शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

२५ वर्षांपासून ग्रामपंचायतीसाठी मतदान झालेच नाही, निमकुंड ग्रामपंचायतीचा आदर्श 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 20:49 IST

अचलपूर तालुक्यातील निमकुंड येथे गेल्या २५ वर्षांपासून ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान न घेता आदिवासी बांधव अविरोध सदस्य आणि सरपंच-उपसरपंच निवडतात. हा आदर्श, ऐक्य कौतुकास्पद ठरला आहे.

- नरेंद्र जावरे

परतवाडा (अमरावती) : अचलपूर तालुक्यातील निमकुंड येथे गेल्या २५ वर्षांपासून ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान न घेता आदिवासी बांधव अविरोध सदस्य आणि सरपंच-उपसरपंच निवडतात. हा आदर्श, ऐक्य कौतुकास्पद ठरला आहे.अचलपूर तालुक्यातील निमकुंड हे मेळघाटच्या पायथ्याशी वसलेले छोटेसे टुमदार आदिवासी खेडे. १८६८ लोकसंख्या आणि बाराशेवर मतदान. नव्वद टक्क््यांहून अधिक कोरकू आदिवासी शेती आणि मजुरीची कामे करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. जिल्हा परिषदेची इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत, तर समाजकल्याण विभागाची दहावीपर्यंत निवासी आश्रमशाळा. गावात विद्युत पथदिवे, गल्लीबोळात रस्ते, पिण्याच्या पाण्यासाठी दोन विहिरी, एक बोअर. नजीकच्या मल्हारा येथे आरोग्य उपकेंद्र असल्याने गावात डॉक्टर, परिचारिका भेट देवून तपासणी करतात आदी मूलभूत सुविधा भक्कम आहे.

सदस्य, सरपंचाची निवड गावबैठकीतपूर्वी वझ्झर ग्रामपंचायतीमध्ये समाविष्ट असलेल्या निमकुंडला स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा १९९४ पासून देण्यात आला. तेव्हापासून २०१५ पर्यंत पाच निवडणुका येथे झाल्यात. सर्व सदस्यांची अर्ज भरून अविरोध निवड झाल्यावर सरपंचपदासाठी आरक्षण पाहून निवड करण्याची प्रथा येथे आहे. सार्वत्रिक निवडणूक लागली की, संपूर्ण गावकरी आपसी हेवेदावे दूर सारित एकत्र येतात आणि आरक्षणानुसार सदस्याची निवड होते. जेथे एकापेक्षा जास्त उमेदवार दावा करतात, तेथे सर्वानुमते एकाचे नाव जाहीर होऊन बाकीचे माघार घेतात.

शासनाचा ना पुरस्कार, ना दमडीमागील पाच ग्रामपंचायत निवडणुकांसाठी अविरोध निवडीचा नवा अध्याय या गावाने लिहिला आहे. मात्र, स्थानिक जिल्हा किंवा राज्य पातळीवर याची २५ वर्षांत दखलच घेतली गेली नाही. कधीकाळी अविरोध निवडणुकीसाठी लाखोंचा निधी देण्याची सत्ताधा-यांची घोषणा निमदरीसाठी पोकळी ठरली. साधे प्रमाणपत्र, अभिनंदन करण्याचे सौजन्य कोणी दाखविले नसल्याची खंत आहे.

२५ वर्षांत चार सरपंच१९९४ ला नव्याने स्थापन झालेल्या निमकुंड ग्रामपंचायतीमध्ये २५ वर्षांत चार सरपंच झाले. ग्रामपंचायतीच्या तीन प्रभागांत एकूण नऊ सदस्यसंख्या आहे. विद्यमान सरपंच अनिल आकोले सलग दुसºयांदा अविरोध सरपंचपदी निवडल्या गेले. उपसरपंच अनिल धांडे, तर सदस्य जानकी भुसूम, सुनीता आठवले, निशा साकोमे, हिरालाल बेठे, शीला नागले असून, सचिव जी. व्ही. बेलसरे आहेत.

राज्यात आदर्श अशी आमची आदिवासी ग्रामपंचायत आहे. मागील २५ वर्षांपासून येथे मतदान झाले नाही. सदस्य, सरपंच, उपसरपंच निवड गावकरी सर्वानुमते ठरवितात. मात्र, शासनाची उदासीनता पाहता खंत वाटते.- अनिल आकोलेसरपंच, निमकुंड, ता. अचलपूर.

टॅग्स :Amravatiअमरावती