शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
3
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
4
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
5
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
6
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
7
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
8
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
9
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
10
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
11
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
12
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
13
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
14
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
15
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
16
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
17
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
18
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
19
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 

रेल्वे, बसस्थानकांवरील महिला प्रवासी मदत केंद्र बेपत्ता

By admin | Updated: July 20, 2016 00:13 IST

मध्यवत्ती बसस्थापनाला रेल्वे स्टेशनवर महिला प्रवासी मदत केंद्र स्थापन करण्याच्या सूचनेला वाहतूक शाखेने पुरुष व महिला पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी, ...

सुरक्षा वाऱ्यावर : पोलीस आयुक्तांच्या पत्राला केराची टोपलीअमरावती : मध्यवत्ती बसस्थापनाला रेल्वे स्टेशनवर महिला प्रवासी मदत केंद्र स्थापन करण्याच्या सूचनेला वाहतूक शाखेने पुरुष व महिला पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी, अशा सूचना पोलीस आयुक्तांनी वाहतूक पोलीस निरीक्षकांना दिल्या होत्या. तथापि सहा महिने उलटून गेल्यावरही या सूचनांची अंमलबजावणी झालेली नाही.पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी बसस्थानकाच्या सुरक्षेसंबंधी घ्यावयाची दक्षता व करावयाची उपाययोजना याबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या. राज्य महामंडळाची बसस्थानके ही सार्वजनिक ठिकाणे असल्याने अतिरेक्यांची सॉफ्ट टार्गेट ठरू शकतात. आतंकवाद्यांमार्फत बॉम्बस्फोट व अन्य घातपाताच्या घटना घडवून आणल्यास मोठी जीवितहानी होऊ शकते. त्या अनुषंगाने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आगार स्थानकाच्या ठिकाणी उपाययोजना राबविण्याच्या उद्देशाने आयुक्तांनी निर्देश दिले होते. राजापेठ वाहतूक निरिक्षकांनी फैजरपुरा व गाडगेनगर यांचे समवेत बसस्थापनाची पाहणी करावी. सुचतांची पूर्तता करून तीन दिवसांत अहवाल द्यावा, असे सुचविण्यात आले. प्रत्यक्षात हा अहवाल कुणाकडे आहे, हे प्रश्नही अनुत्तरित आहे.सूचनांची अंमलबजावणी नाहीचप्रवाशांची वाहने, प्रवाशास सोडणाऱ्या, घ्यावयास येणाऱ्या नातेवाईकांच्या वाहनांच्या पार्किंगचे व्यवस्थित नियोजन करावे, सदर नियोजन हे आगार व्यवस्थापक यांच्यासोबत चर्चा करून जागा उपलब्ध करून व्यवस्थित करून घ्यावी, बसस्थानकासह रेल्वे स्थानकावरही महिला प्रवासी केंद्र सुरू करण्यात यावे, तेथे वाहतूक पोलिसांची नियमित नेमणूक करावी, रिक्षा चालक हे प्रवाशांकडून वाजवी भाडे घेतील. प्रवाशांना भाडे नाकारणाऱ्यांशी याबाबत कर्तव्यावर असलेल्या वाहतूक कर्मचाऱ्यांनी दक्षता घ्यावी, बसस्थानक परिसरात येणाऱ्या रिक्षा व्यवस्थित एका लाईनमध्ये उभ्या राहतील व वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये, अशा सूचना होत्या. प्रत्यक्षात या सूचनांची अंमलबजावणी कधीही झाली नाही.यासंदर्भात तत्कालीन प्रभारी सहायक आयुक्त बळीराम डाखोरे यांनी अंमलबजावणीस सुरुवात केली होती. तत्कालीन वाहतूक निरीक्षक प्रमेश आत्राम यांनीही सूचना दिल्या होत्या. मात्र त्यांच्या जागी आलेले नवे निरीक्षक या सूचनांपासून अनभिज्ञ आहेत. बसस्थानक परिसरात कार्यरत असलेले वाहतूक पोलीस बसस्थानकाच्या आत जाऊन पाहण्याचे औदार्य दाखवीत नाहीत. यासंबंधी सूचना देणे आवश्यक आहे.कुठे गेलेत एटीचे सुरक्षारक्षक ?सुमारे चार महिन्यांपूर्वी गाजावाजा करीत मध्यवर्ती बसस्थानकाच्या दोन्ही प्रवेशद्वारासमोर सुरक्षा रक्षक ठेवण्यात आले, हे सुरक्षारक्षक कुठलीही दुचाकी वा अन्य खासगी वाहने आगारात जाऊ देत नव्हते. मात्र आता ते सुरक्षारक्षकच बेपत्ता झाल्याने दुचाकी पार्किंग शेवटच्या कोपऱ्यापर्यंत पोहोचली. रसवंतीच्या बाजूने ५० पेक्षा अधिक दुचाकी पार्क केल्या जातात. सुरक्षारक्षक नसल्याने येथून दुचाकी चोरीला जाण्याचे प्रमाणे वाढले आहे.