शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल मानवाच्या जीवनाचे खेळणे बनू नये

By admin | Updated: January 11, 2015 22:42 IST

वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून बहुतांश वाहन चालक हे बिनधास्तपणे भ्रमणध्वनीवर बोलत वाहन चालवितात. ही बाब जीवावर बेतणारी आहे. त्यामुळे शिक्षेत वाढ करणे गरजेचे आहे.

अमरावती : वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून बहुतांश वाहन चालक हे बिनधास्तपणे भ्रमणध्वनीवर बोलत वाहन चालवितात. ही बाब जीवावर बेतणारी आहे. त्यामुळे शिक्षेत वाढ करणे गरजेचे आहे. त्यामुळे मोबाईल हे भविष्यात मानवी जीवानाचे कर्दनकाळ तर बनणार नाही ना, अशी भीती राज्याचे उद्योग, सार्वजनिक बांधकाम, पर्यावरण राज्यमंत्री तथा पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी येथे व्यक्त केली.येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने ११ ते २५ जानेवारी दरम्यान आयोजित रस्ता सुरक्षा अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी किरण गित्ते होते. प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस आयुक्त सुरेश मेकला, जिल्हा पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता अविनाश भातुसे, एसटी मंहामंडळाचे विभागीय नियंत्रक महाजन, प्रादेशिक परिवहन अधिकारी एस. के. वाडेकर आदी उपस्थित होते. पुढे बोलताना ना. पोटे म्हणाले, आजची जीवनशैली धावपळीची असली तरी प्रत्येकांनी जबाबदारीचे पालन केल्यास कोणतीही घटना टाळणे शक्य आहे. कायद्याचा धाक नसल्यामुळेच वाहनचालक वाहतुकीच्या नियमांचे पालन करीत नाहीत. परंतु परदेशात वाहन चालक हे वाहतूक नियमावलीचे काटेकोर पालन करीत असल्याची बाब त्यांनी आवर्जून सांगितली. वाहतूक नियमावलीचे पालन न करणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध अधिक रकमेची दंडात्मक कारवाई करा, जेणे करुण नियमाचे पालन होईल व शासनाच्या तिजोरीत महसूलही जमा होईल, असे ते म्हणाले. आपलेपणाची भावना ठेवून अधिकाऱ्यांनी लोकांच्या मनात जागा बनविली पाहिजे, असे म्हणत एखादी घटना होणार असे दिसून येत असताना ती होऊच नये, यासाठी तत्पूर्वी उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. माजी राष्ट्रपती अबुल कलाम, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील भारत साकारण्यासाठी 'व्टेन्टी इंडिया' घडवायचा आहे, अन्यथा हीच स्थिती राहिल्यास 'व्टेन्टी मॅच' बनेल, असे ते म्हणाले. अपघातात घरातील कर्ता माणूस गमावला तर त्या घरातील काय अवस्था होते, हा विचार न केलेलाच बरा. वाहन चालविताना जबाबदारी स्वीकारली तर रस्ता सुरक्षा अभियान राबविण्याची गरज राहणार नाही, असा संदेश देताना अधिकाऱ्यांनीसुद्धा जबाबदारीने कर्तव्य पार पाडावे, असा टोलाही पालकमंत्र्यांनी लगावला. ट्रक, वाहनांना रिफ्लेक्टर लावण्याच्या सूचना त्यांनी दिल्यात. प्रास्ताविक एस. के. वाडेकर यांनी तर संचालन ज्योती तोटेवार व आभार प्रदर्शन एम. बी. नेवस्कर यांनी केले.