शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

मोर्शी तालुक्यात १२० रोहित्र बसविणार

By admin | Updated: July 20, 2015 00:06 IST

राज्य वीज वितरण कंपनीव्दारे मोर्शी तालुक्यातील प्रलंबित कृषिपंपांना डिसेंबर २०१५ पर्यंत वीजपुरवठा केला जाणार आहे.

दिलासा : प्रलंबित कृषिपंपांना होणार वीजपुरवठा रोहितप्रसाद तिवारी  मोर्शीराज्य वीज वितरण कंपनीव्दारे मोर्शी तालुक्यातील प्रलंबित कृषिपंपांना डिसेंबर २०१५ पर्यंत वीजपुरवठा केला जाणार आहे. वीज वितरणात सुधारणा करण्याकरिता जवळपास १२० रोहित्रे बसविण्यात येणार आहेत. ग्राहक संपर्क अभियानात वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता एन. टी.चौधरी यांनी ही माहिती दिली. समारोपीय कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, तहसीलदार बक्षी, नगरसेवक अजय आगरकर उपस्थित होते. अतिभार रोहित्रांवरील भार कमी करण्यासोबतच शेतकऱ्यांना योग्य दाबाने वीजपुरवठा व्हावा या हेतूने १०० केव्हीएचे १२० नवीन रोहित्र तालुक्यात बसविण्यात येणार आहेत. २०१२-१३ आणि १३-१४ या दोन वर्षांतील प्रलंबित कृषि पंपांना सप्टेबर महिणा अख्ोर तर ३१ मार्च २०१५ पर्यंत पैश्याचा भरणा केलेल्या शेतकऱ्यांना ३१ डिसेंबरपर्यंत वीजपुरवठा केला जाणार आहे. या कामांचे कंत्राटसुध्दा देण्यात आले आहे. धडक सिंचन योजनेअंतर्गत ज्यांनी रक्कम भरली अशा शेतकऱ्यांना सर्वोच्च प्राधान्याने वीजपुरवठा केला जाणार आहे. कृषी पंपाकरिता विजेची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ५९१ आहे, त्यांची यादी तयार करून ज्यांनी रक्कम भरल्याची पावती वीज वितरण कंपनीकडे सादर केली नाही, आणि यादीत नाव नाही, त्यांनी भरणा केल्याचा पुरावा सादर केल्यास त्यांचे नावही यादीत समाविष्ट करण्यात येईल, असेही कार्यकारी अभियंता यांनी यावेळी सांगितले. डिसेंबर २०१५ अखेर कृषिपंपाचा अनुशेष शंभर टक्के दूर होणार आहे.इन्फ्रा-२ योजनेअंतर्गत पाळा-भीवकुंडी येथील ५ एमव्हीए क्षमतेचे वीज उपकेंद्र जून २०१६ अखेर पूर्णत्वास जाणार आहे. कृषिपंपाच्या वीजपुरवठ्याकरिता ५ खांबांपर्यंतच्या जोडण्या मंजूर करण्याचे अधिकार कनिष्ठ अभियंत्यांना देण्यात आले आहे. धडक सिंचन योजना, रोजगार हमी योजना, दिनदयाल उपाध्याय ग्रामीण ज्योती योजना, डीपीडीसी योजनाअंतर्गत विविध कामे प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. ग्राहक संपर्क अभियानात विजेच्या बिलासंदर्भात १४, अतिभार रोहित्रांबाबत २१, शेतीपंपाच्या प्रलंबितप्रकरणी ७, वीज संयंत्र देखभालीचे ९, पथदिव्यांचे २, उपकेंद्रांच्या मागणीबाबतचे २ अशा ३२ तक्रारी आणि सूचना प्राप्त झाल्यात. उपस्थित अधिकाऱ्यांनी ग्राहकांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे प्रयत्न या वेळी केले. ग्राहक संपर्क अभियानाकरिता कार्यकारी अभियंता एन. टी.चौधरी, उपकार्यकारी अभियंता संजय खाटके, बारई, शेख, सहायक अभियंता कडू व कनिष्ठ अभियंता उपस्थित होते.