शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
3
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
4
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
5
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
6
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
7
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
8
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
9
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
10
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
11
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
12
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
13
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
14
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
15
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
16
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
17
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
18
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
19
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
20
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!

पालिका हद्दीतच लागू राहणार आदर्श आचारसंहिता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2016 00:10 IST

राज्य निवडणूक आयोगाने सोमवार १७ आॅक्टोबर रोजी नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला .

पत्रकार परिषद : जिल्हाधिकारी किरण गित्ते यांची स्पष्टोेक्तीअमरावती : राज्य निवडणूक आयोगाने सोमवार १७ आॅक्टोबर रोजी नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला . त्यामुळे जिल्ह्यातील ९ नगरपरिषदांच्या हद्दीतच आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या क्षेत्रातील विविध कामांवर या आचारसंहितेचा कुठलाही फरक पडणार नसल्याची माहिती जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेत दिली.पुढे बोलताना जिल्हाधिकारी किरण गित्ते म्हणाले, १७ आॅक्टोबरला राज्य निवडणूक आयोगाने पालिका निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला. तेव्हापासूनच आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. यावेळी ज्या जिल्ह्यात चारपेक्षा जास्त पालिकांची निवडणूक आहे, अशा ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू केल्याचे जाहीर केले. मात्र, या आचारसंहितेचा जिल्हा परिषद आणि महापालिकेला कुठलाही फरक पडणार नाही. परिणामी या स्थानिक स्वराज्य संस्थेत विकासकामे अथवा प्रशासकीय कामे करण्यास आचारसंहितेची अडचण नसल्याने विकासकामे थांबणार नसल्याचे जिल्हाधिकारी गित्ते यांनी स्पष्ट केले. मात्र, पदाधिकाऱ्यांना शासकीय वाहनांचा वापर करता येणार नाही. मात्र, महापलिका व जिल्हा परिषदक्षेत्रात भूमिपूजन करता येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. आदर्श आचारसंहिता जिल्ह्यातील ९ नगरपरिषद क्षेत्रात जेथे निवडणूक आहे, तेथेच लागू राहणार आहे. चिखलदरा नगरपरिषद आणि धारणी, भातकुली, तिवसा, नांदगाव खंडेश्र्वर येथील नगपंचायतीच्या ठिकाणी आचार संहिता लागू राहणार नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. निवडणूकीच्या कामकाजासाठी ज्या नियुक्त शासकीय अधिकाऱ्यांसमवेत आता कोणतेही लोकप्रतिनिधी बैठक घेऊ शकणार नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. याशिवाय शासकीय विश्रामगृहांचा उपयोग केवळ राहण्यासाठीच करता येईल, असेही गित्ते यांनी सांगितले. ३ हजार ५३० पदवीधर मतदारांची नोंदणीआगामी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने नवीन मतदार नोंदणीचे काम जिल्ह्यात सुरू आहे. यासाठी आतापर्यंत ३ हजार ५३० नवीन मतदारांनी नोंदणी केली आहे. मतदार नोंदणीसाठी ५ नोव्हेंबर ही अंतिम मुदत आहे. मागील निवडणुकीदरम्यान जिल्ह्यात ७४ हजार मतदार होते. पदवीधर मतदारांनी मतदार नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी केले आहे.