शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

मुद्दलपेक्षा अधिक व्याजास निर्बंध

By admin | Updated: May 28, 2017 00:06 IST

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० कलम ४४ (अ) च्या तरतुदीप्रमाणे कर्ज मुद्दलाच्या रकमेपेक्षा अधिक व्याज वसुलीवर करण्यावर सहकार विभागाने निर्बंध घातले आहे.

शेतकऱ्यांना दिलासा : सहकारी संस्थेचे अधिनियमलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० कलम ४४ (अ) च्या तरतुदीप्रमाणे कर्ज मुद्दलाच्या रकमेपेक्षा अधिक व्याज वसुलीवर करण्यावर सहकार विभागाने निर्बंध घातले आहे. या निर्णयामुळे व्याजाची तुघलकी आकारणी करणाऱ्या बँकांना लगाम घातला गेल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.कोणत्याही करारामध्ये त्या-त्या वेळी अमलात असलेल्या कोणत्याही कायद्यामध्ये काहीही अंतर्भूत असले तरी एखादी संस्था (जिल्हा बँक, सहकारी कृषी व ग्रामीण बहुउद्देशीय विकास संस्था) धरून जास्तीत जास्त १५ वर्षांपेक्षा अधिक नसेल. इतक्या कालावधीसाठी (सदस्य संख्या गृहित धरून) हे आदेश लागू आहेत. याशिवाय कोणत्याही सदस्यास दिलेल्या कोणत्याही कर्जाचे पुनर्गठन कर्ज धरून, परंतु जलसिंचन किंवा कृषी विकास प्रयोजनासाठी असलेली दीर्घ मुदतीचे कर्ज किंवा वाणिज्यिक प्रयोजनासाठी हे आदेश लागू आहेत.१० हजाराहून अधिक रकमेचे कर्ज वगळून असे कर्ज महाराष्ट्र सहकारी संस्था (दुसरी सुधारणा) अधिनियम १०८५ च्या प्रारंभापूर्वी किंवा प्रारंभानंतर देण्यात आलेले असेल तर त्यावरील व्याजापोटी कर्जाच्या मुद्दल रकमेपेक्षा मोठी रकम कोणत्याही रितीने वसूल करता येणार नाही. अशा प्रकारच्या व्याज वसुलीस सहकार विभागाने निर्बंध घातले आहेत. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ४४ (अ) प्रमाणे कर्जदार सभासदाने जेवढे कर्ज घेतले आहे. तेवढ्याच मुद्दलीचे व्याज खातेदाराकडून वसूल करणे अपेक्षित आहे. मात्र सहकारी संस्थामध्ये प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था व जिल्हा सहकारी बँकामध्ये कर्जदार सभासदांकडून मुद्दलपेक्षा अधिक व्याज वसूल केले जाते, असे शासनाच्या निदर्शनात आले आहे. त्यामुळे आता सहकार विभागाने खातेदारांच्या मुद्दलीपेक्षा अधिक रकमेच्या वसुलीवर निर्बंध घातले आहेत. कृषी व ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँकांनी एक लाखापेक्षा अधिक कर्ज दिले असेल तर या अधिनियमातील तरतुदी लागू होणार नाहीत.मुद्दलऐवजी व्याज खात्यात होतो भरणाकर्जाची वसुली करताना संस्थामध्ये सभासदांकडून भरणा केलेली रक्कम आधी व्याजाच्या खात्यातून वजा केली जाते. त्यामुळे त्यांची मुद्दल तशीच राहते व त्यावरील व्याजाचा बोजा वाढतच जातो. हा शेतकरी सभासदांवर अन्याय असल्याने अधिनियमांच्या तरतुदीनुसार मुद्दलपेक्षा अधिक व्याज आकारणीस निर्बंध घालण्यात आले आहे. १५ वर्षे मुदतीच्या कर्जास नियम लागूही तरतूद कलम ४४ अन्वये पुनर्गठन कर्जासह १५ वर्षे मुदतीच्या कर्जांना व सहकारी बँक, भूविकास बँकसहित सर्व संस्थांना लागू आहे. सभासद संस्थाशिवाय सर्व सभासद संस्थांनी घेतलेल्या कर्जासदेखील ही तरतूद लागू आहे. या संस्थांनी वितरित केलेल्या कोणत्याही कर्जावर कोणत्याही पद्धतीने मुद्दलाच्या रकमेपेक्षा अधिक व्याज वसूल करता येणार नाही.