वनविभागाचा हलगर्जीपणा : उरले केवळ झाडांचे बुंधेगणोरी : गणोरी येथे एकेकाळी अस्तित्वात असलेली बाभुळीची बंदी आज अस्तित्वातच नाही. याठिकाणी असलेल्या घनदाट बाभळांची जागा आता आरीने कापून उरलेल्या बुडांनी घेतली आहे. याला पूर्णत: वनविभाग दोषी असल्याचे दिसत आहे. वन विभागातील कर्तव्यावर असलेले अधिकारी वर्षानुवर्षे या भागात दिसत नाही. त्यामुळे लाकुडतोड्याना सुगीचे दिवस आले आहे. त्यांनी काही वर्षात घनदाट काळ्या बाभुळीच्या बंदीचा नायनाट लावला. अनेक ठिकाणी तर निंबाच्या झाडांना देखील या लाकुडतोड्यांनी सोडली नाही. निंबाचे झाड तोडने कायद्याने गुन्हा असताना देखील अनेक ठिकाणी निंबाची झाडे तोडल्या गेलीत ती का? तर अधिकारची या भागात फिरकत नाही मग आपल्यावर वचक कुणाचा या भावनेतून लाकुडतोड्यांनी असे पाऊल उचलले व बंदीसोबतच निंबाची झाडे देखील भुईसपाट केली. अधिकारी वर्ग नुसता कार्यालयात बसून वेतन घेतांना दिसतात. गावातील एकाही जबाबदार व्यक्तीपर्यंत हे अधिकारी पोहोचले नाही की त्या ठिकाणी जाऊन साधी चौकशीही या लोकांनी केली नाही. शासनाने नियुक्त केले वनविभागाचे कर्मचारी हे फक्त गलेलठ्ठ पगार घेण्यासाठीच नियुक्त केले की वनांची देखरेख व त्यांची देखभाल करण्यासाठी असा प्रश्न आता उपस्थित होताना दिसतो. एकेकाळी घनदाट असलेल्या बंदीत आतमध्ये प्रवेश करताना दोन-चार व्यक्तींना देखील घाम फुटायचा एवढी ती दाट व अंधकारमय होती. जेथे सूर्यकिरण देखील खूप कमी प्रमाणात पोहोचायचा आता मात्र चित्र वेगळेच आहे. त्या ठिकाणाहून लहान मुल देखील एकट चकरा मारू शकत एवढं मोकळ मोकळ चित्र त्या बंदीच दिसत आहे. तेव्हा या प्रकरणात वरिष्ठांनी लक्ष घालून योग्य ती कारवाई दोषींवर करावी अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे. (वार्ताहर)
गणोरी बंदीतून झाडे झालीत बेपत्ता
By admin | Updated: May 31, 2015 00:10 IST