शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

‘समृद्धी’वरील टोल नोकरभरतीत दिशाभूल; सोशल मीडियावर रिझ्युमची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2022 13:58 IST

लोकमतने आणला प्रकार उघडकीस

धामणगाव रेल्वे (अमरावती) : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर टोल कलेक्टर भरतीच्या नावावर समाज माध्यमावर रिझ्युम मागविले जात आहेत. बारावी उत्तीर्ण, एमएससीआयटी पात्रता यासाठी सांगितली जात आहे. तथापि, या पदांवर कुठलीही भरती अद्याप निघालेली नसून राज्यातील शेकडो बेरोजगारांची सोशल मीडियावर याद्वारे दिशाभूल होत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

राज्याला विकासाच्या वाटेवर नेणाऱ्या अंदाजे ५५ हजार कोटींच्या निधीतून ७१० किमी लांब बांधलेला नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. या महामार्गावरील २६ नाक्यांवर पथकर (टोल) वसुलीसाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) ने निविदा मागविली. कंत्राटदाराच्या नियुक्तीसंदर्भातील कार्यारंभ आदेशाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्यात येते. त्याचा फायदा घेत या टोलवर संगणक ऑपरेटर भरतीच्या नावावर सोशल मीडियावरून बेरोजगारांची दिशाभूल होत असल्याची माहिती पुढे आली आहे.

व्हॉट्सॲपवर मागवले रिझ्युम

महामार्गावरील एका टोलवर कलेक्टर भरती सुरू असून येथे २५ जागा भरण्यात येणार आहेत. याकरिता शैक्षणिक पात्रता बारावी उत्तीर्ण व एमएससीआयटी हवी, अशी सोशल मीडियावर पोस्ट करीत एक व्यक्ती स्वतःच्या व्हाॅट्सॲपवर रिझ्युम मागवत आहे. शेकडो बेरोजगारांनी या क्रमांकावर आपले रिझ्युम पाठवले आहे. मात्र, याला प्रशासकीय कोणताही आधार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

लोकमतने उघडकीस आणला घोळ

सोशल मीडियावर रिझ्युम मागणाऱ्या मोबाइल क्रमांकावर लोकमतने विचारणा केली तेव्हा उडवाउडवीची उत्तरे मिळाली. यानंतर लगेच अमरावती, मुंबई येथील एमएसआरडीसीचे वरिष्ठ अधिकारी तसेच व्यवस्थापकीय संचालक यांच्याशी संपर्क साधला. एवढेच नव्हे तर ज्या कंपनीला हा कंत्राट देण्याची प्रक्रिया सुरू आहे, त्याच्या संचालकांशी संवाद साधला. आपण आतापर्यंत कोणत्याही व्यक्तीची नियुक्ती केली नसून टोल नोकरभरतीसंदर्भात वृत्तपत्रात जाहिरात देऊन नियमाप्रमाणे ती राबविण्यात येणार असल्याचे संबंधित कंपनीच्या संचालकांनी सांगितले. याशिवाय अशा सोशल मीडियाच्या पोस्टकडे युवकांनी लक्ष देऊ नये, असे या कंपनीचे म्हणणे आहे.

टोल कंत्राटदार नियुक्तीसंदर्भातील कार्यारंभ आदेशाची प्रक्रियाच अखेरच्या टप्प्यात आहे. त्यामुळे नोकरभरतीचा प्रश्न नाही. संबंधित टोलवर नोकरभरती करताना कंत्राटदार कंपनीकडून वृत्तपत्रात प्रसिद्धी देऊनच ती करण्यात येईल. त्यामुळे कोणीही अशा नोकरभरतीसाठी आपली कागदपत्रे देऊ नयेत.

- योगेश गायकवाड, उपमुख्य कार्यकारी अभियंता, एमएसआरडीसी, मुंबई

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गjobनोकरी