शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

५५ वर्षांत १२ वेळा मान्सून ‘लेटलतीफ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 22:39 IST

अलीकडच्या पाच वर्षांत पाऊस लहरी झालेला आहे. किंबहुना गत ५५ वर्षांचा आढावा घेता मान्सूनच्या आगमनात विविधता आढळते. या कालावधीत मान्सून तब्बल १२ वेळा नियमित कालावधीपेक्षा उशिरा आलेला आहे.

ठळक मुद्देनऊ वेळा जून कोरडा : पुनर्वसूच्या बेडकानेच पेरणीला तारले

गजानन मोहोड ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अलीकडच्या पाच वर्षांत पाऊस लहरी झालेला आहे. किंबहुना गत ५५ वर्षांचा आढावा घेता मान्सूनच्या आगमनात विविधता आढळते. या कालावधीत मान्सून तब्बल १२ वेळा नियमित कालावधीपेक्षा उशिरा आलेला आहे. विशेष म्हणजे या पाच दशकांत नऊ वेळा जून कोरडा गेल्याने शेतकऱ्यांवर अरिष्ट कोसळले. या पार्श्वभूमीवर यंदा जुलैच्या दुसºया आठवड्यात होणारे मान्सूनचे आगमन हे उशिराच गणल्या जाते. मात्र, पुनर्वसूच्या बेडकाने शेतकऱ्यांना तारले आहे.जिल्ह्यासह विदर्भात साधारणपणे जूनच्या ७ ते १० तारखेच्या दरम्यान मान्सूनची सुरूवात होते. ७ जूनला मृग नक्षत्राला सुरुवात झाल्यावर पेरणीची लगबग सुरू होते. २५ जूननंतर पेरण्या आटोपतात. परंतु, मागील पाच वर्षांचा आढावा घेता मान्सूनचे आगमनच उशिरा झाले. ५५ वर्षांत ५ जून १९९० मध्ये सर्वात आधी मान्सूनची नोंद झाली, तर सन २००२ मध्ये २७ जुलैला आलेला मान्सून हा सर्वात उशिरा ठरला आहे. तब्बल १२ वर्षे मान्सूनचे आगमन हे जुलै महिन्यात झालेले आहे. ३८ वर्षे मान्सूनचे ५ ते ३० जून महिन्यात आगमन झाले.यंदा हवामान विभागाने सरासरीच्या इतपत पावसाचे भाकित केले. प्रत्यक्षात रोहिणी कोरडे गेल्याने शेतकºयांची पेरणीपूर्व मशागतच झालीच नाही. त्यासाठी मृग उजाडले. मृगाच्या मेंढ्याचा पाऊस अधूनमधून पडल्याने मशागतीची लगबग वाढली व २२ जूनपासून आर्द्रा नक्षत्राला सुरूवात झाली. यामध्येदेखील अधूनमधून पाऊस झाल्याने शेतकºयांच्या पेरण्या साधल्या गेल्या. किंबहुना यंदा मान्सूनचे आगमन १४ ते १५ जुलैदरम्यान होत आहे. त्यामुळे निसर्ग भाकितांना दाद देत नाही, हेच वास्तव आहे.आर्द्रा, पुनर्वसूवरच मदारयंदाच्या पावसाळ्यात ७ जूनपासून सुरू झालेले मृग नक्षत्र कोरडे गेल्याने शेतकºयांची मदार २२ जूनपासून लागणाºया आर्द्रा नक्षत्रावर होती व या नक्षत्राचा हत्ती देखील अधूनमधून पाण्यात डुंबला. त्यामुळे खरिपाच्या पेरण्यांना मोड आली नाही. मात्र, भुजलातही वाढ झालेली नाही. या पार्श्वभूमीवर ६ जुलैपासून सुरू झालेल्या पुनर्वसू नक्षत्रात खºया अर्थाने मान्सूनचे दमदार आगमन होत असल्याने पुनर्वसूचा बेडूक पाण्यात डुंबणार आहे.२४ तासात सार्वत्रिक पाऊसगेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी २६.२८ मिमी पावसाची नोंद झाली. यामध्ये सर्वाधिक ५२ मिमी पाऊस चिखलदरा तालुक्यात पडला. धामणगाव रेल्वे ४१, अमरावती १६.१२, भातकुली २४.७०, नांदगाव खंडेश्वर २५, चांदूर रेल्वे २९.०४, तिवसा २७.४४, मोर्शी २०.८०, अचलपूर ४.९७, चांदूर बाजार २३, दर्यापूर २१.८५, अंजनगाव सुर्जी २७.७०, धारणी ८.४५ व वरूड तालुक्यात ४५.१० मिमी पावसाची नोंद झाली.