारात्मक परिणाम यंदा दिसून आले. विदर्भ व मराठवाड्यातील १४ जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक शेतकरी होत असल्याने शेतकरी आत्महत्येचा शोध घेण्यासाठी व तातडीची उपाययोजना करण्यासाठी तसेच सामाजिक, आर्थिक व मनोवैज्ञानिक अभ्यासासाठी शासनाने ‘इंदिरा गांधी आॅफ डेव्हलपमेंट रिसर्च’ या संस्थेची नियुक्ती करण्यात आली होती. यामध्ये शेतकरी आत्महत्यामागे कर्जबाजारीपणा, नापिकी किंवा कमी उत्पन्न, आजारीपणा, मुलीच्या लग्नासाठी कर्जबाजारी, शेतीशिवाय उत्पन्नाचे साधन नाही व शेती उत्पन्नातून अधिक नफ्यासाठी मूल्य वृद्धी नाही आदी अनेक कारणे समोर आली. यावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करून शेतकरी आत्महत्याप्रवण जिल्ह्यासाठी विशेष योजना राबविण्यात आल्या. मात्र खऱ्या शेतकरी लाभार्थ्यांपर्यंत या योजना पोहोचत नाहीत. कायमस्वरुपी व दीर्घकालीन उपाययोजनापेक्षा वरवरची मलमपट्टी करण्यावर आजवर शासनाने भर दिल्याने शेतकरी आत्महत्येचे प्रमाण काही जिल्ह्यात वाढत आहे.