शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पैसा असून असमाधानी, तेच खरे अपंग

By admin | Updated: February 8, 2016 00:18 IST

सर्व सुखसोयी असताना पैशाने श्रीमंत असलेले लोकच या जगात खरे अपंग आहेत.

प्रबोधक प्रल्हाद पै : वझ्झर मतिमंद बालगृहात ‘मोगरा फुलला’परतवाडा : सर्व सुखसोयी असताना पैशाने श्रीमंत असलेले लोकच या जगात खरे अपंग आहेत. या आश्रमातील मतिमंद मुले त्यांंच्याजवळ शंकरबाबांसारखे वडील असल्याने खरोखरच सुखी आहेत. मनुष्याने एक विचार धरला की तो आकार घेतो आणि येथे त्याचे मूर्तीमंत उदाहरण मला बघायला मिळाल, असे प्रतिपादन जीवनविद्या मिशनचे सदगुरू वामनराव पै यांचे सुपूत्र प्रल्हाददादा पै यांनी व्यक्त केले. त्यांनी रविवारी सकाळी ११ वाजता वझ्झर येथे स्व. अंबादासपंत मतिमंद व अनाथ बालसुधारगृहाला भेट दिली. यावेळी अनाथांचे वडिल शंकरबाबा पापळकर, धनंजय नाकील, संतोश नरेडी, मल्हाराचे सरपंच मनोहर जाधव, जीवन रेड्डी, जीवनविद्या मिशनचे नामदारी, शसम, वाघमारे पारडे, तुषार राणे, संजय भागवत, देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते. या अनाथ, अपंग, अंध व मतिमंद बालसुधार गृहाला भेट दिल्यावर आपण स्तब्घ झालो . हे काम एवढे सोपे नाही, हे काम येथे सगळ्यांनी येऊन पाहायला हवे, असेही पै पुढे म्हणाले. १८ वर्षानंतर या मुलांसाठी कुठलाच पुनवर्सनाचा कायदा नाही, ही दुर्दैवाची बाब असल्याचे प्रल्हाद पै पुढे म्हणाले. बाबा म्हणाले २८ नातवंडे झालीत१८ वर्षानंतर या अंध-अपंग मतिमंदांचे काय? याबाबत काही तरी कायदा व्हावा, ही लढाई मागील १८ वर्षांपासून सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाने सुध्दा शासनाला निर्देश दिले आहेत.पुनर्वसनाचा कायदा नझाल्यास नाहीतर रस्त्यावरून उचलून आणलेली ही माझी मुले १८ वर्षांनंतर पुन्हा रस्त्यावरच भरटकणार आहे. याला जबाबदार कोण?, असा खडा सवाल शंकरबाबांनी यावेळी केला. आतापर्यंत १८ मुला-मुलींची लग्ने झाले असून २८ नातवंडे झाली आहेत. दरवर्षी देशातील ५ लक्ष मुली कोठे जाता याचा पत्ता नाही. साडेतीन लक्ष अंध मुलांची माहिती नाही.