शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘समृद्धी’वरील टोल नोकरभरतीत दिशाभूल; सोशल मीडियावर रिझ्युमची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2022 13:58 IST

लोकमतने आणला प्रकार उघडकीस

धामणगाव रेल्वे (अमरावती) : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर टोल कलेक्टर भरतीच्या नावावर समाज माध्यमावर रिझ्युम मागविले जात आहेत. बारावी उत्तीर्ण, एमएससीआयटी पात्रता यासाठी सांगितली जात आहे. तथापि, या पदांवर कुठलीही भरती अद्याप निघालेली नसून राज्यातील शेकडो बेरोजगारांची सोशल मीडियावर याद्वारे दिशाभूल होत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

राज्याला विकासाच्या वाटेवर नेणाऱ्या अंदाजे ५५ हजार कोटींच्या निधीतून ७१० किमी लांब बांधलेला नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. या महामार्गावरील २६ नाक्यांवर पथकर (टोल) वसुलीसाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) ने निविदा मागविली. कंत्राटदाराच्या नियुक्तीसंदर्भातील कार्यारंभ आदेशाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्यात येते. त्याचा फायदा घेत या टोलवर संगणक ऑपरेटर भरतीच्या नावावर सोशल मीडियावरून बेरोजगारांची दिशाभूल होत असल्याची माहिती पुढे आली आहे.

व्हॉट्सॲपवर मागवले रिझ्युम

महामार्गावरील एका टोलवर कलेक्टर भरती सुरू असून येथे २५ जागा भरण्यात येणार आहेत. याकरिता शैक्षणिक पात्रता बारावी उत्तीर्ण व एमएससीआयटी हवी, अशी सोशल मीडियावर पोस्ट करीत एक व्यक्ती स्वतःच्या व्हाॅट्सॲपवर रिझ्युम मागवत आहे. शेकडो बेरोजगारांनी या क्रमांकावर आपले रिझ्युम पाठवले आहे. मात्र, याला प्रशासकीय कोणताही आधार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

लोकमतने उघडकीस आणला घोळ

सोशल मीडियावर रिझ्युम मागणाऱ्या मोबाइल क्रमांकावर लोकमतने विचारणा केली तेव्हा उडवाउडवीची उत्तरे मिळाली. यानंतर लगेच अमरावती, मुंबई येथील एमएसआरडीसीचे वरिष्ठ अधिकारी तसेच व्यवस्थापकीय संचालक यांच्याशी संपर्क साधला. एवढेच नव्हे तर ज्या कंपनीला हा कंत्राट देण्याची प्रक्रिया सुरू आहे, त्याच्या संचालकांशी संवाद साधला. आपण आतापर्यंत कोणत्याही व्यक्तीची नियुक्ती केली नसून टोल नोकरभरतीसंदर्भात वृत्तपत्रात जाहिरात देऊन नियमाप्रमाणे ती राबविण्यात येणार असल्याचे संबंधित कंपनीच्या संचालकांनी सांगितले. याशिवाय अशा सोशल मीडियाच्या पोस्टकडे युवकांनी लक्ष देऊ नये, असे या कंपनीचे म्हणणे आहे.

टोल कंत्राटदार नियुक्तीसंदर्भातील कार्यारंभ आदेशाची प्रक्रियाच अखेरच्या टप्प्यात आहे. त्यामुळे नोकरभरतीचा प्रश्न नाही. संबंधित टोलवर नोकरभरती करताना कंत्राटदार कंपनीकडून वृत्तपत्रात प्रसिद्धी देऊनच ती करण्यात येईल. त्यामुळे कोणीही अशा नोकरभरतीसाठी आपली कागदपत्रे देऊ नयेत.

- योगेश गायकवाड, उपमुख्य कार्यकारी अभियंता, एमएसआरडीसी, मुंबई

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गjobनोकरी