शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
8
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
9
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
10
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
11
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
12
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
13
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
14
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
15
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
16
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
17
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
18
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
19
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल
20
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

सकाळ जणू रखरखती दुपारच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 22:04 IST

सध्या दिवसाच्या तापमानात वाढ झाली आहे. वातावरण बदलामुळे विषाणुजन्य तापाच्या रूग्णात वाढ झाली आहे. अंगाची काहिली करणाऱ्या या उन्हामुळे दुपारचे रस्ते ओस पडत आहे.

जितेंद्र दखने ।आॅनलाईन लोकमतअमरावती : सध्या दिवसाच्या तापमानात वाढ झाली आहे. वातावरण बदलामुळे विषाणुजन्य तापाच्या रूग्णात वाढ झाली आहे. अंगाची काहिली करणाऱ्या या उन्हामुळे दुपारचे रस्ते ओस पडत आहे. तापमानात आनखी वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे जिल्हा सामान्य रूग्णालयात उषमागात कक्ष सुरू केलेला आहे.सध्या रबीचा हंगाम सुरू आहे. मात्र रखरखत्या उन्हामुळे शेतीकामाच्या वेळा बदलल्या आहेत. मजूरवर्ग दुपारऐवजी सकाळच्या सत्रातच कामे संपवीत आहेत. या रखरखत्या उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य सभापतींनी शाळेची वेळ सकाळी करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. घराघरात कुलर सुरू झाले. या उन्हात अनेक शाळांमध्ये पंख्याची सुविधा नसताना वार्षिक परीक्षा सुरू असल्याने वाढत्या तापमानाचा फटका मुलांना बसत आहे. उन्हाचा तडाखा व त्यात अनेक ठिकानी पाइपलाइन फुटल्यामुळे होणारा दुषित पाण्याचा पुरवठा यामुळे आजारांनी डोके वर काढले आहे. विशेषत: लहान मुले व वृद्धांना याचा मोठा त्रास होत आहे. रूग्नालयातही वाढती गर्दी आहे. यंदाच्या उन्हाळ्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामानतज्ञांनी वर्तविली असल्याने काळजी घेणे महत्वाचे आहे.५६ पीएससीमध्ये उष्माघात कक्षयंदा मार्च महिन्यात उन्हाचे चटके अधिक जाणवत असल्याने आरोग्य विभागाने महिनाभरापूर्वी उन्हापासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनात नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक पीएचसीत व जिल्हा सामान्य रूग्णालयात खबरदारीचा उपाय म्हणून उष्माघात क़क्ष स्थापन करण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी सुरेश असोले यांनी दिली.उपचाररुग्णास हवेशीर खोलीत ठेवावे, खोलीत पंखे, कुलर सुरू ठेवावे, रुग्णांचे तापमान कमी होण्यासाठी प्रयत्न करावे, कपाळावर थंड्या पान्याच्या पट्या ठेवाव्या.उष्माघातची कारणेउन्हामध्ये शेतात अथवा इतर मजुरीची कामे फार वेळ करणे, जास्त तापमानाच्या खोलीत कामे करणेकारखान्याच्या बॉयलर रूममध्ये काम करणे, काच कारखान्यात कामे करणे, घट्ट व गडद रंगाच्या कापडाचा वापर करणेउष्माघात टाळण्यासाठी घ्या काळजीप्रतिकारशक्ती चांगली असेल तर उष्माघाताचा धोका टळतो. त्यामुळे चांगला आहार घ्यावा. अधिक पाणी प्यावे, आहारात व्हिटॅमिन ‘सी’ असणाऱ्या फळांचा समावेश केला पाहिजे. यातून प्रतिकारशक्ती चांगली राहण्यास मदत होते.पाच वर्षाखालील मुले आणि ६५ वर्षांवरील ज्येष्ठांची प्रतिकारशक्ती कमी असते. यांना उष्माघाताचा धोका अधिक असतो. त्यामुळे उष्माघात टाळण्यासाठी मुले आणि ज्येष्ठांची अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे.उष्माघात टाळण्यासाठी १२ ते ३ या वेळेत बाहेर पडण्याचे टाळावे. सुती कपड्यांचा वापर करणे, बाहेर पडणे आवश्यक असल्यास रुमाल, टोपी, गॉगल्सचा वापर करावा. हलक्या प्रतीच्या गॉगलमुळे डोळ्यांना संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे असे गॉगल वापरण्याचे टाळावे.उन्हामुळे शरीरातील क्षार कमी होतात. अशक्तपणा, डोकेदुखी, सतत घाम येणे, उलट्या होणे, झटके येणे, खूप ताप येणे, बेशुद्ध पडणे ही उष्माघाताची लक्षणे आहेत. अशा वेळी तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.उन्हामुळे थंड पदार्थाकडे ओढा वाढतो. परंतु दूषित पाण्यापासून बनलेल्या बर्फामुळे घसा खवखवतो. त्यातून पुढे आजार वाढू शकतो. त्यामुळे अशा बर्फाचा वापर असलेले पदार्थ टाळले पाहिजे.कामगारांनी दुपारच्यावेळी श्रमाची कामे टाळावीत. सकाळी आणि सायंकाळी काम करण्यास प्राधान्य द्यावे. शिवाय उन्हात काम करणाऱ्या कामगारांनी रुमाल, टोपीचा वापर करावा.उष्माघाताची लक्षणे दिसल्यावर अनेकदा घरगुती उपचार घेण्यावर भर दिला जातो. परंतु असे घरगुती उपचार करण्याचे टाळावे. लक्षणे दिसल्यावर तत्काळ वैद्यकीय सल्ला घेणे महत्त्वपूर्ण ठरते.चहा, कॉपी अल्कोहोलचा वापर टाळावा. शिळे अन्नपदार्थ आणि प्रतिनेयुक्त आहार टाळले पाहिजे. ओआरएस, घरगुती शीतपेय जसे लस्सी, लिंबू-पाणी, ताक इत्यादीचा वापर करावा.- उष्माघाताच्या रुग्णांना वातानुकूलित खोलीत ठेवावे.लक्षणेथकवा येणे, ताप येणे, त्वचा कोरडी पडणे,भूक न लागणे, चक्कर येणे, निरूत्साही होणे, डोके दुखणे, पोटऱ्यामध्ये वेदना होणे.मध्य भारतात ९.५ कि.मी. उंचीवर पश्चिमेकडून वाहणारे जेट वारे सक्रिय आहे. कोकणच्या ९०० मीटरवर चक्राकार वारे आहे. तीन दिवसांत तापमान ३ अंशांनी वाढणार आहे.- अनिल बंड, हवामान तज्ज्ञ