शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

पालिका हद्दीतच लागू राहणार आदर्श आचारसंहिता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2016 00:10 IST

राज्य निवडणूक आयोगाने सोमवार १७ आॅक्टोबर रोजी नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला .

पत्रकार परिषद : जिल्हाधिकारी किरण गित्ते यांची स्पष्टोेक्तीअमरावती : राज्य निवडणूक आयोगाने सोमवार १७ आॅक्टोबर रोजी नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला . त्यामुळे जिल्ह्यातील ९ नगरपरिषदांच्या हद्दीतच आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या क्षेत्रातील विविध कामांवर या आचारसंहितेचा कुठलाही फरक पडणार नसल्याची माहिती जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेत दिली.पुढे बोलताना जिल्हाधिकारी किरण गित्ते म्हणाले, १७ आॅक्टोबरला राज्य निवडणूक आयोगाने पालिका निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला. तेव्हापासूनच आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. यावेळी ज्या जिल्ह्यात चारपेक्षा जास्त पालिकांची निवडणूक आहे, अशा ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू केल्याचे जाहीर केले. मात्र, या आचारसंहितेचा जिल्हा परिषद आणि महापालिकेला कुठलाही फरक पडणार नाही. परिणामी या स्थानिक स्वराज्य संस्थेत विकासकामे अथवा प्रशासकीय कामे करण्यास आचारसंहितेची अडचण नसल्याने विकासकामे थांबणार नसल्याचे जिल्हाधिकारी गित्ते यांनी स्पष्ट केले. मात्र, पदाधिकाऱ्यांना शासकीय वाहनांचा वापर करता येणार नाही. मात्र, महापलिका व जिल्हा परिषदक्षेत्रात भूमिपूजन करता येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. आदर्श आचारसंहिता जिल्ह्यातील ९ नगरपरिषद क्षेत्रात जेथे निवडणूक आहे, तेथेच लागू राहणार आहे. चिखलदरा नगरपरिषद आणि धारणी, भातकुली, तिवसा, नांदगाव खंडेश्र्वर येथील नगपंचायतीच्या ठिकाणी आचार संहिता लागू राहणार नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. निवडणूकीच्या कामकाजासाठी ज्या नियुक्त शासकीय अधिकाऱ्यांसमवेत आता कोणतेही लोकप्रतिनिधी बैठक घेऊ शकणार नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. याशिवाय शासकीय विश्रामगृहांचा उपयोग केवळ राहण्यासाठीच करता येईल, असेही गित्ते यांनी सांगितले. ३ हजार ५३० पदवीधर मतदारांची नोंदणीआगामी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने नवीन मतदार नोंदणीचे काम जिल्ह्यात सुरू आहे. यासाठी आतापर्यंत ३ हजार ५३० नवीन मतदारांनी नोंदणी केली आहे. मतदार नोंदणीसाठी ५ नोव्हेंबर ही अंतिम मुदत आहे. मागील निवडणुकीदरम्यान जिल्ह्यात ७४ हजार मतदार होते. पदवीधर मतदारांनी मतदार नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी केले आहे.