शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

चार कोटी आठ लाख रुपयांच्या गहाण वस्तू शेतकऱ्यांना परत

By admin | Updated: November 11, 2015 00:19 IST

सुमारे ५ हजार ५२ शेतकऱ्यांना शासनाच्या कर्जमुक्ती योजनेतून लाभ मिळाला आहे.

सावकारी पाश : २ हजार ३५१ शेतकऱ्यांना लाभअमरावती : सुमारे ५ हजार ५२ शेतकऱ्यांना शासनाच्या कर्जमुक्ती योजनेतून लाभ मिळाला आहे. यामध्ये २ हजार ३५१ शेतकऱ्यांना ४ कोटी ८ लाख रुपये किमतीच्या वस्तू परत करण्यात आल्या आहेत. मागील काही वर्षांत शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोडमडले आहे. कृषी उत्पादकांवर स्थिर किंवा घसरलेल्या किमती आणि शेतीचा वाढलेला खर्च या दृष्टकाळात शेतकरी अडकले. मान्सूनची अनियमितता किंवा नैसर्गिक आपत्तीने त्यांच्या संकटात अधिक भर टाकली. शेतकरी मोठ्या प्रमाणावर आर्थिक संकटात सापडला आणि आत्महत्येच्या घटना घडू लागल्या. २०१४ मध्ये पावसाच्या अनियमिततेने खरीप पिकांचे नुकसान झाले. सोबतच रबी हंगामासाठी शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागले. मागील वर्षी २०९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबले होते. परवानाधारक सावकारांकडून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाली. पण अवैध सावकारीचा पाश कायम आहे. जिल्ह्यात एकूण ४४७ परवानाधारक सावकार आहेत. ३० नाव्हेंबर २०१४ अखेरपर्यंत कर्जदारांना १०१ कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले होते. राज्य शासनाने १० एप्रिलला विदर्भ आणि मराठवाड्यातील परवानाधारक सावकारांकडून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफ करण्याचा निर्णय घेतला होता. आॅक्टोबर अखेर ५ हजार ५२ कर्जदारांना ११ कोटी ४२ लाख रुपये सावकारी जिल्हास्तरीय समितीने मंजुरी दिली. त्यापैकी २ हजार ५५१ शेतकऱ्यांना ४ कोटी ८ लाखांच्या किमती वस्तू परत करण्यात आल्या आणि त्यांना सावकारी कर्जातून मुक्त करण्यात आले, अशी माहिती सूत्रांनी दिली. जिल्ह्यात २०१४-१५ या वर्षात १ हजार ६२२ कोटींचे खरीप कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी १ लाख २१ हजार शेतकऱ्यांना १ हजार २१९ कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले होते. (प्रतिनिधी)