शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

पालिका हद्दीतच लागू राहणार आदर्श आचारसंहिता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2016 00:10 IST

राज्य निवडणूक आयोगाने सोमवार १७ आॅक्टोबर रोजी नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला .

पत्रकार परिषद : जिल्हाधिकारी किरण गित्ते यांची स्पष्टोेक्तीअमरावती : राज्य निवडणूक आयोगाने सोमवार १७ आॅक्टोबर रोजी नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला . त्यामुळे जिल्ह्यातील ९ नगरपरिषदांच्या हद्दीतच आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या क्षेत्रातील विविध कामांवर या आचारसंहितेचा कुठलाही फरक पडणार नसल्याची माहिती जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेत दिली.पुढे बोलताना जिल्हाधिकारी किरण गित्ते म्हणाले, १७ आॅक्टोबरला राज्य निवडणूक आयोगाने पालिका निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला. तेव्हापासूनच आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. यावेळी ज्या जिल्ह्यात चारपेक्षा जास्त पालिकांची निवडणूक आहे, अशा ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू केल्याचे जाहीर केले. मात्र, या आचारसंहितेचा जिल्हा परिषद आणि महापालिकेला कुठलाही फरक पडणार नाही. परिणामी या स्थानिक स्वराज्य संस्थेत विकासकामे अथवा प्रशासकीय कामे करण्यास आचारसंहितेची अडचण नसल्याने विकासकामे थांबणार नसल्याचे जिल्हाधिकारी गित्ते यांनी स्पष्ट केले. मात्र, पदाधिकाऱ्यांना शासकीय वाहनांचा वापर करता येणार नाही. मात्र, महापलिका व जिल्हा परिषदक्षेत्रात भूमिपूजन करता येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. आदर्श आचारसंहिता जिल्ह्यातील ९ नगरपरिषद क्षेत्रात जेथे निवडणूक आहे, तेथेच लागू राहणार आहे. चिखलदरा नगरपरिषद आणि धारणी, भातकुली, तिवसा, नांदगाव खंडेश्र्वर येथील नगपंचायतीच्या ठिकाणी आचार संहिता लागू राहणार नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. निवडणूकीच्या कामकाजासाठी ज्या नियुक्त शासकीय अधिकाऱ्यांसमवेत आता कोणतेही लोकप्रतिनिधी बैठक घेऊ शकणार नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. याशिवाय शासकीय विश्रामगृहांचा उपयोग केवळ राहण्यासाठीच करता येईल, असेही गित्ते यांनी सांगितले. ३ हजार ५३० पदवीधर मतदारांची नोंदणीआगामी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने नवीन मतदार नोंदणीचे काम जिल्ह्यात सुरू आहे. यासाठी आतापर्यंत ३ हजार ५३० नवीन मतदारांनी नोंदणी केली आहे. मतदार नोंदणीसाठी ५ नोव्हेंबर ही अंतिम मुदत आहे. मागील निवडणुकीदरम्यान जिल्ह्यात ७४ हजार मतदार होते. पदवीधर मतदारांनी मतदार नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी केले आहे.