शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

५५ वर्षांत १२ वेळा मान्सून ‘लेटलतीफ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 22:39 IST

अलीकडच्या पाच वर्षांत पाऊस लहरी झालेला आहे. किंबहुना गत ५५ वर्षांचा आढावा घेता मान्सूनच्या आगमनात विविधता आढळते. या कालावधीत मान्सून तब्बल १२ वेळा नियमित कालावधीपेक्षा उशिरा आलेला आहे.

ठळक मुद्देनऊ वेळा जून कोरडा : पुनर्वसूच्या बेडकानेच पेरणीला तारले

गजानन मोहोड ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अलीकडच्या पाच वर्षांत पाऊस लहरी झालेला आहे. किंबहुना गत ५५ वर्षांचा आढावा घेता मान्सूनच्या आगमनात विविधता आढळते. या कालावधीत मान्सून तब्बल १२ वेळा नियमित कालावधीपेक्षा उशिरा आलेला आहे. विशेष म्हणजे या पाच दशकांत नऊ वेळा जून कोरडा गेल्याने शेतकऱ्यांवर अरिष्ट कोसळले. या पार्श्वभूमीवर यंदा जुलैच्या दुसºया आठवड्यात होणारे मान्सूनचे आगमन हे उशिराच गणल्या जाते. मात्र, पुनर्वसूच्या बेडकाने शेतकऱ्यांना तारले आहे.जिल्ह्यासह विदर्भात साधारणपणे जूनच्या ७ ते १० तारखेच्या दरम्यान मान्सूनची सुरूवात होते. ७ जूनला मृग नक्षत्राला सुरुवात झाल्यावर पेरणीची लगबग सुरू होते. २५ जूननंतर पेरण्या आटोपतात. परंतु, मागील पाच वर्षांचा आढावा घेता मान्सूनचे आगमनच उशिरा झाले. ५५ वर्षांत ५ जून १९९० मध्ये सर्वात आधी मान्सूनची नोंद झाली, तर सन २००२ मध्ये २७ जुलैला आलेला मान्सून हा सर्वात उशिरा ठरला आहे. तब्बल १२ वर्षे मान्सूनचे आगमन हे जुलै महिन्यात झालेले आहे. ३८ वर्षे मान्सूनचे ५ ते ३० जून महिन्यात आगमन झाले.यंदा हवामान विभागाने सरासरीच्या इतपत पावसाचे भाकित केले. प्रत्यक्षात रोहिणी कोरडे गेल्याने शेतकºयांची पेरणीपूर्व मशागतच झालीच नाही. त्यासाठी मृग उजाडले. मृगाच्या मेंढ्याचा पाऊस अधूनमधून पडल्याने मशागतीची लगबग वाढली व २२ जूनपासून आर्द्रा नक्षत्राला सुरूवात झाली. यामध्येदेखील अधूनमधून पाऊस झाल्याने शेतकºयांच्या पेरण्या साधल्या गेल्या. किंबहुना यंदा मान्सूनचे आगमन १४ ते १५ जुलैदरम्यान होत आहे. त्यामुळे निसर्ग भाकितांना दाद देत नाही, हेच वास्तव आहे.आर्द्रा, पुनर्वसूवरच मदारयंदाच्या पावसाळ्यात ७ जूनपासून सुरू झालेले मृग नक्षत्र कोरडे गेल्याने शेतकºयांची मदार २२ जूनपासून लागणाºया आर्द्रा नक्षत्रावर होती व या नक्षत्राचा हत्ती देखील अधूनमधून पाण्यात डुंबला. त्यामुळे खरिपाच्या पेरण्यांना मोड आली नाही. मात्र, भुजलातही वाढ झालेली नाही. या पार्श्वभूमीवर ६ जुलैपासून सुरू झालेल्या पुनर्वसू नक्षत्रात खºया अर्थाने मान्सूनचे दमदार आगमन होत असल्याने पुनर्वसूचा बेडूक पाण्यात डुंबणार आहे.२४ तासात सार्वत्रिक पाऊसगेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी २६.२८ मिमी पावसाची नोंद झाली. यामध्ये सर्वाधिक ५२ मिमी पाऊस चिखलदरा तालुक्यात पडला. धामणगाव रेल्वे ४१, अमरावती १६.१२, भातकुली २४.७०, नांदगाव खंडेश्वर २५, चांदूर रेल्वे २९.०४, तिवसा २७.४४, मोर्शी २०.८०, अचलपूर ४.९७, चांदूर बाजार २३, दर्यापूर २१.८५, अंजनगाव सुर्जी २७.७०, धारणी ८.४५ व वरूड तालुक्यात ४५.१० मिमी पावसाची नोंद झाली.