शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
3
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
4
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
5
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
6
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
7
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
8
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
9
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
10
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
11
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
13
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
14
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
15
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
16
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
17
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
18
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
19
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
20
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले

देशाला मोदींनी ७० वर्षे मागे नेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:10 IST

फोटो - ३०एएमपीएच१५ कॅप्शन - पत्रपरिषदेला उपस्थित ना. विजय वडेट्टीवार, आ. बळवंत वानखडे, बबलू देशमुख, बबलू शेखावत, वीरेंद्र जगताप ...

फोटो - ३०एएमपीएच१५

कॅप्शन - पत्रपरिषदेला उपस्थित ना. विजय वडेट्टीवार, आ. बळवंत वानखडे, बबलू देशमुख, बबलू शेखावत, वीरेंद्र जगताप आदी.

--------------------------------------------------------------------------------------------------------------

ना. विजय वडेट्टीवार यांची बोेचरी टीका, कॉंग्रेसने कमावले, भाजपने गमावले

अमरावती : कॉंग्रेसने ७० वर्षांत देशाला काय दिले, हे विचारणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र माेदींनी सात वर्षांतच भारताला अधोगतीकडे नेले आहे. ७० वर्षात जे कॉंंग्रेसने कमावले, ते भाजपने या अल्पावधीत गमावले. शेतकरी, बेरोजगार, उद्योजक, कामगार उद्ध्वस्त केले, अशी बोचरी टीका राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी अमरावती येथे रविवारी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपयशी सात वर्षे पूर्ण केल्याच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस धरणे, निषेध आंदोलन याद्वारे केंद्र सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढत आहे. या पार्श्वभूमीवर ना. वडेट्टीवार यांची अमरावती येथे रविवारी पत्रपरिषद घेण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जीएसटी, नोटबंदीचा निर्णय हा देशाला अधोगतीकडे नेणारा ठरला आहे. मोदींच्या सात वर्षांच्या कार्यकाळात देश सर्वच क्षेत्रांत उद्ध्वस्त झाला असून, वारेमाप आश्वासनांनी जनता त्रस्त झाली आहे. दोन कोटी लोकांना रोजगार, प्रत्येक नागरिकाच्या खात्यात १५ लाख रुपये हे आश्वासन हवेत विरले आहे. कॉंग्रेसच्या राजवटीत निर्माण झालेले उद्योग ‘नवरत्न’ आज मोदींनी विक्रीस काढले आहेत. देशातील विमानतळे अदानीच्या घशात ओतली आहेत. कोरोना महामारी हाताळण्यात मोदी पूर्णत: अपयशी ठरले असून, त्यांच्यामुळेच देशातील लाखो लोक दगावले आहेत, असा आरोप ना. वडेट्टीवार यांनी केला.

मोदींनी प्रारंभी जनतेला घंटा, थाळी, टाळी वाजवायला लावली. दिवे, मेणबत्ती पेटवायला सांगितली. आता जीवनावश्यक वस्तू, पेट्राेल, डिझेलचे दर गगनाला भिडले. ८० रूपये किलोचे गोडे तेल आता २०० रुपये दरावर पाेहोचले. देशात कोरोनाची लस नाही. मात्र, विदेशात लसी पाठवून नेमके काय साध्य केले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. गरीब माणसाला उद्ध्वस्त करण्याचे पाप मोदींनी केले. बांगलादेश, पाकिस्तान या देशांपेक्षा भारताचा जीडीपी कमी झाला आहे. हे मोदींच्या विघातक निर्णयाचे फलित असल्याचा आरोप ना. वडेट्टीवार केला.

पत्रपरिषदेला आमदार सुलभा खोडके, आमदार बळवंत वानखडे, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, माजी आमदार वीरेंद्र जगताप, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, छाया दंडाळे, हरिभाऊ मोहोड, जयवंत देशमुख आदी उपस्थित होते.

---------------

ओबीसींचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने नाकारले नाही

ओबीसींना २७ टक्के लागू आहे. मात्र, ओबीसींना राजकीय आरक्षण दिल्याने ते ५० टक्क्यांवर पोहोचले आहे. अद्यापही सर्वोच्च न्यायालयाने हे आरक्षण नाकारले नाही, असे ना. वडेट्टीवार म्हणाले. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे. ओबीसी आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायाधीशाची समिती गठित करावी, अशी मागणी आहे. ओबीसींची जातीनिहाय गणना झाल्यास यातील वास्तव पुढे येईल. समितीला सर्वोच्च न्यायालयात अहवाल सादर करणे सोपे होईल, असे ते म्हणाले.