शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे, बसस्थानकांवरील महिला प्रवासी मदत केंद्र बेपत्ता

By admin | Updated: July 20, 2016 00:13 IST

मध्यवत्ती बसस्थापनाला रेल्वे स्टेशनवर महिला प्रवासी मदत केंद्र स्थापन करण्याच्या सूचनेला वाहतूक शाखेने पुरुष व महिला पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी, ...

सुरक्षा वाऱ्यावर : पोलीस आयुक्तांच्या पत्राला केराची टोपलीअमरावती : मध्यवत्ती बसस्थापनाला रेल्वे स्टेशनवर महिला प्रवासी मदत केंद्र स्थापन करण्याच्या सूचनेला वाहतूक शाखेने पुरुष व महिला पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी, अशा सूचना पोलीस आयुक्तांनी वाहतूक पोलीस निरीक्षकांना दिल्या होत्या. तथापि सहा महिने उलटून गेल्यावरही या सूचनांची अंमलबजावणी झालेली नाही.पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी बसस्थानकाच्या सुरक्षेसंबंधी घ्यावयाची दक्षता व करावयाची उपाययोजना याबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या. राज्य महामंडळाची बसस्थानके ही सार्वजनिक ठिकाणे असल्याने अतिरेक्यांची सॉफ्ट टार्गेट ठरू शकतात. आतंकवाद्यांमार्फत बॉम्बस्फोट व अन्य घातपाताच्या घटना घडवून आणल्यास मोठी जीवितहानी होऊ शकते. त्या अनुषंगाने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आगार स्थानकाच्या ठिकाणी उपाययोजना राबविण्याच्या उद्देशाने आयुक्तांनी निर्देश दिले होते. राजापेठ वाहतूक निरिक्षकांनी फैजरपुरा व गाडगेनगर यांचे समवेत बसस्थापनाची पाहणी करावी. सुचतांची पूर्तता करून तीन दिवसांत अहवाल द्यावा, असे सुचविण्यात आले. प्रत्यक्षात हा अहवाल कुणाकडे आहे, हे प्रश्नही अनुत्तरित आहे.सूचनांची अंमलबजावणी नाहीचप्रवाशांची वाहने, प्रवाशास सोडणाऱ्या, घ्यावयास येणाऱ्या नातेवाईकांच्या वाहनांच्या पार्किंगचे व्यवस्थित नियोजन करावे, सदर नियोजन हे आगार व्यवस्थापक यांच्यासोबत चर्चा करून जागा उपलब्ध करून व्यवस्थित करून घ्यावी, बसस्थानकासह रेल्वे स्थानकावरही महिला प्रवासी केंद्र सुरू करण्यात यावे, तेथे वाहतूक पोलिसांची नियमित नेमणूक करावी, रिक्षा चालक हे प्रवाशांकडून वाजवी भाडे घेतील. प्रवाशांना भाडे नाकारणाऱ्यांशी याबाबत कर्तव्यावर असलेल्या वाहतूक कर्मचाऱ्यांनी दक्षता घ्यावी, बसस्थानक परिसरात येणाऱ्या रिक्षा व्यवस्थित एका लाईनमध्ये उभ्या राहतील व वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये, अशा सूचना होत्या. प्रत्यक्षात या सूचनांची अंमलबजावणी कधीही झाली नाही.यासंदर्भात तत्कालीन प्रभारी सहायक आयुक्त बळीराम डाखोरे यांनी अंमलबजावणीस सुरुवात केली होती. तत्कालीन वाहतूक निरीक्षक प्रमेश आत्राम यांनीही सूचना दिल्या होत्या. मात्र त्यांच्या जागी आलेले नवे निरीक्षक या सूचनांपासून अनभिज्ञ आहेत. बसस्थानक परिसरात कार्यरत असलेले वाहतूक पोलीस बसस्थानकाच्या आत जाऊन पाहण्याचे औदार्य दाखवीत नाहीत. यासंबंधी सूचना देणे आवश्यक आहे.कुठे गेलेत एटीचे सुरक्षारक्षक ?सुमारे चार महिन्यांपूर्वी गाजावाजा करीत मध्यवर्ती बसस्थानकाच्या दोन्ही प्रवेशद्वारासमोर सुरक्षा रक्षक ठेवण्यात आले, हे सुरक्षारक्षक कुठलीही दुचाकी वा अन्य खासगी वाहने आगारात जाऊ देत नव्हते. मात्र आता ते सुरक्षारक्षकच बेपत्ता झाल्याने दुचाकी पार्किंग शेवटच्या कोपऱ्यापर्यंत पोहोचली. रसवंतीच्या बाजूने ५० पेक्षा अधिक दुचाकी पार्क केल्या जातात. सुरक्षारक्षक नसल्याने येथून दुचाकी चोरीला जाण्याचे प्रमाणे वाढले आहे.