शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
2
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
3
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
4
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
5
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
6
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
7
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
8
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
9
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
10
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
11
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
12
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
13
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
14
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
15
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
16
IPL 2026 Retain and Released Player Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
17
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
18
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
19
Viral Video : एका दिवसात किती कमाई करतो मोमो विक्रेता? आकडा ऐकून हैराण व्हाल!
20
वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
Daily Top 2Weekly Top 5

क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी नेणारे आॅटो रडारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 23:07 IST

अतिक्षमतेची प्रवासी वाहतूक करून नागरिकांच्या जीव धोक्यात टाकणाऱ्या आॅटोरिक्षाचालकांविरुद्ध पोलिसांनी कारवाईचा सपाटा सुरू केला आहे. गेल्या आठवडाभरात पोलिसांनी जवळपास दीडशे आॅटोरिक्षांवर कारवाई केल्यामुळे चालकांचे धाबे दणाणले आहे.

ठळक मुद्देपोलिसांकडून कारवाईचा सपाटा : आॅटोरिक्षाचालकांचे धाबे दणाणले

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अतिक्षमतेची प्रवासी वाहतूक करून नागरिकांच्या जीव धोक्यात टाकणाऱ्या आॅटोरिक्षाचालकांविरुद्ध पोलिसांनी कारवाईचा सपाटा सुरू केला आहे. गेल्या आठवडाभरात पोलिसांनी जवळपास दीडशे आॅटोरिक्षांवर कारवाई केल्यामुळे चालकांचे धाबे दणाणले आहे.शहरातील अस्तव्यस्त व बेशिस्त वाहतुकीत भर टाकणारी आॅटोरिक्षा प्रवासी वाहतूक नागरिकांसाठी जीवघेणी ठरत असल्याचे आढळून आले आहे. गेल्या काही दिवसात अतिक्षमतेचे प्रवासी वाहतूक करणाºया आॅटोचे शहरात तीन ते चार अपघात झाले. अधिक पैसा कमावण्याच्या उद्देशाने तीन ते पाच प्रवासी बसविण्याऐवजी आठ ते दहा प्रवासी बसविण्याचे प्रकार शहरात सुरू होते. याकडे पोलीस यंत्रणेने दुर्लक्ष केले होते. पोलीस उपायुक्त प्रदीप चव्हाण यांनी पोलीस ठाण्यांना अशा आॅटोरिक्षांवर कारवाईचे निर्देश दिले आहे. त्यानुसार पोलिसांनी आता क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या आॅटोरिक्षांवर कारवाईचा सपाटा सुरू केला. आठवडाभरात दररोज दहा ते पंधरा चालकांविरुध्द पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला असून, धोकादायक वाहतूक करणाऱ्या १५० जणांवर कारवाई केली आहे.वाहतुकीस अडथळा करणाऱ्या दोनशेवर वाहनांवर कारवाईशहरातील अस्तव्यस्त वाहतुकीस कारणीभूत ठरणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यासाठी आता पोलिसांनी कंबर कसली आहे. रस्त्यावर वाहन उभे करून वाहतुकीस अडथळा करण्याचे प्रकार शहरात मोठ्या प्रमाणात वाढले असून, अशा वाहनचालकांविरुद्ध फौजदारी कारवाईचा बडगा उगारला जात आहे. आठवड्याभरात पोलिसांनी दोनशेवर वाहन व हातगाडी चालकांविरुद्ध भादंविच्या कलम २८३ अन्वये गुन्हा नोंदविला आहे.गॅस सिलिंडरच्या धोकादायक वापरावरही कारवाईशहरातील काही हॉटेल व हातगाड्यांवर गॅस सिलिंडरचा धोकादायक वापर होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास येत आहे. याविषयी पोलिसांनी गंभीर दखल घेत कारवाई सुरू केली असून, दररोज शेकडो हॉटेल व हातगाडी चालकांविरुद्ध कारवाई केली जात आहे. त्यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम २८५ अन्वये गुन्हा नोंदविण्यात येत आहे.क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करणाºया बेशिस्त आॅटोरिक्षांवर कारवाई सुरू आहे. याबाबत सर्व ठाणेदारांना निर्देश दिले आहेत.- प्रदीप चव्हाणपोलीस उपायुक्तक्षमतेपेक्षा अधिक प्रवासी आणणाºया ग्रामीण हद्दीतील आॅटोरिक्षांवर कारवाई सुरु आहे. आठवडाभरात दीडशे आॅटोरिक्षांवर कारवाई करण्यात आली.- रणजीत देसाई, एसीपी