शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
4
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
5
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
6
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
7
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
8
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
9
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
10
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
11
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
12
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
13
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
14
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
15
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
16
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
17
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
18
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
19
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
20
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'

मनपात बदलीचा लपंडाव

By admin | Updated: April 30, 2017 00:08 IST

आयुक्त हेमंत पवार यांनी हाती घेतलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदलीसत्रात २७ एप्रिलला पुन्हा १४ कर्मचाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आलेत.

१४ कर्मचाऱ्यांच्या बदल्या : प्रशासकीय वर्तुळात खळबळअमरावती : आयुक्त हेमंत पवार यांनी हाती घेतलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदलीसत्रात २७ एप्रिलला पुन्हा १४ कर्मचाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आलेत. यात कनिष्ठ लिपिक, शिपाई व मदतनिसांचा समावेश आहे. यात अपेक्षेप्रमाणे भूषण राठोड यांची बदली जनसंपर्क विभागात करण्यात आली. विशेष म्हणजे वर्षानुवर्र्ष एकाच ठिकाणी ‘सेवा देणाऱ्यांची बदली करण्याचा सपाटाच आयुक्तांनी लावला आहे. मात्र त्याचवेळी काहीजण झालेली बदली रद्द करण्यात यशस्वी होत असल्याने अर्थकारणाची शक्यता बळावली आहे. आयुक्तांना अंधारात ठेवत एक वरिष्ठच ‘हाथ की सफाई’करत असल्याचे महापालिकेत बोलले जाऊ लागले आहे.बदलीप्राप्त कर्मचाऱ्यांमध्ये पंकज आकोडे, विजय सुंदराणी, शाम चावरे, संजय वडुरकर, एस.यु.काळे, भास्कर कावरे, सुनील चौबे, विजय ढगे, उर्मिला दुबे, अजय चव्हाण, शालिनी पखाले आणि किशोर बाखडे यांचा समावेश आहे. प्रशासनाने पंकज आकोडे यांच्या बदलीबाबत लपंडाव चालविल्याची या यादीवरून स्पष्ट होते. आकोडे हे जीएडी मध्ये कार्यरत असताना त्यांची बदली झोन क्रमांक ५ मध्ये करण्यात होती. मात्र बहुतांशवेळा ते जीएडीचे काम करीत होते. जीएडीच्या अधिकाऱ्यांचा आकोडे यांच्यावर अधिक लोभ होता. त्यामुळे ते येथील फाईल्स हाताळत होते. ‘लोकमत’ने त्याबाबत वृत्तही प्रसिद्ध केले होते. त्यानंतर २१ एप्रिलला ३९ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्यात. त्यात आकोडे यांना पुन्हा सामान्य प्रशासन विभागात देण्यात आले. ते रुजूही झाले. मात्र २७ एप्रिलला काढण्यात आलेल्या बदली आदेशात त्यांचे नाव पुन्हा आले. आता त्यांची पदस्थापना एडीटीपीमध्ये करण्यात आली. अशाप्रकारे आकोडे यांचा प्रशासनाने चेंडू केला आहे.२७ एप्रिलच्या बदली आदेशाप्रमाणे आकोडे एडीटीपीत रुजू होतात, की पुन्हा एकदा त्यांची सेवा सामान्य प्रशासन विभागाला लाभते, याकडे महापालिका वर्तुळाचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)बदलीमध्ये अर्थकारण महापालिकेतील बदलीसत्राने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली असताना दोन बदल्यांमध्ये अर्थकारण साधला गेल्याचा आक्षेप आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने यात मलिदा लाटला असल्याची कुजबूज महापालिकेत रंगली आहे. चार बदल्यांना राजकीय दबावतंत्राने ब्रेक लावल्याचा आरोप आहे.बदल्या बदलतात कशा ?सामान्य प्रशासन विभागाकडून संचिका चालल्यानंतर उपायुक्त (प्रशासन) हे बदली आदेशामधील यादी अंतिम करतात. त्यावर आयुक्त स्वाक्षरीने शिक्कामोर्तब करतात. प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने बदल्या केल्या जातात. मात्र अवघ्या तासाभरात किंवा दोन दिवसात बदल्यांमध्ये बदल केल्या जातो.