शहरं
Join us  
Trending Stories
1
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
2
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
3
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
4
डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ...
5
टाटा मोटर्सचा IPO... दोन दिवसांनी कमाईची संधी, लिस्टिंग कधी, प्राईज बँड काय, सर्वकाही जाणून घ्या
6
"'युद्ध का डर...!'; आम्ही कागदी वाघ, तर मग नाटो कोण?" पुतिन यांचा अमेरिकेवर तगडा प्रहार, भारतासंदर्भातही स्पष्टच बोलले!
7
VIDEO : केएल राहुलनं शिट्टी मारत साजरी केली सेंच्युरी; जाणून घ्या त्यामागचं कारण
8
त्या' 11 संशयितांची कसून चौकशी अकोला, मुंबईचे पोलीस पथक परतवाड्यात दाखल, इंट्रोगेशन सुरू
9
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
10
"तसेही आज तेच करावे लागले ना?"; भाजपने उद्धव ठाकरेंना डिवचले, दसरा मेळाव्यावरून हल्ला
11
Mirabai Chanu : मीराबाई चानूने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रचला इतिहास; १९९ किलो वजन उचलून जिंकलं सिल्व्हर मेडल
12
धक्कादायक! मुंबईतील २६/११ मधील हल्ल्यात NSG कमांडोने शौर्य दाखवले; आता गांजा तस्करीच्या आरोपाखाली अटक
13
"रावण वाईट नव्हता, थोडा खोडकर...", अभिनेत्रीची वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
Tragedy in Bihar: हृदयद्रावक घटना! वंदे भारत एक्सप्रेसच्या धडकेत ४ ठार; २ जण गंभीर जखमी
15
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
16
टाटा मोटर्स वगळता विक्रीचा दबाव; जागतिक बाजारातील संमिश्र संकेतामुळे भारतीय बाजार रेड झोनमध्ये
17
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
18
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेसाठी अभिषेक शर्मा-तिलक वर्माची टीम इंडियात एन्ट्री
19
"सुशांतबद्दल सांगायचं तर आम्ही ३ वर्ष...", अभिनेत्याच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच व्यक्त झाल्या सविता प्रभुणे
20
IT क्षेत्रासाठी मोठा धक्का! TCS मधून १२,००० जणांना काढणार, कर्मचाऱ्यांसमोर दोनच पर्याय

मोबाईलचा तगादा जिवावर बेतला, पत्नीचा गळा आवळून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:17 IST

अमरावती : मोबाईलचा तगादा नवविवाहित पत्नीच्या जिवावर बेतल्याची घटना गोपालनगरनजीक आदर्शनगरात गुरुवारी दुपारी १.३० च्या सुमारास घडली. पूजा ...

अमरावती : मोबाईलचा तगादा नवविवाहित पत्नीच्या जिवावर बेतल्याची घटना गोपालनगरनजीक आदर्शनगरात गुरुवारी दुपारी १.३० च्या सुमारास घडली. पूजा विजय राठोड (२३) असे मृताचे नाव आहे. घटनेनंतर आरोपी पती विजय दादाराव राठोड (२८) याने राजापेठ पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले. प्रथमदर्शनी ही हत्या काैटुंबिक कलह व मोबाईलच्या वादातून घडल्याची सांगितले जात आहे. राजापेठ पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

बडनेरा रोडवरील एका मॉलमध्ये सुरक्षारक्षक असलेल्या विजय राठोडचे ११ महिन्यांपूर्वी आर्वी येथील पूजाशी लग्न झाले. लग्नानंतर राठोड दाम्पत्य आदर्शनगरमध्ये भाड्याची खोली करून राहू लागले. तीन चार दिवसांपूर्वी पूजाचा मोबाईल फुटला. तेव्हापासून तिने पतीकडे नव्या मोबाईलसाठी तगादा लावला.

दरम्यान, गुरुवारी या दाम्पत्याने २२ हजार रुपये किमतीचा मोबाईल पसंतदेखील केला. मात्र, तेवढी रक्कम नसल्याने ते दोघेही घरी परतले. घरी आल्यानंतर दोघांमध्ये त्याच कारणावरून वाद झाला. वादादरम्यान आरोपी विजयने पत्नी पूजाच्या नाकावर जोराने प्रहार केला तसेच तथा तिचा गळा देखील आवळला. त्यात तिचा घटनास्थळीच मूत्यू झाला. शुल्लक कारणामुळे पत्नीचा खून केल्याचे लक्षात येताच विजयने रडत-रडत राजापेठ पोलीस ठाणे गाठले. खुनाचा कबुलीजबाब दिला. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठत पंचनामा केला. मोबाईलचा तगादा लावल्याने व तो घेण्याची आर्थिक कुवत नसल्याने वाद झाला. त्यातून ही घटना घडलयाची कबुली आरोपीने दिल्याची माहिती राजापेठचे ठाणेदार मनीष ठाकरे यांनी ‘लोकमत’ला दिली.