शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यात २० गावांचा तुटतो संपर्क, ३३ गावे संपर्कक्षेत्राबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 23:17 IST

पावसाळ्यात मेळघाटातील जवळपास २० गावांचा संपर्क तुटतो, तर ३३ गावे आजही बारमाही संपर्कक्षेत्राबाहेर आहेत. १ जुलैपासून परतवाडा आगाराची हतरूला जाणारी बस रस्ता नादुरुस्त असल्याने चार महिन्यांसाठी बंद करण्यात आली. अतिदुर्गम भागात आजही समस्या कायम आहेत. त्यामुळे पावसाळ्यात प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे

ठळक मुद्देमेळघाट अलर्ट : हतरूला जाणारी बसफेरी चार महिन्यांसाठी बंद

नरेंद्र जावरे।लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : पावसाळ्यात मेळघाटातील जवळपास २० गावांचा संपर्क तुटतो, तर ३३ गावे आजही बारमाही संपर्कक्षेत्राबाहेर आहेत. १ जुलैपासून परतवाडा आगाराची हतरूला जाणारी बस रस्ता नादुरुस्त असल्याने चार महिन्यांसाठी बंद करण्यात आली. अतिदुर्गम भागात आजही समस्या कायम आहेत. त्यामुळे पावसाळ्यात प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागणार आहेमेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यात १९९३ च्या कुपोषणानंतर कोट्यवधीच्या योजनांचा पाऊस पाडण्यात आला. परंतु वीज, पाणी, रस्ता, आरोग्य, शिक्षण या पायाभूत गरजा अजूनही सर्व गावांत पोहोचल्यास नसल्याचे वास्तव आहे. संपर्काअभावी मेळघाटात बालमृत्यूचे भयावह प्रमाण केव्हाही उद्भवू शकते. दळणवळणाची साधने नसल्याने आदिवासींपर्यंत आरोग्यसेवा पोहोचू शकत नसून, आजारी रुग्णाला शहराच्या ठिकाणी आणावे कसे, हा प्रश्न अजूनही कायम आहे.संपर्क तुटणाऱ्या गावात औषध, पोषणसाठाधारणी व चिखलदरा तालुक्यात संपर्क तुटणाऱ्या गावांमध्ये आरोग्य विभाग आणि बाल विकास प्रकल्प कार्यालयातर्फे अंगणवाडी केंद्रात पोषण आहार साठा आॅक्टोबर महिन्यापर्यंत पुरेल एवढा ठेवण्यात आला असल्याचे चिखलदरा येथील एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयाचे विस्तार अधिकारी योगेश वानखेडे यांनी सांगितले. औषध पुरवठा चार महिने पुरेल एवढा ठेवण्यात आला आहे. कुपोषित बालके, आजारी रुग्णांसाठी गावातच व्यवस्था करण्यात आली. मात्र, गंभीर रुग्णांचे काय, हा प्रश्न अनुत्तरित आहे.बसफेरी १ जुलैपासून बंदपरतवाडा आगारातून अतिदुर्गम हतरुला जाणारी परतवाडा आगाराची बसफेरी १ जुलैपासून चार महिन्यांसाठी बंद करण्यात आली आहे. सदर रस्ता पूर्णत: नादुरुस्त असून, नवीन रस्त्याचे काम सुरू असल्याचे पत्र पंतप्रधान ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता आय.आय. खान यांनी उपविभागीय अधिकारी, पोलीस प्रशासन, ग्रामपंचायत, परतवाडा आगार आदी सर्व विभागांना दिले. या रस्त्यावर असलेल्या गावांमध्ये ये-जा करण्यासाठी पर्यायी रस्ता नसताना वाहतूक बंद करण्याचे दिलेले पत्र संताप व्यक्त करणारे ठरले आहे.लोकसभा निवडणुकीत वॉकीटॉकीचा वापरपावसाळ्यात नदी-नाल्यांना पुराण्या सोबत रस्ता नादुरूस्त असल्यामुळे पंधरापेक्षा अधिक गावांचा संपर्क तुटतो आरोग्य विभाग व बालविकास विभागाने संपर्क तुटणाऱ्या चिखलदरा तालुक्यातील रेहट्याखेडा, राक्षा, आढावा बिच्छूखेडा, माडीझडप, मारिता, डोमी कुही खुटीदा, सुमिता, टेंभ्रू बोरदा ,बोदु, पिपल्या, पांढराखडक, नवलगांव, पिपादरी, सलिता, लाखेवाडा, आदी गावे असून धारणी तालुक्यातील परसोली, कुंड,खामदा या बैरागड व बिजुधावडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील गावांचा समावेश आहे,तर चिखलदरा तालुक्यातील ३३ गावांमध्ये संभाषणासाठी कुठल्याच प्रकारे मोबाईलची रेंज नसल्याने बारमाही संपर्क क्षेत्राबाहेरील आहेत नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या गावांसाठी वनविभागाच्या मदतीने वायरलेस यंत्रणा व वाकी टॉकी चा उपयोग जिल्हा प्रशासनाने केला होता.पावसाळ्यात संपर्क तुटणाऱ्या गावांमध्ये आरोग्य सेवक चार महिन्यांसाठी मुक्कामाला राहतील.- सतीश प्रधान, तालुका वैद्यकीय अधिकारी, चिखलदरा