शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

पावसाळ्यात २० गावांचा तुटतो संपर्क, ३३ गावे संपर्कक्षेत्राबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 23:17 IST

पावसाळ्यात मेळघाटातील जवळपास २० गावांचा संपर्क तुटतो, तर ३३ गावे आजही बारमाही संपर्कक्षेत्राबाहेर आहेत. १ जुलैपासून परतवाडा आगाराची हतरूला जाणारी बस रस्ता नादुरुस्त असल्याने चार महिन्यांसाठी बंद करण्यात आली. अतिदुर्गम भागात आजही समस्या कायम आहेत. त्यामुळे पावसाळ्यात प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे

ठळक मुद्देमेळघाट अलर्ट : हतरूला जाणारी बसफेरी चार महिन्यांसाठी बंद

नरेंद्र जावरे।लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : पावसाळ्यात मेळघाटातील जवळपास २० गावांचा संपर्क तुटतो, तर ३३ गावे आजही बारमाही संपर्कक्षेत्राबाहेर आहेत. १ जुलैपासून परतवाडा आगाराची हतरूला जाणारी बस रस्ता नादुरुस्त असल्याने चार महिन्यांसाठी बंद करण्यात आली. अतिदुर्गम भागात आजही समस्या कायम आहेत. त्यामुळे पावसाळ्यात प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागणार आहेमेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यात १९९३ च्या कुपोषणानंतर कोट्यवधीच्या योजनांचा पाऊस पाडण्यात आला. परंतु वीज, पाणी, रस्ता, आरोग्य, शिक्षण या पायाभूत गरजा अजूनही सर्व गावांत पोहोचल्यास नसल्याचे वास्तव आहे. संपर्काअभावी मेळघाटात बालमृत्यूचे भयावह प्रमाण केव्हाही उद्भवू शकते. दळणवळणाची साधने नसल्याने आदिवासींपर्यंत आरोग्यसेवा पोहोचू शकत नसून, आजारी रुग्णाला शहराच्या ठिकाणी आणावे कसे, हा प्रश्न अजूनही कायम आहे.संपर्क तुटणाऱ्या गावात औषध, पोषणसाठाधारणी व चिखलदरा तालुक्यात संपर्क तुटणाऱ्या गावांमध्ये आरोग्य विभाग आणि बाल विकास प्रकल्प कार्यालयातर्फे अंगणवाडी केंद्रात पोषण आहार साठा आॅक्टोबर महिन्यापर्यंत पुरेल एवढा ठेवण्यात आला असल्याचे चिखलदरा येथील एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयाचे विस्तार अधिकारी योगेश वानखेडे यांनी सांगितले. औषध पुरवठा चार महिने पुरेल एवढा ठेवण्यात आला आहे. कुपोषित बालके, आजारी रुग्णांसाठी गावातच व्यवस्था करण्यात आली. मात्र, गंभीर रुग्णांचे काय, हा प्रश्न अनुत्तरित आहे.बसफेरी १ जुलैपासून बंदपरतवाडा आगारातून अतिदुर्गम हतरुला जाणारी परतवाडा आगाराची बसफेरी १ जुलैपासून चार महिन्यांसाठी बंद करण्यात आली आहे. सदर रस्ता पूर्णत: नादुरुस्त असून, नवीन रस्त्याचे काम सुरू असल्याचे पत्र पंतप्रधान ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता आय.आय. खान यांनी उपविभागीय अधिकारी, पोलीस प्रशासन, ग्रामपंचायत, परतवाडा आगार आदी सर्व विभागांना दिले. या रस्त्यावर असलेल्या गावांमध्ये ये-जा करण्यासाठी पर्यायी रस्ता नसताना वाहतूक बंद करण्याचे दिलेले पत्र संताप व्यक्त करणारे ठरले आहे.लोकसभा निवडणुकीत वॉकीटॉकीचा वापरपावसाळ्यात नदी-नाल्यांना पुराण्या सोबत रस्ता नादुरूस्त असल्यामुळे पंधरापेक्षा अधिक गावांचा संपर्क तुटतो आरोग्य विभाग व बालविकास विभागाने संपर्क तुटणाऱ्या चिखलदरा तालुक्यातील रेहट्याखेडा, राक्षा, आढावा बिच्छूखेडा, माडीझडप, मारिता, डोमी कुही खुटीदा, सुमिता, टेंभ्रू बोरदा ,बोदु, पिपल्या, पांढराखडक, नवलगांव, पिपादरी, सलिता, लाखेवाडा, आदी गावे असून धारणी तालुक्यातील परसोली, कुंड,खामदा या बैरागड व बिजुधावडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील गावांचा समावेश आहे,तर चिखलदरा तालुक्यातील ३३ गावांमध्ये संभाषणासाठी कुठल्याच प्रकारे मोबाईलची रेंज नसल्याने बारमाही संपर्क क्षेत्राबाहेरील आहेत नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या गावांसाठी वनविभागाच्या मदतीने वायरलेस यंत्रणा व वाकी टॉकी चा उपयोग जिल्हा प्रशासनाने केला होता.पावसाळ्यात संपर्क तुटणाऱ्या गावांमध्ये आरोग्य सेवक चार महिन्यांसाठी मुक्कामाला राहतील.- सतीश प्रधान, तालुका वैद्यकीय अधिकारी, चिखलदरा