शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "अजित पवार, सगळ्यांचा नाद करायचा, पण..."; भाजपा नेते राजन पाटलांच्या मुलाचं थेट चॅलेंज
2
भारताला 'हिंदू राष्ट्र' घोषित करण्याची गरज नाही, हिंदू म्हणजे अशी व्यक्ती जी...- मोहन भागवत
3
'AI वर आंधळा विश्वास ठेवू नका; यातील गुंतवणुकीचा फुगा कधीही फुटू शकतो' सुंदर पिचाईं यांचा इशारा!
4
"मुलाच्या मनात माझा आदर वाढेल"; डिनर पार्टीत ट्रम्प यांनी रोनाल्डोसोबत शेअर केला घरातला खास किस्सा
5
Mumbai Airport: मुंबई विमानतळ २० नोव्हेंबर रोजी ६ तास बंद राहणार, कारण काय?
6
अनगरात 'सही'चा खेळ! अर्ज बाद होताच उज्ज्वला थिटेंचा आरोप, 'मुलगा सोबत असूनही सही राहिलीच कशी?
7
FD-RD विसरा! सुरक्षित गुंतवणूक हवी असल्यास FMP ठरेल स्मार्ट चॅाईस, लो रिस्क हाय रिटर्नचा स्मार्ट कॅाम्बो
8
भाजपाची घराणेशाही! एकाच कुटुंबातील ६ जणांना तिकीट; पत्नी, भाऊ, वहिनी, मेहुणा... सगळेच रिंगणात
9
Mahayuti: भाजप- शिंदे गटात माजी नगरसेवक फोडण्याची स्पर्धा, निवडणुकीपूर्वी महायुतीत अंतर्गत वाद शिगेला!
10
शेअर बाजारात आजही घसरण, २५,९०० च्या खाली निफ्टी; IT Stocks मध्ये मोठी खरेदी
11
Video: "लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम..."; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा घणाघात, भाजपावर निशाणा
12
Delhi Blast: युनूस सरकारचा दावा खोटा; अटकेत असलेला इख्तियार बांगलादेशचा पर्दाफाश करणार !
13
आजचे राशीभविष्य - १९ नोव्हेंबर २०२५, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्ती इत्यादीसाठी आजचा दिवस अनुकूल
14
Politics: "मला आणि माझा मुलाला मारण्याचा कट" भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्याचा शिंदेसेनेवर गंभीर आरोप!
15
Supreme Court: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर टांगती तलवार, आरक्षणाच्या मर्यादेवर आज सुनावणी!
16
Mumbai Airport: विमानतळ परिसरातील मार्ग आजपासून २ दिवस बंद; 'या' पर्यायी मार्गाचा करा वापर!
17
CNG Supply: मुंबईकरांना मोठा दिलासा! ३ दिवसांनंतर सीएनजी पुरवठा पूर्ववत, प्रवाशांनी सोडला सुटकेचा निःश्वास
18
Farmers Relief: मुसळधार पाऊस किंवा वन्य प्राण्यांनी पीक तुडवले, नुकसान भरपाई मिळणार,  पण एक अट!
19
Mahayuti: एकमेकांचे माजी नगरसेवक, पदाधिकारी पळवण्यावरून महायुतीत घमासान! 
20
Government Decision: 'नोटरी'वर झालेले जमीन व्यवहारही आता कायदेशीर; ३ कोटी नागरिकांना मोठा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईलचा तगादा जिवावर बेतला, पत्नीचा गळा आवळून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:17 IST

अमरावती : मोबाईलचा तगादा नवविवाहित पत्नीच्या जिवावर बेतल्याची घटना गोपालनगरनजीक आदर्शनगरात गुरुवारी दुपारी १.३० च्या सुमारास घडली. पूजा ...

अमरावती : मोबाईलचा तगादा नवविवाहित पत्नीच्या जिवावर बेतल्याची घटना गोपालनगरनजीक आदर्शनगरात गुरुवारी दुपारी १.३० च्या सुमारास घडली. पूजा विजय राठोड (२३) असे मृताचे नाव आहे. घटनेनंतर आरोपी पती विजय दादाराव राठोड (२८) याने राजापेठ पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले. प्रथमदर्शनी ही हत्या काैटुंबिक कलह व मोबाईलच्या वादातून घडल्याची सांगितले जात आहे. राजापेठ पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

बडनेरा रोडवरील एका मॉलमध्ये सुरक्षारक्षक असलेल्या विजय राठोडचे ११ महिन्यांपूर्वी आर्वी येथील पूजाशी लग्न झाले. लग्नानंतर राठोड दाम्पत्य आदर्शनगरमध्ये भाड्याची खोली करून राहू लागले. तीन चार दिवसांपूर्वी पूजाचा मोबाईल फुटला. तेव्हापासून तिने पतीकडे नव्या मोबाईलसाठी तगादा लावला.

दरम्यान, गुरुवारी या दाम्पत्याने २२ हजार रुपये किमतीचा मोबाईल पसंतदेखील केला. मात्र, तेवढी रक्कम नसल्याने ते दोघेही घरी परतले. घरी आल्यानंतर दोघांमध्ये त्याच कारणावरून वाद झाला. वादादरम्यान आरोपी विजयने पत्नी पूजाच्या नाकावर जोराने प्रहार केला तसेच तथा तिचा गळा देखील आवळला. त्यात तिचा घटनास्थळीच मूत्यू झाला. शुल्लक कारणामुळे पत्नीचा खून केल्याचे लक्षात येताच विजयने रडत-रडत राजापेठ पोलीस ठाणे गाठले. खुनाचा कबुलीजबाब दिला. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठत पंचनामा केला. मोबाईलचा तगादा लावल्याने व तो घेण्याची आर्थिक कुवत नसल्याने वाद झाला. त्यातून ही घटना घडलयाची कबुली आरोपीने दिल्याची माहिती राजापेठचे ठाणेदार मनीष ठाकरे यांनी ‘लोकमत’ला दिली.