शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
4
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
5
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
6
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
7
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
8
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
9
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
10
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
11
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
12
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
13
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
14
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
15
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
16
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
17
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
18
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
19
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
20
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?

देशाला मोदींनी ७० वर्षे मागे नेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:10 IST

फोटो - ३०एएमपीएच१५ कॅप्शन - पत्रपरिषदेला उपस्थित ना. विजय वडेट्टीवार, आ. बळवंत वानखडे, बबलू देशमुख, बबलू शेखावत, वीरेंद्र जगताप ...

फोटो - ३०एएमपीएच१५

कॅप्शन - पत्रपरिषदेला उपस्थित ना. विजय वडेट्टीवार, आ. बळवंत वानखडे, बबलू देशमुख, बबलू शेखावत, वीरेंद्र जगताप आदी.

--------------------------------------------------------------------------------------------------------------

ना. विजय वडेट्टीवार यांची बोेचरी टीका, कॉंग्रेसने कमावले, भाजपने गमावले

अमरावती : कॉंग्रेसने ७० वर्षांत देशाला काय दिले, हे विचारणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र माेदींनी सात वर्षांतच भारताला अधोगतीकडे नेले आहे. ७० वर्षात जे कॉंंग्रेसने कमावले, ते भाजपने या अल्पावधीत गमावले. शेतकरी, बेरोजगार, उद्योजक, कामगार उद्ध्वस्त केले, अशी बोचरी टीका राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी अमरावती येथे रविवारी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपयशी सात वर्षे पूर्ण केल्याच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस धरणे, निषेध आंदोलन याद्वारे केंद्र सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढत आहे. या पार्श्वभूमीवर ना. वडेट्टीवार यांची अमरावती येथे रविवारी पत्रपरिषद घेण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जीएसटी, नोटबंदीचा निर्णय हा देशाला अधोगतीकडे नेणारा ठरला आहे. मोदींच्या सात वर्षांच्या कार्यकाळात देश सर्वच क्षेत्रांत उद्ध्वस्त झाला असून, वारेमाप आश्वासनांनी जनता त्रस्त झाली आहे. दोन कोटी लोकांना रोजगार, प्रत्येक नागरिकाच्या खात्यात १५ लाख रुपये हे आश्वासन हवेत विरले आहे. कॉंग्रेसच्या राजवटीत निर्माण झालेले उद्योग ‘नवरत्न’ आज मोदींनी विक्रीस काढले आहेत. देशातील विमानतळे अदानीच्या घशात ओतली आहेत. कोरोना महामारी हाताळण्यात मोदी पूर्णत: अपयशी ठरले असून, त्यांच्यामुळेच देशातील लाखो लोक दगावले आहेत, असा आरोप ना. वडेट्टीवार यांनी केला.

मोदींनी प्रारंभी जनतेला घंटा, थाळी, टाळी वाजवायला लावली. दिवे, मेणबत्ती पेटवायला सांगितली. आता जीवनावश्यक वस्तू, पेट्राेल, डिझेलचे दर गगनाला भिडले. ८० रूपये किलोचे गोडे तेल आता २०० रुपये दरावर पाेहोचले. देशात कोरोनाची लस नाही. मात्र, विदेशात लसी पाठवून नेमके काय साध्य केले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. गरीब माणसाला उद्ध्वस्त करण्याचे पाप मोदींनी केले. बांगलादेश, पाकिस्तान या देशांपेक्षा भारताचा जीडीपी कमी झाला आहे. हे मोदींच्या विघातक निर्णयाचे फलित असल्याचा आरोप ना. वडेट्टीवार केला.

पत्रपरिषदेला आमदार सुलभा खोडके, आमदार बळवंत वानखडे, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, माजी आमदार वीरेंद्र जगताप, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, छाया दंडाळे, हरिभाऊ मोहोड, जयवंत देशमुख आदी उपस्थित होते.

---------------

ओबीसींचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने नाकारले नाही

ओबीसींना २७ टक्के लागू आहे. मात्र, ओबीसींना राजकीय आरक्षण दिल्याने ते ५० टक्क्यांवर पोहोचले आहे. अद्यापही सर्वोच्च न्यायालयाने हे आरक्षण नाकारले नाही, असे ना. वडेट्टीवार म्हणाले. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे. ओबीसी आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायाधीशाची समिती गठित करावी, अशी मागणी आहे. ओबीसींची जातीनिहाय गणना झाल्यास यातील वास्तव पुढे येईल. समितीला सर्वोच्च न्यायालयात अहवाल सादर करणे सोपे होईल, असे ते म्हणाले.