शहरं
Join us  
Trending Stories
1
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
2
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
3
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
4
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
5
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
6
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
7
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
8
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
9
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
10
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
11
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
12
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
13
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
14
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
15
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
16
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
17
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
18
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
19
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
20
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य

२५ वर्षांपासून ग्रामपंचायतीसाठी मतदान झालेच नाही, निमकुंड ग्रामपंचायतीचा आदर्श 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 20:49 IST

अचलपूर तालुक्यातील निमकुंड येथे गेल्या २५ वर्षांपासून ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान न घेता आदिवासी बांधव अविरोध सदस्य आणि सरपंच-उपसरपंच निवडतात. हा आदर्श, ऐक्य कौतुकास्पद ठरला आहे.

- नरेंद्र जावरे

परतवाडा (अमरावती) : अचलपूर तालुक्यातील निमकुंड येथे गेल्या २५ वर्षांपासून ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान न घेता आदिवासी बांधव अविरोध सदस्य आणि सरपंच-उपसरपंच निवडतात. हा आदर्श, ऐक्य कौतुकास्पद ठरला आहे.अचलपूर तालुक्यातील निमकुंड हे मेळघाटच्या पायथ्याशी वसलेले छोटेसे टुमदार आदिवासी खेडे. १८६८ लोकसंख्या आणि बाराशेवर मतदान. नव्वद टक्क््यांहून अधिक कोरकू आदिवासी शेती आणि मजुरीची कामे करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. जिल्हा परिषदेची इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत, तर समाजकल्याण विभागाची दहावीपर्यंत निवासी आश्रमशाळा. गावात विद्युत पथदिवे, गल्लीबोळात रस्ते, पिण्याच्या पाण्यासाठी दोन विहिरी, एक बोअर. नजीकच्या मल्हारा येथे आरोग्य उपकेंद्र असल्याने गावात डॉक्टर, परिचारिका भेट देवून तपासणी करतात आदी मूलभूत सुविधा भक्कम आहे.

सदस्य, सरपंचाची निवड गावबैठकीतपूर्वी वझ्झर ग्रामपंचायतीमध्ये समाविष्ट असलेल्या निमकुंडला स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा १९९४ पासून देण्यात आला. तेव्हापासून २०१५ पर्यंत पाच निवडणुका येथे झाल्यात. सर्व सदस्यांची अर्ज भरून अविरोध निवड झाल्यावर सरपंचपदासाठी आरक्षण पाहून निवड करण्याची प्रथा येथे आहे. सार्वत्रिक निवडणूक लागली की, संपूर्ण गावकरी आपसी हेवेदावे दूर सारित एकत्र येतात आणि आरक्षणानुसार सदस्याची निवड होते. जेथे एकापेक्षा जास्त उमेदवार दावा करतात, तेथे सर्वानुमते एकाचे नाव जाहीर होऊन बाकीचे माघार घेतात.

शासनाचा ना पुरस्कार, ना दमडीमागील पाच ग्रामपंचायत निवडणुकांसाठी अविरोध निवडीचा नवा अध्याय या गावाने लिहिला आहे. मात्र, स्थानिक जिल्हा किंवा राज्य पातळीवर याची २५ वर्षांत दखलच घेतली गेली नाही. कधीकाळी अविरोध निवडणुकीसाठी लाखोंचा निधी देण्याची सत्ताधा-यांची घोषणा निमदरीसाठी पोकळी ठरली. साधे प्रमाणपत्र, अभिनंदन करण्याचे सौजन्य कोणी दाखविले नसल्याची खंत आहे.

२५ वर्षांत चार सरपंच१९९४ ला नव्याने स्थापन झालेल्या निमकुंड ग्रामपंचायतीमध्ये २५ वर्षांत चार सरपंच झाले. ग्रामपंचायतीच्या तीन प्रभागांत एकूण नऊ सदस्यसंख्या आहे. विद्यमान सरपंच अनिल आकोले सलग दुसºयांदा अविरोध सरपंचपदी निवडल्या गेले. उपसरपंच अनिल धांडे, तर सदस्य जानकी भुसूम, सुनीता आठवले, निशा साकोमे, हिरालाल बेठे, शीला नागले असून, सचिव जी. व्ही. बेलसरे आहेत.

राज्यात आदर्श अशी आमची आदिवासी ग्रामपंचायत आहे. मागील २५ वर्षांपासून येथे मतदान झाले नाही. सदस्य, सरपंच, उपसरपंच निवड गावकरी सर्वानुमते ठरवितात. मात्र, शासनाची उदासीनता पाहता खंत वाटते.- अनिल आकोलेसरपंच, निमकुंड, ता. अचलपूर.

टॅग्स :Amravatiअमरावती