शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
2
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
3
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
4
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
5
"विमान टेकऑफ होण्यापूर्वी तरुण म्हणाला माझ्या खिशात बॉम्ब"; प्रवाशांना फुटला घाम, प्रचंड गोंधळ
6
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
7
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!
8
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
9
वाद झाला अन् मध्यरात्री... दापोलीत लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या; उन्हवरे गाव हादरलं
10
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
11
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
12
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
13
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
14
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
15
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
16
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
17
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय
18
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
19
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
20
'डॉन ३' मधून विक्रांत मेस्सी बाहेर, 'बिग बॉस' विजेता अभिनेता बनणार व्हिलेन? नवी अपडेट समोर

चार कोटी आठ लाख रुपयांच्या गहाण वस्तू शेतकऱ्यांना परत

By admin | Updated: November 11, 2015 00:19 IST

सुमारे ५ हजार ५२ शेतकऱ्यांना शासनाच्या कर्जमुक्ती योजनेतून लाभ मिळाला आहे.

सावकारी पाश : २ हजार ३५१ शेतकऱ्यांना लाभअमरावती : सुमारे ५ हजार ५२ शेतकऱ्यांना शासनाच्या कर्जमुक्ती योजनेतून लाभ मिळाला आहे. यामध्ये २ हजार ३५१ शेतकऱ्यांना ४ कोटी ८ लाख रुपये किमतीच्या वस्तू परत करण्यात आल्या आहेत. मागील काही वर्षांत शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोडमडले आहे. कृषी उत्पादकांवर स्थिर किंवा घसरलेल्या किमती आणि शेतीचा वाढलेला खर्च या दृष्टकाळात शेतकरी अडकले. मान्सूनची अनियमितता किंवा नैसर्गिक आपत्तीने त्यांच्या संकटात अधिक भर टाकली. शेतकरी मोठ्या प्रमाणावर आर्थिक संकटात सापडला आणि आत्महत्येच्या घटना घडू लागल्या. २०१४ मध्ये पावसाच्या अनियमिततेने खरीप पिकांचे नुकसान झाले. सोबतच रबी हंगामासाठी शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागले. मागील वर्षी २०९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबले होते. परवानाधारक सावकारांकडून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाली. पण अवैध सावकारीचा पाश कायम आहे. जिल्ह्यात एकूण ४४७ परवानाधारक सावकार आहेत. ३० नाव्हेंबर २०१४ अखेरपर्यंत कर्जदारांना १०१ कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले होते. राज्य शासनाने १० एप्रिलला विदर्भ आणि मराठवाड्यातील परवानाधारक सावकारांकडून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफ करण्याचा निर्णय घेतला होता. आॅक्टोबर अखेर ५ हजार ५२ कर्जदारांना ११ कोटी ४२ लाख रुपये सावकारी जिल्हास्तरीय समितीने मंजुरी दिली. त्यापैकी २ हजार ५५१ शेतकऱ्यांना ४ कोटी ८ लाखांच्या किमती वस्तू परत करण्यात आल्या आणि त्यांना सावकारी कर्जातून मुक्त करण्यात आले, अशी माहिती सूत्रांनी दिली. जिल्ह्यात २०१४-१५ या वर्षात १ हजार ६२२ कोटींचे खरीप कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी १ लाख २१ हजार शेतकऱ्यांना १ हजार २१९ कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले होते. (प्रतिनिधी)