शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

अमरावती विभागातील नायब तहसीलदारांची १६० पेक्षा अधिक पदे रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2021 12:52 IST

अमरावती विभागातील अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशिम, बुलडाणा जिल्ह्यातील नायब तहसीलदारांची १६० पेक्षा अधिक पदे रिक्त आहेत. त्यामुळे मंडळ अधिकारी यांच्यावर अतिरिक्त कामाचा ताण वाढून कार्यक्षमतेवर परिणाम होत आहे.

ठळक मुद्देसेवाज्येष्ठता मंडळ अधिकाऱ्यांना कारकून पदोन्नतीत टाळाटाळ

अमरावती : सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्त्वाच्या असलेल्या तहसील कार्यालयात नागरिकांची ससेहोलपट सुरू आहे. अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये १६० पेक्षा अधिक नायब तहसीलदारांची पदे रिक्त आहेत.

ही पदे सेवाज्येष्ठ मंडळ अधिकारी व अव्वल कारकून यांच्यामधून भरण्यास शासनाने मान्यता दिली आहे. परंतु, अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाचे अडेलतट्टू धोरण व दप्तर दिरंगाईमुळे चार महिन्यांपासून पदे भरली गेली नसल्याचे पुढे आले आहे.

अमरावती विभागातील अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशिम, बुलडाणा जिल्ह्यातील नायब तहसीलदारांची १६० पेक्षा अधिक पदे रिक्त आहेत. त्यामुळे मंडळ अधिकारी यांच्यावर अतिरिक्त कामाचा ताण वाढून कार्यक्षमतेवर परिणाम होत आहे. त्याच बरोबर नागरिकांची संवैधानिक कामे मनुष्य बळाअभावी प्रलंबित तथा खोळंबून राहत आहेत. त्यांच्या कामात दिरंगाई होत आहे नागरिकांचा शासन व प्रशासनावर प्रचंड रोष निर्माण होत आहे.

तत्काळ निर्णयाच्या अंमलबजावणीकरिता नायब तहसीलदार पदावर सेवाज्येष्ठ मंडळ अधिकारी व अव्वल कारकून यांना नियुक्ती देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय अधिकारी कर्मचारी महासंघाच्यावतीने अध्यक्ष विजयकुमार चौरपगार, कार्याध्यक्ष बी.ए. राजगडकर, महासचिव प्रल्हाद धुर्वे, कोषाध्यक्ष विश्वास दंदे आदींनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या एका निवेदनात केली आहे.

शासनाचे आदेश असताना ज्येष्ठ मंडळ अधिकारी व अव्वल कारकून यांना नायब तहसीलदारपदावर नियुक्ती देण्याची बाब आयुक्त कार्यालयाच्या दप्तरदिरंगाईमुळे मागील तीन महिन्यांपासून रखडली आहे. त्यासंदर्भात अनेकदा निवेदने दिली. परंतु, उदासीन धोरण राबविले जात आहे.

- विजयकुमार चौरपगार, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय अधिकारी-कर्मचारी महासंघ, अमरावती

टॅग्स :Governmentसरकार