शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
2
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
3
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
4
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
5
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
6
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
7
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
8
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
9
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
10
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
11
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
12
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
13
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
14
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
15
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
16
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
17
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
18
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
19
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
20
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?

रेल्वे, बसस्थानकांवरील महिला प्रवासी मदत केंद्र बेपत्ता

By admin | Updated: July 20, 2016 00:13 IST

मध्यवत्ती बसस्थापनाला रेल्वे स्टेशनवर महिला प्रवासी मदत केंद्र स्थापन करण्याच्या सूचनेला वाहतूक शाखेने पुरुष व महिला पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी, ...

सुरक्षा वाऱ्यावर : पोलीस आयुक्तांच्या पत्राला केराची टोपलीअमरावती : मध्यवत्ती बसस्थापनाला रेल्वे स्टेशनवर महिला प्रवासी मदत केंद्र स्थापन करण्याच्या सूचनेला वाहतूक शाखेने पुरुष व महिला पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी, अशा सूचना पोलीस आयुक्तांनी वाहतूक पोलीस निरीक्षकांना दिल्या होत्या. तथापि सहा महिने उलटून गेल्यावरही या सूचनांची अंमलबजावणी झालेली नाही.पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी बसस्थानकाच्या सुरक्षेसंबंधी घ्यावयाची दक्षता व करावयाची उपाययोजना याबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या. राज्य महामंडळाची बसस्थानके ही सार्वजनिक ठिकाणे असल्याने अतिरेक्यांची सॉफ्ट टार्गेट ठरू शकतात. आतंकवाद्यांमार्फत बॉम्बस्फोट व अन्य घातपाताच्या घटना घडवून आणल्यास मोठी जीवितहानी होऊ शकते. त्या अनुषंगाने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आगार स्थानकाच्या ठिकाणी उपाययोजना राबविण्याच्या उद्देशाने आयुक्तांनी निर्देश दिले होते. राजापेठ वाहतूक निरिक्षकांनी फैजरपुरा व गाडगेनगर यांचे समवेत बसस्थापनाची पाहणी करावी. सुचतांची पूर्तता करून तीन दिवसांत अहवाल द्यावा, असे सुचविण्यात आले. प्रत्यक्षात हा अहवाल कुणाकडे आहे, हे प्रश्नही अनुत्तरित आहे.सूचनांची अंमलबजावणी नाहीचप्रवाशांची वाहने, प्रवाशास सोडणाऱ्या, घ्यावयास येणाऱ्या नातेवाईकांच्या वाहनांच्या पार्किंगचे व्यवस्थित नियोजन करावे, सदर नियोजन हे आगार व्यवस्थापक यांच्यासोबत चर्चा करून जागा उपलब्ध करून व्यवस्थित करून घ्यावी, बसस्थानकासह रेल्वे स्थानकावरही महिला प्रवासी केंद्र सुरू करण्यात यावे, तेथे वाहतूक पोलिसांची नियमित नेमणूक करावी, रिक्षा चालक हे प्रवाशांकडून वाजवी भाडे घेतील. प्रवाशांना भाडे नाकारणाऱ्यांशी याबाबत कर्तव्यावर असलेल्या वाहतूक कर्मचाऱ्यांनी दक्षता घ्यावी, बसस्थानक परिसरात येणाऱ्या रिक्षा व्यवस्थित एका लाईनमध्ये उभ्या राहतील व वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये, अशा सूचना होत्या. प्रत्यक्षात या सूचनांची अंमलबजावणी कधीही झाली नाही.यासंदर्भात तत्कालीन प्रभारी सहायक आयुक्त बळीराम डाखोरे यांनी अंमलबजावणीस सुरुवात केली होती. तत्कालीन वाहतूक निरीक्षक प्रमेश आत्राम यांनीही सूचना दिल्या होत्या. मात्र त्यांच्या जागी आलेले नवे निरीक्षक या सूचनांपासून अनभिज्ञ आहेत. बसस्थानक परिसरात कार्यरत असलेले वाहतूक पोलीस बसस्थानकाच्या आत जाऊन पाहण्याचे औदार्य दाखवीत नाहीत. यासंबंधी सूचना देणे आवश्यक आहे.कुठे गेलेत एटीचे सुरक्षारक्षक ?सुमारे चार महिन्यांपूर्वी गाजावाजा करीत मध्यवर्ती बसस्थानकाच्या दोन्ही प्रवेशद्वारासमोर सुरक्षा रक्षक ठेवण्यात आले, हे सुरक्षारक्षक कुठलीही दुचाकी वा अन्य खासगी वाहने आगारात जाऊ देत नव्हते. मात्र आता ते सुरक्षारक्षकच बेपत्ता झाल्याने दुचाकी पार्किंग शेवटच्या कोपऱ्यापर्यंत पोहोचली. रसवंतीच्या बाजूने ५० पेक्षा अधिक दुचाकी पार्क केल्या जातात. सुरक्षारक्षक नसल्याने येथून दुचाकी चोरीला जाण्याचे प्रमाणे वाढले आहे.