शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

५५ वर्षांत १२ वेळा मान्सून ‘लेटलतीफ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 22:39 IST

अलीकडच्या पाच वर्षांत पाऊस लहरी झालेला आहे. किंबहुना गत ५५ वर्षांचा आढावा घेता मान्सूनच्या आगमनात विविधता आढळते. या कालावधीत मान्सून तब्बल १२ वेळा नियमित कालावधीपेक्षा उशिरा आलेला आहे.

ठळक मुद्देनऊ वेळा जून कोरडा : पुनर्वसूच्या बेडकानेच पेरणीला तारले

गजानन मोहोड ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अलीकडच्या पाच वर्षांत पाऊस लहरी झालेला आहे. किंबहुना गत ५५ वर्षांचा आढावा घेता मान्सूनच्या आगमनात विविधता आढळते. या कालावधीत मान्सून तब्बल १२ वेळा नियमित कालावधीपेक्षा उशिरा आलेला आहे. विशेष म्हणजे या पाच दशकांत नऊ वेळा जून कोरडा गेल्याने शेतकऱ्यांवर अरिष्ट कोसळले. या पार्श्वभूमीवर यंदा जुलैच्या दुसºया आठवड्यात होणारे मान्सूनचे आगमन हे उशिराच गणल्या जाते. मात्र, पुनर्वसूच्या बेडकाने शेतकऱ्यांना तारले आहे.जिल्ह्यासह विदर्भात साधारणपणे जूनच्या ७ ते १० तारखेच्या दरम्यान मान्सूनची सुरूवात होते. ७ जूनला मृग नक्षत्राला सुरुवात झाल्यावर पेरणीची लगबग सुरू होते. २५ जूननंतर पेरण्या आटोपतात. परंतु, मागील पाच वर्षांचा आढावा घेता मान्सूनचे आगमनच उशिरा झाले. ५५ वर्षांत ५ जून १९९० मध्ये सर्वात आधी मान्सूनची नोंद झाली, तर सन २००२ मध्ये २७ जुलैला आलेला मान्सून हा सर्वात उशिरा ठरला आहे. तब्बल १२ वर्षे मान्सूनचे आगमन हे जुलै महिन्यात झालेले आहे. ३८ वर्षे मान्सूनचे ५ ते ३० जून महिन्यात आगमन झाले.यंदा हवामान विभागाने सरासरीच्या इतपत पावसाचे भाकित केले. प्रत्यक्षात रोहिणी कोरडे गेल्याने शेतकºयांची पेरणीपूर्व मशागतच झालीच नाही. त्यासाठी मृग उजाडले. मृगाच्या मेंढ्याचा पाऊस अधूनमधून पडल्याने मशागतीची लगबग वाढली व २२ जूनपासून आर्द्रा नक्षत्राला सुरूवात झाली. यामध्येदेखील अधूनमधून पाऊस झाल्याने शेतकºयांच्या पेरण्या साधल्या गेल्या. किंबहुना यंदा मान्सूनचे आगमन १४ ते १५ जुलैदरम्यान होत आहे. त्यामुळे निसर्ग भाकितांना दाद देत नाही, हेच वास्तव आहे.आर्द्रा, पुनर्वसूवरच मदारयंदाच्या पावसाळ्यात ७ जूनपासून सुरू झालेले मृग नक्षत्र कोरडे गेल्याने शेतकºयांची मदार २२ जूनपासून लागणाºया आर्द्रा नक्षत्रावर होती व या नक्षत्राचा हत्ती देखील अधूनमधून पाण्यात डुंबला. त्यामुळे खरिपाच्या पेरण्यांना मोड आली नाही. मात्र, भुजलातही वाढ झालेली नाही. या पार्श्वभूमीवर ६ जुलैपासून सुरू झालेल्या पुनर्वसू नक्षत्रात खºया अर्थाने मान्सूनचे दमदार आगमन होत असल्याने पुनर्वसूचा बेडूक पाण्यात डुंबणार आहे.२४ तासात सार्वत्रिक पाऊसगेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी २६.२८ मिमी पावसाची नोंद झाली. यामध्ये सर्वाधिक ५२ मिमी पाऊस चिखलदरा तालुक्यात पडला. धामणगाव रेल्वे ४१, अमरावती १६.१२, भातकुली २४.७०, नांदगाव खंडेश्वर २५, चांदूर रेल्वे २९.०४, तिवसा २७.४४, मोर्शी २०.८०, अचलपूर ४.९७, चांदूर बाजार २३, दर्यापूर २१.८५, अंजनगाव सुर्जी २७.७०, धारणी ८.४५ व वरूड तालुक्यात ४५.१० मिमी पावसाची नोंद झाली.