शहरं
Join us  
Trending Stories
1
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
2
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
3
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
4
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
5
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
6
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
7
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
8
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
10
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
11
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
12
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
13
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
14
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
15
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
16
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
17
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
18
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
19
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
20
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं

पावसाळ्यात २० गावांचा तुटतो संपर्क, ३३ गावे संपर्कक्षेत्राबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 23:17 IST

पावसाळ्यात मेळघाटातील जवळपास २० गावांचा संपर्क तुटतो, तर ३३ गावे आजही बारमाही संपर्कक्षेत्राबाहेर आहेत. १ जुलैपासून परतवाडा आगाराची हतरूला जाणारी बस रस्ता नादुरुस्त असल्याने चार महिन्यांसाठी बंद करण्यात आली. अतिदुर्गम भागात आजही समस्या कायम आहेत. त्यामुळे पावसाळ्यात प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे

ठळक मुद्देमेळघाट अलर्ट : हतरूला जाणारी बसफेरी चार महिन्यांसाठी बंद

नरेंद्र जावरे।लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : पावसाळ्यात मेळघाटातील जवळपास २० गावांचा संपर्क तुटतो, तर ३३ गावे आजही बारमाही संपर्कक्षेत्राबाहेर आहेत. १ जुलैपासून परतवाडा आगाराची हतरूला जाणारी बस रस्ता नादुरुस्त असल्याने चार महिन्यांसाठी बंद करण्यात आली. अतिदुर्गम भागात आजही समस्या कायम आहेत. त्यामुळे पावसाळ्यात प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागणार आहेमेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यात १९९३ च्या कुपोषणानंतर कोट्यवधीच्या योजनांचा पाऊस पाडण्यात आला. परंतु वीज, पाणी, रस्ता, आरोग्य, शिक्षण या पायाभूत गरजा अजूनही सर्व गावांत पोहोचल्यास नसल्याचे वास्तव आहे. संपर्काअभावी मेळघाटात बालमृत्यूचे भयावह प्रमाण केव्हाही उद्भवू शकते. दळणवळणाची साधने नसल्याने आदिवासींपर्यंत आरोग्यसेवा पोहोचू शकत नसून, आजारी रुग्णाला शहराच्या ठिकाणी आणावे कसे, हा प्रश्न अजूनही कायम आहे.संपर्क तुटणाऱ्या गावात औषध, पोषणसाठाधारणी व चिखलदरा तालुक्यात संपर्क तुटणाऱ्या गावांमध्ये आरोग्य विभाग आणि बाल विकास प्रकल्प कार्यालयातर्फे अंगणवाडी केंद्रात पोषण आहार साठा आॅक्टोबर महिन्यापर्यंत पुरेल एवढा ठेवण्यात आला असल्याचे चिखलदरा येथील एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयाचे विस्तार अधिकारी योगेश वानखेडे यांनी सांगितले. औषध पुरवठा चार महिने पुरेल एवढा ठेवण्यात आला आहे. कुपोषित बालके, आजारी रुग्णांसाठी गावातच व्यवस्था करण्यात आली. मात्र, गंभीर रुग्णांचे काय, हा प्रश्न अनुत्तरित आहे.बसफेरी १ जुलैपासून बंदपरतवाडा आगारातून अतिदुर्गम हतरुला जाणारी परतवाडा आगाराची बसफेरी १ जुलैपासून चार महिन्यांसाठी बंद करण्यात आली आहे. सदर रस्ता पूर्णत: नादुरुस्त असून, नवीन रस्त्याचे काम सुरू असल्याचे पत्र पंतप्रधान ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता आय.आय. खान यांनी उपविभागीय अधिकारी, पोलीस प्रशासन, ग्रामपंचायत, परतवाडा आगार आदी सर्व विभागांना दिले. या रस्त्यावर असलेल्या गावांमध्ये ये-जा करण्यासाठी पर्यायी रस्ता नसताना वाहतूक बंद करण्याचे दिलेले पत्र संताप व्यक्त करणारे ठरले आहे.लोकसभा निवडणुकीत वॉकीटॉकीचा वापरपावसाळ्यात नदी-नाल्यांना पुराण्या सोबत रस्ता नादुरूस्त असल्यामुळे पंधरापेक्षा अधिक गावांचा संपर्क तुटतो आरोग्य विभाग व बालविकास विभागाने संपर्क तुटणाऱ्या चिखलदरा तालुक्यातील रेहट्याखेडा, राक्षा, आढावा बिच्छूखेडा, माडीझडप, मारिता, डोमी कुही खुटीदा, सुमिता, टेंभ्रू बोरदा ,बोदु, पिपल्या, पांढराखडक, नवलगांव, पिपादरी, सलिता, लाखेवाडा, आदी गावे असून धारणी तालुक्यातील परसोली, कुंड,खामदा या बैरागड व बिजुधावडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील गावांचा समावेश आहे,तर चिखलदरा तालुक्यातील ३३ गावांमध्ये संभाषणासाठी कुठल्याच प्रकारे मोबाईलची रेंज नसल्याने बारमाही संपर्क क्षेत्राबाहेरील आहेत नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या गावांसाठी वनविभागाच्या मदतीने वायरलेस यंत्रणा व वाकी टॉकी चा उपयोग जिल्हा प्रशासनाने केला होता.पावसाळ्यात संपर्क तुटणाऱ्या गावांमध्ये आरोग्य सेवक चार महिन्यांसाठी मुक्कामाला राहतील.- सतीश प्रधान, तालुका वैद्यकीय अधिकारी, चिखलदरा