शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

वेतनश्रेणीऐवजी तुटपुंजी मानधनवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:09 IST

संताप : राज्यातील आठ हजार वसतिगृह कर्मचाऱ्यांवर शासनाचा अन्याय नरेंद्र जावरे परतवाडा (अमरावती) : सामाजिक न्याय विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या ...

संताप : राज्यातील आठ हजार वसतिगृह कर्मचाऱ्यांवर शासनाचा अन्याय

नरेंद्र जावरे

परतवाडा (अमरावती) : सामाजिक न्याय विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या व जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असलेल्या राज्यभरातील अनुदानित वसतिगृहांतील अधीक्षक ते कर्मचाऱ्यांना तुटपुंज्या मानधनावर काम करावे लागत आहे. अनेक वर्षांपासून वेतनश्रेणीची मागणी असताना, केवळ तुटपुंजे मानधन वाढवून शासनाने तोंडाला पाने पुसल्याने तीव्र निषेध व्यक्त करीत पुनर्विचार करून वेतनश्रेणी लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे.

राज्य शासनाने केलेल्या मानधनवाढीचा विरोध करीत, त्याऐवजी वेतनश्रेणी द्यावी, अशी मागणी अनुदानित वसतिगृह कर्मचाऱ्यांनी केली आहे. राज्य शासनाने वेतनश्रेणीचे आश्वासन देऊन खिरापत वाटल्याचा आरोप या कर्मचाऱ्यांनी केला आहे. अमरावती जिल्ह्यात एकूण ६९, तर राज्यभरात एकूण २३८८ वसतिगृहे आहेत. त्यावर आठ हजारांवर अधीक्षक ते कर्मचारी आहेत. राज्यातील प्रत्येक तालुका मुख्यालयी व मोठ्या गावांमध्ये गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ही वसतिगृहे उघडण्यात आली आहेत. अनेक वर्षांपासून सुरू असलेला हा खेळ व भूलथापा बंद करून थेट वेतनश्रेणी लागू करण्याची मागणी अनुदानित वसतिगृह संघटना (अमरावती) चे मुख्य सल्लागार डॉ. ज्ञानेश्वर राऊत, विदर्भ संघटक सागर तायडे, आनंद खातरकर, चंदू लोखंडे, सुभाष गावंडे, प्रमोद अभ्यंकर, सुभाष सोनारे आदींनी केली आहे

बॉक्स

मंत्र्यांच्या बैठकीत मुस्कटदाबीचा आरोप

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मंत्रालय व दालनात न्याय व विशेष साहाय्य विभाग मंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री, वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत नुकतीच बैठक घेण्यात आली. राज्यातील अनुदानित वसतिगृह कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीसंदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली. कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मारुती कांबळे, सचिव अशोक ठाकर यांना व्हीसीद्वारे सहभागी करून घेण्यात आले. बैठकीत अनेक विषयांवर चर्चा होत असताना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची मुस्कटदाबी करण्यात आली. वेतनश्रेणी लागू न करता, मानधनात वाढ करून तोंडाला पाने पुसल्याचा आरोप संघटनेच्या नेत्यांनी केला. आतापर्यंत अनेक आंदोलने केली, आता रस्त्यावर उतरणार असल्याचे संघटनेच्यावतीने जाहीर करण्यात आले.

कोट

राज्यातील सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात कर्मचाऱ्यांची उपासमार सुरू असताना, वेतनश्रेणी लागू न करणे ही खेदाची बाब आहे. शासनाने न्याय द्यावा, अशी संघटनांमार्फत आमची मागणी आहे.

डॉ. ज्ञानेश्वर राऊत, जिल्हा सल्लागार, परतवाडा

बॉक्स

अमरावती जिल्ह्यात ६९ वसतिगृहे

अमरावती १७

भातकुली, नांदगाव खंडेश्वर प्रत्येकी २

दर्यापूर ११

चांदूर बाजार, अचलपूर प्रत्येकी ४

तिवसा ५

धारणी, वरूड, धामणगाव रेल्वे प्रत्येकी ३

चांदूर रेल्वे १

चिखलदरा ९

अंजनगाव सुर्जी ५

अमरावती जिल्ह्यात एकूण वसतिगृह कर्मचारी संख्या - २३३, अधीक्षक - ६९, चौकीदार - ६९, स्वयंपाकी - ८१, मदतनीस - १४, विद्यार्थी संख्या - २९९९

बॉक्स

राज्यातील वसतिगृहे

वसतिगृहे ----- २३८८

विद्यार्थी ------ ९९५५२

मुलींची वसतिगृहे --- ५७८

मुलांची वसतिगृहे ---- १८१०

कर्मचारी एकूण --- ८१०४

अधीक्षक ----- २३८८

चौकीदार। ------ २३८८

मदतनीस ------- ४७०

स्वयंपाकी ------- २८५८

बॉक्स

मानधन वाढवून बोळवण

सध्याचे मानधन दिलेली वाढ एकूण अधीक्षक ९२०० रु. ८०० रु. १० हजार रु. स्वयंपाकी ६९०० रु. १६०० रु. ८५०० रु. चौकीदार ५७५० रु. १७५० रु. ७५०० रु.

मदतनीस ५७५० रु. १७५० रु. ७५०० रु.