शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
3
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
4
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे 29 महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
5
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
6
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
7
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
8
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
9
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
10
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
11
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
12
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
13
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
14
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
15
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
16
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
17
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
18
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
19
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
20
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
Daily Top 2Weekly Top 5

माहिती अधिकाराची सर्वाधिक प्रलंबित प्रकरणं अमरावती विभागात

By admin | Updated: August 10, 2015 23:04 IST

राज्यभरात व्दितीय अपिलांमधील २४ हजार प्रकरणांना निकालाची प्रतीक्षा.

सुनील काकडे / वाशिम : माहिती अधिकार अधिनियमामुळे नागरिकांना लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकार्‍यांना त्यांच्या कामाचा जाब विचारण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. ही बाब सुप्रशासनासाठी आवश्यक असली तरी माहिती अधिकारातील प्रलंबित प्रकरणांची संख्या वर्षागणिक वाढत चालली असून एकट्या अमरावती विभागात आजमितीस ९४४ तक्रार अर्ज दाखल असून प्रलंबित व्दितीय अपिलांची संख्या ६ हजार ७३३ वर पोहोचली आहे. राज्यातील इतर विभागांच्या तुलनेत हा आकडा सर्वाधिक आहे. २00५ मध्ये अस्तित्वात आलेल्या केंद्रशासनाच्या माहिती अधिकार अधिनियमाने यावर्षी दहाव्या वर्षांत पदार्पण केले आहे. या अधिनियमामुळे लोकसहभाग, पारदर्शकता व उत्तरदायित्व या तिन्ही अत्यावश्यक बाबींचा संगम घडवून आणला आहे. त्यामुळेच प्रत्येक वर्षी माहिती अधिकारांत दाखल होणार्‍या अर्जांची व तक्रारींची संख्या वाढत आहे. राज्यभरात २00९ पासून २0१५ पर्यंंत माहिती अधिकारांत दाखल झालेल्या तक्रारींमध्ये मुंबई (मुख्यालय) ६८, बृहन्मुंबई ५३६, कोकण ३१, पुणे ३५१, औरंगाबाद ३१७, नाशिक ४१0, नागपूर ६७, तर अमरावती विभागात ९४४, अशा एकूण २७२४ तक्रार अर्जांचा समावेश आहे. व्दितीय अपिलांमध्ये दाखल झालेल्या प्रकरणांमध्ये मुंबई (मुख्यालय) ४२५, बृहन्मुंबई २१५८, कोकण २९१७, पुणे ६५0१, औरंगाबाद १६२७, नाशिक ३५१0, नागपूर ३२0; तर अमरावती विभाग इतर विभागांच्या तुलनेत अव्वल असून या विभागातील व्दितीय अपिलांची संख्या ६७३३ आहे. राज्यभरात एकूण २४ हजार १९१ व्दितीय अपिलांची प्रकरणे प्रलंबित आहेत.